अवधूत टूर्स

अवधूत टूर्स Email : [email protected]

We are arranging all Pilgrims tours as well School/Colleges Picnic Overall India.

02/08/2026
20/04/2024

आज दि. २० एप्रिल २०२४ रोजी श्रीक्षेत्र गाणगापूर पालखी दर्शन... 🙏

महाभारत युद्धातलं भोजन व्यवस्थापन....एक अत्यंत दुर्लभ कथा...  "God's shall be done"...कर्नाटकात उडुपी जिल्ह्यात असलेल्या...
14/08/2018

महाभारत युद्धातलं भोजन व्यवस्थापन....एक अत्यंत दुर्लभ कथा...

"God's shall be done"...

कर्नाटकात उडुपी जिल्ह्यात असलेल्या श्रीकृष्ण मठात ही कथा नेहमी सांगितली जाते. असं समजलं जातं की या मठाची स्थापना उडुपीच्या सम्राटाद्वारा झाली आणि नंतर मग ‌श्री. माधवाचार्यांनी ती परंपरा पुढे वृद्धींगत केली.

महाभारत हे पहिलं विश्वयुद्ध आणि त्यात पृथ्वीवरच्या सर्व राज्यांनी सहभाग घेतलेला होता...कोणी कौरवांकडून तर कोणी पांडवांकडून...

आपल्याला हे ठाऊक आहेच की केवळ श्रीबलराम आणि रुक्मी या दोघाच नरेशांनी यात भाग घेतला नव्हता. पण सध्या कर्नाटकात असलेल्या 'उडुपी' राज्याच्या नरेशानंही या युद्धात भाग घेतला नव्हता. जेंव्हा उडुपी राजा आपल्या सैन्यासह कुरुक्षेत्रावर पोहोचले तेंव्हा कौरव आणि पांडव दोघांनीही त्यांना आपापल्या बाजूला सामिल करण्याचा प्रयत्न केला.

पण अत्यंत दूरदर्शी उडुपीच्या राजानं श्रीकृष्णांना विचारलं "हे माधवा, या दोन्हीही बाजू युद्धासाठी जेंव्हा सज्ज होतील तेंव्हा त्यांच्या या विशाल सेनांच्या भोजनाचा प्रबंध कसा होईल? हे वासुदेवा, या युद्धात भाग घेण्याची माझी इच्छा नाहीये. पण जर आपण अनुमती दिलीत तर माझ्या संपूर्ण सेनेच्या सहाय्यानं इथे उपस्थित असलेल्या या विशाल सेनांच्या भोजनाचा मी प्रबंध करु शकतो."

त्यावर श्रीकृष्ण अत्यंत प्रसन्न स्वरात म्हणाले, "सागरासारख्या या विशाल सेनांच्या भोजनाचा प्रबंध करणे जे केवळ तुम्ही आणि भीमसेनच करु शकतात...अन्य कोणीही नाही. पण भीम तर या युद्धातून अंग काढून घेऊ शकत नाही. त्यामुळे तुम्हीच या विशाल सेनांच्या भोजनाचा प्रबंध करावा."

उडुपी नरेशाचा भोजन प्रबंध एवढा कुशल होता की युद्धाच्या प्रारंभापासून अखेरपर्यंत अन्नाचं एक शीतही वाया गेलं नाही. जसं-जसं युद्ध होत गेलं तसं-तसं योद्ध्यांची संख्या कमी कमी होत गेली. सगळ्यांनाच याचं अत्यंत आश्चर्य वाटत होतं की उडुपी नरेश केवळ उपस्थित सेनेपुरतंच अन्न कसं काय बनवून घेऊ शकतात. आज भोजनाला कितीजण उपस्थित असतील हे त्यांना कळतं तरी कसं? आजच्या युद्धात किती योद्धे मृत्युमुखी पडणार आहेत हे त्यांना समजतं तरी कसं आणि त्यानुसार भोजनाचा प्रबंध कसा काय करता येतो?

युद्ध समाप्तीनंतर राज्याभिषेकाच्या दिवशी युधिष्ठिरानं न रहावून त्याबद्दल उडुपी नरेशांना विचारलंच, "हे उडुपी महाराज, या युद्धात विजय मिळवल्याबद्दल आमची सर्वत्र प्रशंसा होते आहे. पण आपणही तेवढ्याच प्रशंसेसाठी पात्र आहात. आपण एवढ्या विशाल सेनांच्या भोजनाचा प्रबंध केला परंतु अन्नाचा एक कणही यात व्यर्थ गेला नाही. आपल्या या कुशलतेचं रहस्य मला जाणून घ्यायचंय."

यावर हसतच उडुपी नरेशांनी उत्तर दिलं, "सम्राट, या युद्धात आपल्याला मिळालेल्या विजयाचं श्रेय आपण कोणाला द्याल?"

यावर युधिष्ठिर उत्तरले, "अर्थात्, श्रीकृष्ण... त्यांच्या व्यतिरिक्त हे श्रेय अन्य कोणाला कसे द्यावे? ते नसते तर कौरव सेनेला हरवणं असंभवच होतं."

त्यावर उडुपी नरेश म्हणाले, "हे महाराज, भोजन प्रबंध आपल्याला माझी कुशलता वाटते आहे, पण खरंतर हा श्रीकृष्णप्रतापच आहे." ते ऐकून सर्वच उपस्थितांना आश्चर्य वाटलं.

उडुपी नरेशांनी रहस्य उलगडताना सांगितलं, "हे महाराज, युद्धकाळात दर रात्री श्रीकृष्ण भुईमुगाच्या शेंगा खात असत. त्यांच्या शिबिरात मी दररोज भुईमुगाच्या शेंगा मोजून ठेवायचो आणि त्यांनी किती शेंगा खाल्ल्या हेदेखिल मी पुन्हा मोजून ठेवायचो. भुईमुगाच्या जेवढ्या शेंगा ते खायचे त्याच्या १००० पट सैनिक दुस-या दिवशीच्या युद्धात मृत्युमुखी पडत. उदा. जर त्यांनी ५० शेंगा खाल्ल्या तर मला समजायचं की दुस-या दिवशीच्या युद्धात ५०००० योद्धा मारले जाणार आहेत. आणि मग त्यानुसारच मी भोजन कमी अधिक बनवत असे. आणि याच कारणामुळे कधीही भोजन व्यर्थ गेलं नाही." श्रीकृष्णाचा हा चमत्कार ऐकून सर्वजण नतमस्तक झाले.

 #श्रीपादांची  #भक्तांना  #सांगितलेली  #बारा  #अभय  #वचने१)    माझ्या चरित्राचे पारायण होत असलेल्या प्रत्येक स्थळी मी सु...
11/08/2018

#श्रीपादांची #भक्तांना #सांगितलेली #बारा #अभय #वचने

१) माझ्या चरित्राचे पारायण होत असलेल्या प्रत्येक स्थळी मी सुक्ष्म रूपात असतो.
२) मनो वाक् काय कर्मणा मला समर्पित असलेल्या साधकांचा मी डोळ्यात तेल घालून संभाळ करतो.
३) श्री पीठिकापुरममध्ये मी प्रतिदिन मध्यान्ह काळी भिक्षा स्वीकारतो. माझे येणे दैव रहस्य आहे.
४) सतत माझे ध्यान करणाऱ्यांचे कर्म, ते कितीही जन्मजन्मांतरीचे असले तरी मी ते भस्म करून टाकतो.
५) (अन्न हेच परब्रह्म-अन्नमोरामचंद्राय) अन्नासाठी तळमळणाऱ्यांना अन्न दिल्यास, मी त्या दात्यास नक्कीच प्रसन्न होतो.
६) मी श्रीपाद श्रीवल्लभ आहे. माझ्या भक्तांच्या घरी महालक्ष्मी तिच्या संपूर्ण कलेने प्रकाशित असते.
७) तुमचे अंत:करण शुद्ध असले तर माझा कटाक्ष सदैव तुमच्यावर असतो.
८) तुम्ही ज्या देवता स्वरूपाची आराधना कराल, ज्या सद्गुरूंची उपासना कराल ती मलाच प्राप्त होईल.
९) तुम्ही केलेली प्रार्थना मलाच पोचते. माझा अनुग्रह/आशिर्वाद तुम्ही आराधिलेल्या देवतेच्या स्वरूपाद्वारे, तुमच्या सद्गुरुद्वारे तुम्हाला प्राप्त होतो.
१०) श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे केवळ नामरूपच नाही. सकल देवता स्वरूप समस्त शक्तिचे अंश मिळून माझे विराट स्वरूप, अनुष्ठानाद्वारेच तुम्हाला समजू शकेल.
११) श्रीपाद श्रीवल्लभ हा माझा संपूर्ण योग अवतार आहे. जे महायोगी, महासिद्धपुरुष माझे नित्य ध्यान करतात ते माझेच अंश आहेत.
१२) तुम्ही माझी आराधना केली तर मी तुम्हाला धर्ममार्गाचा, कर्म मार्गाचा बोध करतो. तुम्ही पतित होऊ नये म्हणून सदैव मी तुमचे रक्षण करतो.

अपराध क्षमा आता केला पाहिजे।गुरु हा केला पाहिजे।अबद्ध सुबद्ध गुण वर्णियले तुझे।।धृ।।नकळेची टाळ वीणा वाजला कैसा।गुरु हा व...
10/08/2018

अपराध क्षमा आता केला पाहिजे।गुरु हा केला पाहिजे।अबद्ध सुबद्ध गुण वर्णियले तुझे।।धृ।।नकळेची टाळ वीणा वाजला कैसा।गुरु हा वाजला कैसा।अस्ताव्यस्त पडे नाद गेला भलतैसा।।1।।नाही ताल राग ज्ञान कंठ सुस्वर।गुरु हा कंठ सुस्वर।झाला नाही बरा वाचे वर्ण उच्चार।।2।।निरंजन म्हणे तुझे वेडे वाकुडे।गुरु हे वेडेवाकुडे।गुणदोष न लावावा सेवकाकडे।।3।।

 #श्रीपाद  #श्रीवल्लभ  #जन्म  #कथादत्तात्रेय आपळराज ब्राह्मणाच्या घरी गेले त्यावेळी श्राद्धकर्मासाठी आलेल्या ब्राह्मणांच...
09/08/2018

#श्रीपाद #श्रीवल्लभ #जन्म #कथा

दत्तात्रेय आपळराज ब्राह्मणाच्या घरी गेले त्यावेळी श्राद्धकर्मासाठी आलेल्या ब्राह्मणांचे भोजन व्हावयाचे होते. ते झाल्याखेरीज अतिथीला भोजन घालणे शास्त्राच्या विरुद्ध होते; परंतु त्या तेज:पुंज अतिथीला विन्मुख पाठवणेही सुमतीला प्रशस्त वाटले नाही व तिने अगत्याने दत्तगुरूंना भोजन दिले. सुमतीचा उत्कट श्रद्धाभाव पाहून दत्तात्रेयांनी आपले खरे स्वरूप प्रकट करून तिला म्हणाले, की ‘‘माते, तुझ्या भोजनामुळे मी खूपच संतुष्ट झालो आहे. तुला काय हवे ते माग.’’ त्यावर सुमती समयसूचकतेने म्हणाली, की ‘‘आम्हाला एक सुलक्षणी पुत्र व्हावा, अशी आमची इच्छा आहे. कारण आम्हाला दोन पुत्र आहेत; पण आमच्या दुर्दैवाने एक पांगळा आणि दुसरा आंधळा आहे.’’

मग दत्तात्रेयांनी प्रसन्न हास्य करून ‘‘तथास्तु’’ असा आशीर्वाद सुमतीला दिला आणि ते अंतर्धान पावले. अशा रीतीने अमावस्येला अतिथीला भोजन देऊन तृप्त केल्यावर सुमती यथावकाश गर्भवती झाली. कालांतराने त्या ब्राह्मण दांपत्याला पुत्र प्राप्ती झाली. ‘श्रीपाद’ असे त्याचे नामकरण करण्यात आले. बीजेच्या चंद्राप्रमाणे श्रीपाद चंद्रकलेप्रमाणे वाढू लागला. सातव्या वर्षी त्याचे मौजीबंधन झाले व तेव्हापासून तो चारही वेद खडाखड म्हणू लागला. इतकेच नव्हे, तर मीमांसा आणि तर्कावर तो अधिकारवाणीने भाष्य करू लागला. परिणामी आपळराज व सुमती हे दांपत्य व पीठापूरच्या पंचक्रोशीतले ग्रामस्थ चकित झाले. यथावकाश श्रीपादच्या सोळाव्या वर्षी विवाहाचा घाट घालण्याचे आपळराज व सुमती दांपत्याने ठरविले व आपला मानस त्याला बोलून दाखवला; पण त्याने स्पष्ट शब्दांत नकार दिला व तो हसून म्हणाला, की ‘‘वैराग्य हीच माझी स्त्री असून अन्य स्त्रिया मला मातेसमान आहेत.’’ तसेच "जाणे असे उत्तरपंथा |दीक्षा द्यावया साधुजना ||"
असे आपले अवतारकार्य असल्याचे श्रीपाद वल्लभांनी त्यांना निक्षून सांगितले. इतकेच नव्हे, तर आपण आता तीर्थयात्रेला घर सोडून जाणार असल्याचा मनोदय आपल्या माता-पित्यापुढे प्रकट केला. परिणामी त्या दांपत्यावर जणू कुर्‍हाडच कोसळली. त्यांनी सर्वार्थाने श्रीपादला कडाडून विरोध केला; पण तो आपल्या निर्णयापासून तसूभरही ढळला नाही.

पुढे कालियुगाच्या प्रारंभी मलिन झालेल्या सनातन संस्कृतीला उजाळा देण्याकरिता व भक्त जनांना तारण्याकरिता "श्रीपादश्रीवल्लभ" नामक हा दत्तात्रेयांचा दुसरा अवतार पिठापूर नामक नगरात झाला. इ. स. १३२०. भक्तांनुग्रहाकारणे ते तीर्थ यात्रेस निघाले. फिरत फिरत रायचूर जिल्ह्यात असलेल्या कुरवपूर (कुरगड्डी) येथे येऊन वास्तव्यास राहिले. श्रीपादश्रीवल्लभांचे दिव्यरूप असे होते- पायात दिव्य खडावा, कटीला कौपिन व मेखला, अंगावर काशाय वस्त्र हातात कमंडलू, गळ्यात रुद्राक्ष माळ, कपाळी भस्म, व मस्तकी जटाजुट धारण केलेली, कमळा प्रमाणे प्रफुल्ल लोचनांची व मंद स्मितयुक्त चंद्रतुल्य मदन मनोहर वदनाची! श्रीपादप्रभूंची दया, क्षमा शमद मालांकृत भव्य मूर्ती अवलोकन करणारे सर्व लोक धन्य होत! ते कृष्णामाईत त्रिकाल स्नान करीत असत. रोज प्रातःकाळी संध्येत १००० गायत्री जपत तर सूर्यनारायणास १०८ नमस्कार घालीत.

मग सुमती कळवळून त्याला म्हणाली, की ‘‘अरे श्रीपादा, तू आम्हाला सोडून गेल्यावर तुझ्या पांगळ्या आणि आंधळ्या भावंडांकडे कोण बघणार? आम्ही काही जन्मभर त्यांना पुरणार नाही.’’ मंद स्मित करीत श्रीपादाने आपल्या दोन्ही बंधूंना हाक मारली आणि त्या दोघांच्या मस्तकावर हात ठेवला आणि काय आश्चर्य! पांगळा धावू लागला आणि आंधळ्याला दृष्टी आली. मग श्रीपाद जड अंत:करणाने निरोप घेऊन तीर्थयात्रेला रवाना झाले. श्रीक्षेत्र काशीला मनोवेगाने जाऊन तेथे गुप्त रूपाने राहिले. तेथून पुढे बद्रिकाश्रमात नारायणाचे दर्शन घेऊन गोकर्णास आले. तेथे तीन वर्षे वास्तव्य करून ते कुरवपुरास प्रकट झाले.

गंगा-यमुना या पवित्र नद्यांच्या तिरावर वसलेल्या कुरवपुरात एक वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण वास्तव्याला होता. त्याच्या पत्नीचे नाव ‘अंबिका’. ते ब्राह्मण दांपत्य दु:खी होते. त्यांची अपत्ये जगत नसत. कालांतराने त्यांना एक पुत्र झाला; पण तो मतिमंद होता. त्याचे विद्याभ्यासात लक्ष नव्हते. तो मतिमंद असला तरी जात्याच हूड होता. वेदाध्ययन न करता दिवसाचा बहुतेक वेळ तो गावात उनाडक्या करण्यात घालवत असे. परिणामी ब्राह्मण त्याला मारझोड करीत असे. तो रडू लागताच ब्राह्मणी आपल्या पतीला म्हणे, की ‘‘त्याला मारण्याचे तुम्ही थांबवले नाही तर मी प्राणत्याग करीन.’’

ब्राह्मणाचा निरुपाय झाला. त्याने मारझोड थांबवली; पण अल्पावधीतच किरकोळ आजाराचे निमित्त होऊन तो हे जग सोडून गेला. अंबिका, पतीच्या वियोगामुळे अतिशय दु:खी झाली. पित्याच्या मृत्यूचा त्या वांड मुलावर यत्किंचितही परिणाम झाला नाही. शेवटी ती एकुलता एक मुलगा अत्यंत मूढ निघाला म्हणून जीवनाला वैतागून गंगेत मुलासह देहत्याग करण्यास सिद्ध झाली होती. श्रीपाद श्रीवल्लभही त्यावेळी गंगास्नानासाठी तेथे आले होते. त्यांची तेजोमय, प्रसन्न मूर्ती पाहून देहत्यागापूर्वी त्यांचे दर्शन घ्यावे असा विचार करुन अंबिका मुलासह त्यांचेजवळ आली व आपल्या प्राणत्यागाचा हेतू प्रकट करून त्यांना म्हणाली, की ‘‘स्वामी, पुढच्या जन्मी तरी तुमच्यासारखा व सर्वांना पूज्य तसेच, वंदनीय पुत्र मला होऊ दे.’’ त्यावर श्रीपाद श्रीवल्लभ तिला म्हणाले, की ‘‘शनिप्रदोषाच्या दिवशी म्हणजे ज्या शनिवारी त्रयोदशी असेल त्या दिवशी, तू शंकराची मनोभावे पूजा कर. तुझी मनोकामना पूर्ण होईल.’’

श्रीपाद श्रीवल्लभांनाच कालांतराने ‘श्रीनृसिंह सरस्वती’ या नावाने अवतार घ्यावयाचा होता व त्याची ही पूर्वपिठीका अशा प्रकारे तयार झाली होती आणि ती सांगण्यासाठीच श्रीपाद श्रीवल्लभांचे चरित्र ‘गुरुचरित्रा’च्या कर्त्याने म्हणजेच सरस्वती गंगाधरांनी आपल्या ग्रंथात दिले आहे.

‘‘आणिक कार्य कारणासी | अवतार घेऊ परियेसी |
वेष धरुनि संन्यासी | नाम नरसिंहसरस्वती ||’’

या ओव्या या दृष्टीने चिंतनीय आहेत.

Address

Pathardi Phata
Cidco
422009

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when अवधूत टूर्स posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category