Konkan Tourism

Konkan Tourism Its about konkan most beautiful places.......

ARUNAI is the perfect place for nature lovers. It’s calm and serene beauty will mesmerise and relax your senses and mind...
06/01/2017

ARUNAI is the perfect place for nature lovers. It’s calm and serene beauty will mesmerise and relax your senses and mind. The sweet sound of chirping birds, the cool breeze, the fresh and clean air, the calm and peace of this place will provide a truly enriching experience of a lifetime.

13/07/2016
रत्नागिरीच्या सौंदर्याचे मुंबईच्या तरूणाईला वेड!रत्नागिरीतील तिर्थक्षेत्रे, निसर्गसौंदर्य, इथला कोकणी भोजनाचा आस्वाद घेण...
02/03/2016

रत्नागिरीच्या सौंदर्याचे मुंबईच्या तरूणाईला वेड!
रत्नागिरीतील तिर्थक्षेत्रे, निसर्गसौंदर्य, इथला कोकणी भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी मुंबईतून काही तरूण चक्क रॉयल इनफिल्ड बुलेट दुचाकीने अवतरले. तीन दिवस पाहुणचार घेऊन मुंबईत परतले. आता ते इथली महती सोशल मिडियाच्या माध्यमातून तरूणाई प्रसारित करत आहेत. याचा फायदा इथल्या पर्यटन व्यवसायवृद्धीला निश्‍चितपणे होणार आहे.
आजकाल इनफिल्ड बुलेट चालवण्याचे फॅड फारच वाढले आहे. ही राजेशाही मोटरसायकल पेट्रोल आणि देखभालीच्यादृष्टीने खर्चीक असली तरी ती घेण्याचा, वापरण्याचा मोह, आजच्या तरूणाईतही कायम आहे. मुंबईतील तरूणाईतही हे चित्र पहायला मिळते. मात्र या सवारीचा आनंद निव्वळ शहरातून फिरण्यासाठी नव्हता. काहीतरी वेगळं करण्याच्यादृष्टीने मुंबईतील तरूणांनी एकत्र येवून रॉयल्स थम्पर्स क्लबची स्थापना केली. सुट्टीच्या दिवशी एखाद्या ठिकाणाला भेट द्यायची, तिथली माहिती, महती, फोटोग्राफ्स सोशलमिडियाद्वारे अनेकांपर्यंत पोहोचवायचे, तिथल्या समस्या मांडायचेही प्रयत्न करायचे, हा या ग्रुपचा प्रमुख उद्देश. यापूर्वी या ग्रुपने लोणावळा, भंडारदरा, अलिबाग, हरिहरेश्‍वर, श्रीवर्धन, दिवेआगर, शिर्डी, नाशिक या भागाचे दौरे केले.
निसर्गसौंदर्याने नटलेल्या कोकणकडे त्यांची नजर न जाते तर नवलच. यापैकी एका तरूणाने मुळ कोकणचा असल्याने इथली नवलाई सहकार्‍यांना सांगितली आणि रॉयल थम्पर्स रत्नागिरीत येऊन थडकले. कशेडी, परशुराम घाटातील निसर्गसौंदर्याने त्यांना घायाळ केले. रत्नागिरीत गणपतीपुळे, भगवतीमंदिर, पावसचे श्री स्वामी स्वरूपानंद मंदिरात ते नतमस्तक झाले. आरे-वारे बीच, मांडवी बीच, गणपतीपुळे समुद्राने त्यांना हरवून टाकले. आपोआपच कॅमेरे क्लिक झाले. इथला भक्तीभाव, सौंदर्य कॅमेराबद्ध झाला. मुंबईतही मालवणी, कोकणी जेवण मिळते पण इथे आल्यावर इथल्या जेवणाची लज्जत काही औरच, अशा प्रतिक्रिया या तरूणांमधून उमटतात.
घरी परतल्यावर अर्थातच ही माहिती इतर सहकारी, मित्र, नातेवाईकांना देण्यासाठी त्यांची साहजिकच घाई उडते. इथले सौंदर्य फोटोतून पाहिल्यावर पर्यटकांची झुंबडच्या झुंबड कोकणात दाखल झाली तर आश्‍चर्य वाटायला नको. अर्थात या वाढत्या गर्दीसाठी कोकणातल्या रस्त्यांचे चौपदरीकरण व्हायला हवे. यामुळे सर्वांचा प्रवास विनाअपघात होईल आणि इथल्या सौंदर्यात अधिकच भर पडेल, असे या तरूणांना वाटते.
मात्र महामार्ग, तिथले नियम त्यांनी काटेकोरपणे पाळले. म्हणूनच आजवर त्यांच्या प्रवासात कधीही, कोणतीही दुर्घटना झालेली नाही. प्रवासात प्रत्येक सदस्य नेहमीच हेलमेटचा वापर करतो. योग्य त्या गतीने वाहन चालवण्यावर त्यांचा भर असतो. रत्नागिरीत हेल्मेट घालून वावरणारे मोटरसायकलस्वार पाहिल्यावर त्यांच्याकडे काही लोकांनी विचित्र नजरेने पाहिले. त्यावर नियम म्हणून नव्हे तर सुरक्षितता म्हणून आपणही सर्वांनी हेल्मेट वापरायला हवे, असा संदेश देऊन ते परतीच्या प्रवासाला निघाले. सौंदर्यदर्याचा खराखुरा आस्वाद मोटरसायकल प्रवासातून मिळवता येतो, असे या रॉकल थम्पर्सना वाटते. रत्नागिरी भेटीवर आलेल्या या तरूणांमध्ये राहुल कुरील, प्र्रफुल्ल भाटकर, सेहज सिंग, सुशिल खट्टे, इकबाल सिंग, जय, शैलेश पवार या महाराष्ट्राबाहेरील थम्पर्सचा समावेश होता.

Kokan cha raja jhala dhakal.......
25/03/2015

Kokan cha raja jhala dhakal.......

28/10/2014
Prachin Konkan is an open air museum in Ganpatipule which is one amongst the most prominent attractions in Ganpatipule. ...
26/07/2014

Prachin Konkan is an open air museum in Ganpatipule which is one amongst the most prominent attractions in Ganpatipule. A major constituent of Ganpatipule ...

Village TourismAt Kokan, you can see the village life at the nearest.  The beauty of peaceful living will entice you to ...
18/07/2014

Village Tourism

At Kokan, you can see the village life at the nearest. The beauty of peaceful living will entice you to a lifetime as you get exposed to the nakedness of each village. We take special efforts in introducing you to the villageous tidbits as you would experience the Konkani delicious dishes, cultural demonstrations, cottage-life and more. The richness of village will arrest your attention as you see these self-sufficient villages make for a day’s living.

18/07/2014

Kokan Paryatan Specialties

Cultural Tourism
We offer you special occasions to know the cultural nuances of Kokan. During our weekend tours we organise various cultural programs for tourists which are performed by local artists. There are folk art forms like Zakhadi Nrutya (traditional folk dance for Godess Gauri & Ganpati), Gomucha Nach (folk dance played by local fishermen community), Dashavtar, Naman (local drama of Sindhudurga & Ratnagiri). All these will be organised every Saturday for tourists at Hedvi Beach (Guhaghar) & Rangoli Bunglow (Vengurla).

Backwater Tourism
With Kokan Paryatan, you have an exciting chance of Backwater tourism. This will include ride in the backwater of Dighi, Dabhol, Karde, Jaigad & Tarkarli backwaters. Tourists can experience virgin beauty of nature here, local fishermen life, fishing practices & can enjoy peaceful, untouched natural surroundings.

Agro Tourism
To know the bio-diversity of Kokan, you ought to take this one. We take the tourists to farms, plantations and fruit-groves and give them information about the agricultural landscape of Kokan. We identify and detail some of the rare plants which are only found in Kokan region.

Adventure Tourism
With us, you can enjoy motorbike Tour, Treck, Rivercrossing, Vally crossing, Paraceling, Snorkeling & Water Sports.

Other tourisms
Moreover, there are multiple tourism options for every Kokan visitor. The wide-stretched beaches offer a full-length Beach Tourism, while the holiness of the place offers a full-swing of religious mission.

Whoever be the visitors, whatever be their interests, Kokan Paryatan has all the plans for each of them. With us, you would experience not just Kokan only, but the life in it too.

Kokan Express...........!!!!!!!!!!!
16/07/2014

Kokan Express...........!!!!!!!!!!!

15/07/2014

रत्नागिरी जिल्हा.....

फलोत्पादन जिल्हा म्हणून नावारूपाला आलेला रत्नागिरी जिल्हा येत्या काही वर्षात पर्यटन जिल्हा म्हणून आपले वेगळे अस्तित्व निर्माण करत आहे. श्रीक्षेत्र गणपतीपुळे, श्री स्वामी स्वरूपानंद पावस या तिर्थक्षेत्रांमुळे रत्नागिरीचे नाव जागतिक नकाशावर गेले आहे. त्यात रत्नागिरीचा हापूस म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करून पर्यटकांना भूरळ घातली आहे. त्यामुळे दरवर्षी मोठ्या संख्येने जागतिक स्तरावरील पर्यटक रत्नागिरीतील पर्यटन स्थळांना भेट देत असतात. जिल्ह्याला विस्तीर्ण अशा समुद्र किनारपट्टी लाभली असून, जयगड, बाणकोट, रनपार आदी बंदरे उद्योगातून विकसीत होत आहेत. अनेक समुद्रकिनारे पर्यटकांना आकर्षित करीत आहेत. नगररत्नांची खाण असलेला हा जिल्हा विविध क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवून आहे.
बाणकोट - रत्नागिरीतील उत्तरेकडील शेवटचे टोक म्हणजे बाणकोट. खाडीकाठी वसलेले हे गाव. ब्रिटीश काळापासून या गावाला खूपच महत्व प्राप्त झाले आहे. प्रमुख खाड्यांपैकी बाणकोटची खाडी ही प्रमुख खाडी असून, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाळू उत्खननाचा उद्योग चालतो.
वेळास - नाना फडणिसांचे मूळ गाव म्हणून इतिहासात नोंदले गेलेले हे गाव म्हणजे वेळास. अत्यंत निसर्गरम्य असे हे गाव असून नारळ, सुपारी, हापूस आदी उत्पादने येथील प्रसिध्द आहेत. गावात दुर्गामातेचे मंदिर असून, याठिकाणी उत्तम शिल्पकला असलेली श्री कालभैरव, रामेश्‍वर, राम व वाघ्रेश्‍वर आदी देवळे आहेत.
केळशी - निसर्गसौंदर्याने नटलेले हे सुंदर गाव असून पर्यटकांना आकर्षित करणारा असा हा परिसर आहे. क्रांतिवीर वासूदेव फडके यांचे हे मूळ गाव. मराठेशाहीतील नामवंत सरदार फडके, केळकर, लागू हेदेखील याच गावचे. लोकमान्य टिळकांचे आजोळ देखील केळशीचे. याठिकाणी अनेक स्थळे प्रसिध्द आहेत. त्यामध्ये केळशीची महालक्ष्मी, याकूब बाबांचा दर्गा, पांढरा गणपती, श्री कालभैरव मंदिर, बेलेश्‍वर मंदिर, वाळूचा डोंगर, विश्‍वेश्‍वराचे देऊळ, दांडीचा वड, उटबरकरीण, आतगावचा टेप, खडप आदींचा समावेश आहे.
आंजर्ले - जिल्ह्यातील दापोली तालुक्यात समुद्रकिनारी वसलेले हे छोटे गाव. लांबच लांब व अतिशय स्वच्छ व सुंदर समुद्रकिनारा या ठिकाणी असून, नारळ, सुपारीच्या anjerliहिरव्यागार बागा येथे आहेत. पर्यटकांना भूरळ घालणारे असे हे गाव. आंजर्ल्याची खाडी, आंजर्ल्याचा समुद्रकिनारा, कड्यावरचा गणपती, मुर्डी, श्री दुर्गादेवीचे मंदिर आदी ठिकाणी अत्यंत नयनरम्य अशी आहेत.
हर्णे- जिल्ह्यातील प्रमुख बंदर म्हणून नावारूपाला आलेला हा परिसर. पुरातन काळापासून हे गाव वाहतुकीसाठी प्रसिध्द आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मत्स्यव्यवसाय चालतो. हर्णे गावाचे महत्व ओळखून या ठिकाणी जलदुर्गाची निर्मिती करण्यात आली. सुवर्णदुर्ग असे या किल्ल्याचे नाव असून, शिवाजी महाराजांच्या आरमाराचे हे प्रमुख स्थान होते. या जलदुर्गाच्या बाजूला असलेला भुईकोट किल्लाही पर्यटनासाठी चांगला आहे.
मुरूड - महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे मूळ गाव. आज हेच गाव पर्यटनाच्या नकाशावर आले आहे. पर्यटनाच्यादृष्टीने हे गाव अत्यंत सुंदर असून, या ठिकाणी पर्यटन महामंडळाच्यावतीने व्यवस्थाही करण्यात आली आहे.
आसूद - दरी डोंगरांमध्ये वसलेले हे छोटे गाव असून, या ठिकाणी निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केली आहे. आसूदचा लाकडी पूल ‘गारंबीचा बापू’ ने अजरामर केले. याशिवाय केशवराज मंदिर हेही पाहण्यासारखे आहे. पर्यटनासाठी हा गाव खूपच सुंदर आहे.
दाभोळ - दापोली तालुक्यातील आणखी एक महत्वाचे बंदर. एन्रॉनमुळे हे गाव जागतिक नकाशावर आहे. दाभोळला ऐतिहासिक महत्व असून, पूर्वापार व्यापार उदिमासाठी ते प्रसिध्द आहे. या ठिकाणी दिपगृह, दाभोळचा धक्का, दाभोळची चणकाई आदी ठिकाणी पाहण्यासारखी आहेत.
दापोली - मिनी महाबळेश्‍वर म्हणून नावारूपाला आलेले हे शहर म्हणजे दापोली. अत्यंत नयनरम्य असा हा परिसर असून, या ठिकाणी अनेक स्थळे पर्यटकांना नेहमीच भूरळ घालतात. दापोली कृषि विद्यापीठामुळे या शहराला वेगळेच महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे जागतिक स्तरावरील अनेक मंडळी ओळख त्यानिमित्ताने होते. दापोलीत अनेक स्थळे पर्यटनासाठी प्रसिध्द आहेत. त्यामध्ये एक म्हणजे चिखलगाव. लोकमान्य टिळकांचे हे मूळ गाव. चिखलगावप्रमाणे ऐतिहासिक महत्व असलेले दुसरे गाव म्हणजे पालगड. परमपुज्य साने गुरूजींे हे मूळ गाव. याशिवाय लाडघर, करसगाव आदी ठिकाणेही नयनरम्य व सुंदर आहेत. त्यामध्ये शहरातील तलाव, लक्ष्मीकेशव मंदिर, लेणी, आयनी, मेट, भोस्ते घाटी, महितपगड, सुमारगड, रसाळगड अशी अनेक ठिकाणे पर्यटकांना आकर्षित करणारी आहेत.
चिपळूण - जिल्ह्यातील प्रमुख शहर. लोटेतील औद्योगिकीकरणामुळे हा परिसर नावारूपाला आला आहे. वाशिष्ठी नदीच्या काठावर वसलेले गाव असून, या ठिकाणी अनेक स्थळे parshuramपाहण्यासारखी आहेत. त्यातील प्रामुख्याने प्रसिध्द असे ठिकाण म्हणजे परशुराम. भगवान परशुरामाचे कोकणातील सर्वात प्रसिध्द देऊळ या गावामध्ये आहे. हजारो भाविक या ठिकाणी येत असतात. याशिवाय सवतसडा, गोवळकोट किल्ला, विंध्यवासिनीचे मंदिर, गांधारेश्‍वर, डेरवण, दोणवली, करंजेश्‍वरी, रामतीर्थ आदी ठिकाणे पाहण्यासारखी आहे. डेरवण येथील शिवसृष्टीचा देखावा पर्यटकांना भूरळ घालतो. कोयनानगर - जलविद्युत प्रकल्पामुळे नावारूपाला आलेले हा परिसर. महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात वीज उपलब्ध करून देण्याचे काम या प्रकल्पातून होते. त्यामुळे हा प्रकल्प पाहण्यासाठी असंख्य पर्यटक दरवर्षी येत असतात. हापरिसर अत्यंत सुंदर असा आहे. सह्याद्रीच्या खोर्‍यात हे ठिकाण असल्याने गर्द झाडीने हा भाग वेढलेला आहे. या ठिकाणी कोयना धरण, कोयना अभयारण्य आदी ठिकाणे पर्यटकांना आकर्षित करणारी आहेत.
गुहागर - अत्यंत नयनरम्य असा समुद्रकिनारी वसलेले हे छोटेसे गाव. नारळी-पोफळीच्या बागांनी सजलेले हे गाव पर्यटकांना पाहण्यासारखे आहे. शांत, सुंदर असा हा परिसर असून, याठिकाणी अनेक ठिकाणे पाहण्यासारखी आहेत. तालुक्यातील हेदवी येथील दशभुजा गणपतीचे मंदिर अत्यंत सुंदर असे आहे. लक्ष्मीगणेशाचे हे देवस्थान प्राचीन असून, अत्यंत दुर्मिळ देवतांपैकी एक आहे. गुहागरचा समुद्रकिनारा नेहमीच पर्यटकांना आकर्षित करतो. सायंकाळी या ठिकाणी सुर्यास्त पाहणे हेहीएक आकर्षण असते. याशिवाय दुर्गामातेचे मंदिर, उरफाटा गणपती, व्याडेश्‍वर, वेळणेश्‍वर आदी ठिकाणी सुंदर आहेत. वेळणेश्‍वर येथील प्राचीन शिवमंदिर सुंदर असे आहे. याशिवाय रानवी, विजयगड आदी ठिकाणे पर्यटनासाठी चांगली आहेत.
संगमेश्‍वर - मुंबई-गोवा महामार्गावरील मुख्य ठिकाण. या तालुक्याला ऐतिहासिक महत्व आहे. शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजीराजे यांना संगमेश्‍वर येथील कसबा याठिकाणी अटक झाली. याठिकाणी असलेला प्रचितगड पर्यटकांना भूरळ घालतो. ट्रेकिंगसाठी हा गड अत्यंत चांगला आहे. याशिवाय या ठिकाणी अत्यंत प्राचीन अशी मंदिरे आहेत. त्यामध्ये कर्णेश्‍वर मंदिर, सूर्यनारायण मंदिर, आमनायेश्‍वर मंदिर, जाकमाता मंदिर, विष्णूमंदिर आदींचा समावेश आहे. धोदवणे तिवरे धबधबादेखील पर्यटकांना भूरळ घालणारा आहे.
मार्लेश्‍वर - संगमेश्‍वर तालुक्यातील महत्वाचे देवालय, सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले असून, निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी हे ठिकाण अत्यंत चांगले आहे. तेथील मार्लेश्‍वरचे मंदिर तर प्रसिध्द आहे. या मंदिरात आपल्याला नागांचे दर्शन घडते. मंदिराजवळ असलेला धारेश्‍वर हा धबधबा पर्यटकांना भूरळ घालणारा आहे. अत्यंत नयनरम्य असा हा परिसर असून, दरवर्षी लाखो भाविक या ठिकाणी येत असतात. याशिवाय महितपगड, विशाळगड आदी ठिकाणे पर्यटनासाठी चांगली आहेत.
रत्नागिरी - जिल्ह्याचे मुख्यालयाचे ठिकाण, पर्यटनाच्यादृष्टीने रत्नागिरी शहर विकसीत होऊ लागले आहे. रत्नागिरीत अनेक स्थळे पर्यटनाच्यादृष्टीने विकसीत होत आहे. ऐतिहासिक वारसा असलेले हे शहर. या ठिकाणी अनेक स्थळे पर्यटकांना भूरळ घालणारे आहेत. त्यामध्ये अठरा हाताचा गणपती, पतितपावन मंदिर, पांढरा समुद्र, काळा समुद्र मिरकरवाडा बंदर, भगवती किल्ला, श्रीदेव भैरी विठ्ठल रखुमाई मंदिर, मत्स्यालय, लाल गणपती, थिबा पॅलेस, थिबा पॉईंट, लोकमान्य टिळक जन्मस्थान आदींचा समावेश आहे. श्रीक्षेत्र गणपतीपुळे ganpatipuleजगप्रसिध्द असे हे ठिकाण असून, पर्यटन स्थळ म्हणून ते आता नावारूपाला आले आहे. नवसाला पावणारा गणपती म्हणून या क्षेत्राची ओळख असून, दरवर्षी लाखो भाविक या ठिकाणी येत असतात. समुद्रकिनारी हे मंदिर वसलेले असून, पर्यटकांना भूरळ घालणारे असे हे पर्यटन स्थळ आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्यावतीने हा परिसर विकसित केला जात असून, शासनाकडूनही या तिर्थक्षेत्राच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात सहकार्य करण्यात आले आहे.
मालगुंड -कवी केशवसुतांचे हे गाव. कवी केशवसुतांचे स्मारक या ठिकाणी उभारण्यात आले असू, श्री क्षेत्र गणपतीपुळे या ठिकाणी येणारे पर्यटक, भाविक मालगुंड येथील कवी केशवसूत स्मारकालाही भेट देत असतात. पर्यटकांना आकर्षित करणारे असे हे ठिकाण आहे. प्राचिन कोकणची ओळख पर्यटकांना करून देणारा प्रकल्प पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत असते. गणपतीपुळेजवळच हा प्राचिन कोकणचा प्रकल्प उभा राहिला असून, डोळ्यांचे पारणे फेडणारा असा हे प्राचिन कोकण वसविण्यात आले आहे.
जयगड बंदर व किल्ला - रत्नागिरीतील महत्वाचे ठिकाण. वाहतुकीसाठी सुरक्षित असे हे बंदर असून, या ठिकाणी जिंदाल वीज प्रकल्पामुळे हा भाग नावारूपाला आला आहे. येथील कर्‍हाटेश्‍वर मंदिर भाविकांचे श्रध्देचे ठिकाण आहे. जयगड किल्ला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणी येत असतात. ऐतिहासिक महत्व प्राप्त असलेला हा भाग पर्यटकांना भूरळ घालणार असा आहे.
पावस- श्री स्वामी स्वरूपानंद मंदिरामुळे जागतिक नकाशावर आलेले हे ठिकाण. या मंदिराला भेट देण्यासाठी तसेच स्वामी स्वरूपानंदांच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी भाविक येत असतात. श्री क्षेत्र गणपतीपुळे बरोबरच पावस येथील श्री स्वामी स्वरूपानंद मंदिर तिर्थक्षेत्र म्हणून विकसीत केले जात आहे.pawas
गणेशगुळे - हे देवस्थान महागणपतीचे असून, ते गणेशगुळे गावात अत्यंत नयनरम्य असा हा परिसर असून, या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक भेट देत असतात.
कोळीसरे येथील श्री भगवान महाविष्णूंचे देवस्थान पाहण्यासारखे आहे. निवळीचा धबधबा तर पर्यटकांना आकर्षित करणारा आहे. करबुड्याचा रेल्वे बोगदा हा आशियातील सर्वात मोठा बोगदा म्हणून ओळखला जातो. याशिवाय पूर्णगड किल्ला, नाणिज, पानवालचा रेल्वे पूल आदी ठिकाणे पाहण्यासारखी आहेत.
लांजा - लांजातील श्रीकालभैरव योगेश्‍वरी मंदिर, कोटचा सिध्दीविनायक, वनसुळे, एकखांबी गणपती मंदिर, लक्ष्मीकेशव देवस्थान, मल्लिकार्जुन आदी ठिकाणे सुंदर आहेत.
राजापूर - ऐतिहासिक महत्व असलेले हे गाव. राजापूरच्या गंगेमुळे धार्मिकदृष्ट्या नावारूपाला आलेले हे गाव. दर तीन वर्षांनी येणार्‍या गंगेसाठी राजापूर प्रसिध्द आहे. याशिवाय आडिवर्‍याची महाकाली, धूतपापोश्‍वर मंदिर, यशवंतगड, कनकादित्य, आर्यादुर्गा देवस्थान, अंजनेश्‍वराचे देऊळ आदी ठिकाणे सुंदर अशी आहेत. त्यामुळे पर्यटकांबरोबरच भाविकांची या ठिकाणी गर्दी होते.

Patholi (in Konkani) is a traditional dessert made during festivals or special occasions. Dumpling made of rice flour is...
15/07/2014

Patholi (in Konkani) is a traditional dessert made during festivals or special occasions. Dumpling made of rice flour is stuffed with coconut jaggery ...
who like this recipe like it fast.....!

Address

Amboli

Telephone

9561334340

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Konkan Tourism posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Konkan Tourism:

Share