Yash Lakshmi Holidays - Alibaug

Yash Lakshmi Holidays - Alibaug Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Yash Lakshmi Holidays - Alibaug, Alibag, Nagaon, Kotharbhat, Alibag.

Season's last popati पार्टी
01/03/2021

Season's last popati पार्टी

11/06/2020

निसर्गाचा हा:हा: कार...

अलिबाग येथील चौल गावाचे झालेले अपरिमित नुकसान..निसर्गाने पुन्हा एकदा दाखवुन दिले..माणूस कितीही मोठा झाला यशस्वी झाला तरीही निसर्गाच्या शक्ती पुढे तो क्षुल्लक आहे. आज रायगड जील्ह्यासह अवघ्या कोकणची झालेली हानी न भरून निघणारी आहेच. परंतु अलिबागकर आणि समस्त कोकण वासीय याही दुखःद परिस्थितीवर मात करून पुन्हा दिमाखाने उभे राहतील याची खात्री आहे.

मनाला आंतरिक समाधान देणारा, देहभान वीसरायला लावणारा हा निसर्ग जेव्हा रौद्र रुप धारण करून अतोनात हानी करतो त्या वेळी खरंच महान मानव प्राणी सुद्धा निःशब्द होतो...

🙏🙏

०३ जून चक्रीवादळाचा तो भयानक दिवस…..⛈️🌦️⚡🌩️‘निसर्ग’ नावाचे चक्रीवादळ धडकणार असल्याची माहिती रायगड जिल्ह्यातील गावागावात ...
11/06/2020

०३ जून चक्रीवादळाचा तो भयानक दिवस…..⛈️🌦️⚡🌩️
‘निसर्ग’ नावाचे चक्रीवादळ धडकणार असल्याची माहिती रायगड जिल्ह्यातील गावागावात पोहोचली होती. किनार्‍यावरच्या गावांना जास्त धोका असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे शक्य तेवढी काळजी घेत नागरिक घरामध्ये थांबले होते. ‘हवामान विभागाचा अंदाज नेहमीप्रमाणे चुकणार’ असे पकडून चालणारेदेखील काहीजण होते. मात्र ते आलेच. सकाळी दहा-साडेदहाच्या सुमारास हरिहरेश्‍वरपासून शंभर किलोमीटर आत समुद्रात चक्रीवादळ धडकल्याची बातमी आली आणि मनाची घालमेल सुरु झाली.

श्रीवर्धनमध्ये वादळाने एंट्री केली....श्रीवर्धन, म्हसळा, मुरुड, अलिबाग पलिकडे मंडणगड, दापोली , गोरेगाव , मांणगाव, इंदापूर, रोहा..येथे या वादळाने अक्षरशः थैमान घातले होते. कच्ची आणि पत्र्यांची घरे जागेवर राहिली नाहीत. तुफानी वादळ १२० किमीच्या वेगाने अलिबागच्या दिशेने सरकत होते. झाडे, वेली बुंधापासून कापत होते. मान मुरुगळून मारावे इतक्या निर्दयीपणे ही झाडं कोसळत होती. वाघनख्या खुपसाव्यात अशी चिरली जात होती. आंबा, फणस, काजू, नारळ, सुपारीसह रानातील सर्वच बाजत्या झाडांखाली फळांची पखरण पसरली होती. या वादळात पशू-पक्ष्यांनी स्वतःचे रक्षण कसे केले असेल? कोणास ठाऊक.

या परिस्थितीत माणसाचा दुटप्पीपणा लक्षात घेण्यासारखा आहे. कोरोना ही महामारी आटोक्यात आणण्यासाठी गेले अडिच महिने लॉकडाऊन पुकारण्यात आला. जनता कर्फ्यूदेखील सर्वांनी पाहिला. सगळे बंद असूनही सगळे सुरु असल्याचे चित्र दिसत होते. कोणाला मेडीकलला जायचे होते. कोणाला भाजी आणायची होती तर कोणाला दुध. गर्दी कमी होत नव्हती. परंतू ०३ जूनला जणूकाही निसर्गानेच जनता कर्फ्य पुकारला होता. एक व्यक्ती की वाहन रस्त्यावर दिसत नव्हते. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली फिरणारेही आज घरामध्ये चिडीचूप घरात बसले होते. काय होईल? कोणालाच कळत नव्हेत. कोरोनामुळे सरकार फक्त घरी बसा एवढेच सांगत होते. इथे निसर्गाने तर घरातदेखील जीव मुठीत घेऊन बसायला भाग पाडले. हवामान खात्याचा अंदाज आता चुकत नाही, हेदेखील स्पष्ट झाले.

असो, सांगायचे तात्पर्य हे की, घरी बसल्यामुळे मोठी जीवितहानी टळली होती. चक्रीवादळाचे लोकेशन मोबाईल आणि नेट असलेला प्रत्येक माणूस घरी बसून बघत होता. यामुळेच आवश्यक ती काळजी घेणे सोपे गेले. दुर्दैवाने चारजणांचा मृत्यू झालाच. या चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीचे प्रचंड नुकसान केले आहे. डोक्याच्या वरुन छप्पर उडताना पाहणे म्हणजे स्वतःचा मृत्यू उघड्या डोळ्यांनी पाहण्याचा तो अनुभव कधीही विसरता येणारा नाही. ते सहा तास प्रत्येक माणूस मृत्यूशी झुंजत होता. जीव मुठीत घेऊन बसला होता. आज सात दिवस झाले…‘आपण वाचलो’ हे समाधान सोडले तर हातात काहीही उरलेले नाही.. असो.. या.. प्रचंड नुकसानीतून .. पुन्हा उभे राहण्यासाठी .. परत ..कामाला लागू या.. व सर्वांना पुन्हा सावरण्याची ताकद . उमेद..बळ मिळो हिच ईश्वर चरणी प्रार्थना ..
🙏🏻🙏

Copy paste. राजेंद्र मोरे यांच्या कडून साभार.

12/10/2019

गोष्ट भाऊच्या धक्क्याची .....सर्वांनी शेअर करावी अशी माहिती !!

एकेकाळी कोकणी आणि गोंयकार प्रवाशांनी गजबजणाऱ्या मुंबईतील भाऊच्या धक्क्य़ाला यंदा दीडशे र्वष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने भाऊच्या धक्क्य़ाच्या इतिहासाची ही सफर..
बंदरापलीकडील रेवसहून अखेरची बोट सातवाजता भाऊच्या धक्क्य़ाला लागली आणि दिवसभर गजबजलेला तो कोकणी माणसाचा सखा- भाऊचा धक्का सुस्तावला.
गेली दीडशे वर्षे अव्याहतपणे मुंबईत कोकण्यांची आणि गोवेकरांची सेवा करणाऱ्या या धक्क्य़ाच्या प्रत्येक चिऱ्याला मग वाचा फुटली.
कारण अलिबागहून आलेल्या एका नवश्रीमंत फार्महाऊसवाल्याने ‘ये कौन भाऊ है जी?’..

टर्मिनस को जिसका नाम दिया है वो?’ असे कुत्सित उद्गार काढले. गेली दीड शतके या धक्क्य़ावर गरीब कोकणवासी मुंबईत मिसळून जाण्यासाठी उतरत असत.
त्यांना हा प्रश्न कधी पडला नाही. उलटअभिमान असा की, ‘भाऊ’ हे घरगुती बिरुद जलवाहतुकीच्या टर्मिनसला दिले आहे आणि ते अनेक बेस्ट बसेसवर मराठीत झळकत आहे! कारण याचा जन्मदाता भाऊ अजिंक्य हा पक्का मुंबईकर! पाठारे प्रभू या मुंबईच्या आद्य रहिवाशांपैकी एक बांधकाम कंत्राटदार.
स्वधन मुंबईच्या हितासाठी खर्चिणारा.
ब्रिटिश राजवटीत कुलाब्याच्या गन फॅक्टरीत हा भाऊ कारकून होता. कॅप्टन रसेल हा तोफखाना विभागातील नामांकित अधिकारी.
त्याच्या विभागात एकदा एका मराठी माणसाने चोरी केली. त्याला लष्करी शिस्तीनुसार फटक्यांची शिक्षा सुनावण्यात आली. एका गरीब मराठी तरुणाला सर्वासमक्ष फटके मिळूनत्याची बदनामी होणार, त्यामुळे लक्ष्मण अजिंक्य अस्वस्थ झाला.
त्याने रसेलसाहेबाकडे कामगाराच्या वतीने क्षमायाचना केली.
स्वत: देशाभिमानी असलेल्या कॅ. रसेलला, स्वदेशाचा विचार करून एका कामगाराचे फटके वाचविणाऱ्या हेडक्लार्क अजिंक्य या क्षुल्लक कामगाराविषयी आदर निर्माण झाला.
कॅ . रसेलने लक्ष्मणला मिठी मारून ‘यू आर माय ब्रदर!’ असे उद्गार काढून त्याची पाठ थोपटली.
या उद्गारांमुळे लक्ष्मण अजिंक्यला ‘भाऊ’ हे नाव पडले ते कायमचे!
कॅ. रसेलने या भाऊला व्यापारीक्षेत्रात शिरण्यास उद्युक्त केले.
मुंबईत असलेली डबकी आणि सांडपाणी तलाव, मुंबईच्याच कचऱ्याने बुजविण्याचे काम त्या काळी सुरू झालेहोते. भाऊला हे कंत्राट मिळाले. कॅ. रसेलसंबंधी कृतज्ञता म्हणून त्याने आपल्या कंपनीचे नाव ‘भाऊ रसेल आणि कंपनी’ असे दिले.
मुंबईच्या पूर्वकिनाऱ्यावर भरणी घालून कारनॅक बंदर आणि क्लेअर बंदर उभारणीचे कामहीही कंपनी करीत होती.
तेव्हा आपल्या मराठी माणसांचा जलप्रवास सुखकर व्हावा, यासाठी एक धक्का असावा, असा विचार भाऊ अजिंक्यच्या मनात बळावला. ईस्ट इंडिया कंपनी आणि पोर्ट ट्रस्ट यांची अनुमती मिळवून त्याने तो स्वखर्चाने अमलात आणला.
कोकणच्या जलवाहतुकीसाठी पुढे दीडशे वर्षे वापरात असलेला ‘भाऊचा धक्का!’ भाऊ रसेल म्हणजेच लक्ष्मण अजिंक्यचे जिवंत स्मारक!
रस्ता वाहतुकीसाठी एसटीचा जन्म झाला नव्हता, त्या काळी अध्र्याअधिक मुंबईकरांचे मूळ कोकणात होते. बेशिस्तीच्या खासगी बस वाहतुकीपेक्षाही त्या काळी कोकणातून मुंबईकडे प्रवास जलमार्गानेच व्हायचा. १८६२ साली भाऊ रसेलने हा धक्का बांधण्यापूर्वी उतारूंचे बोटीतून जमिनीवर पाय टेकेपर्यंत खूप हाल व्हायचे. रात्रभर प्रवास करून आलेली बोट समुद्रात लांब कोठे तरी नांगर टाकायची.
मग मोठय़ा हिंदकळणाऱ्या होडय़ांमधून प्रवासी खच्चून भरून, चिखलाने भरलेल्या मुंबईच्या पूर्व किनाऱ्यावर पाऊल ठेवायचे. गोदीत कंत्राटदारी करणारा भाऊ हे दृश्य पाहून रोज हळहळत असे. ब्रिटिश सरकार हे हाल निवारण्यासाठी काही करणार नाही, हे लक्षात आल्यानंतरत्यांच्याच पैशावर गडगंज झालेल्या कंत्राटदार भाऊ अजिंक्यने धक्का स्वत:च उभारण्याचे ठरवले आणि अल्पावधीतच कोकणी माणसांच्या हक्काचा धक्का तयार झाला.
कालांतराने कोकण आणि गोव्याकडे जाणारी जलवाहतूक बंद पडली तरी १९७० पर्यंत भाऊचा धक्का दिवसभर प्रवाशांनी गजबजलेला असे. सकाळी साडेसहा वाजता रेवस-धरमतरकडे जाणारी छोटी बोट सुटली की, आठ वाजता दाभोळ बंदरापर्यंतची मोठी बोट सुटत असे. लागोपाठ रत्नागिरी, विजयदुर्ग, गोवा या लाइनीवरील अगडबंब बोट सुटत असे. याबोटी निघून गेल्या तरी आदल्या दिवशी कोकण-गोव्याकडे गेलेल्या बोटी परतण्याची वेळ झाल्यामुळे दुपापर्यंत भाऊच्या धक्क्य़ाला उसंत नसेच.
या काळात भाऊच्या धक्क्य़ाचा अवतार. रेल्वेच्या कुठल्याही टर्मिनसवर न दिसणारा असा बेंगरुळ.
बोट धक्क्य़ाला टेकण्याच्या सुमारास, लाल डगलेवाल्याहमालांचा जथा.
एक गलेलठ्ठ जाडीचा दोरखंड घेऊन तो डेकवर फेकण्यासाठी सज्ज दिसे. मुख्य डेकवर तोंडात चिरूट धरलेला शुभ्र वस्त्रातील गोवेकर कॅप्टन ‘..आऽऽरी माऽऽर, आऽरीऽमाऽऽर’ अशी अनाकलनीय ऑर्डर देऊन बोट धक्क्य़ाला समांतर आणीत असे.
बोटीवरून खेचून घेतलेला जाड दोरखंड धक्क्य़ावरील दगडी मनोऱ्याला (कॅपस्टन) बांधला की, हमालांचा जथ्था बोट खेचून धक्क्य़ाला अंगलट करीत असत. सशक्त, चपळ हमाल बोट आणि धक्का यांना जोडणारा सेतू लागण्याच्या अगोदरच कठडय़ावरून हनुमानउडी मारून आत घुसून प्रवाशांचा कब्जा घेऊ पाहत.
कोकणी प्रवासी वैतागलेल्या गबाळ्या अवतारात, लाल मातीने रापलेल्या कपडय़ात, एकदा भूमीवर केव्हा पाऊल ठेवतो, यासाठी आतुर असे. वांत्या करून थकलेले चेहरे, ढीगभर वळकटय़ा आणि आंबा-फणसाची पोती उचलण्याची करामत करताना तो केविलवाणा होई. तरीही आपल्या गावच्या मातीची ऊब घेतलेला कोकणी माणूस नव्या उत्साहाने गजबजलेल्या मुंबईत धनार्जनासाठी मिसळून जात असे.

एके काळी दिवसभर गजबजलेला भाऊचा धक्का आता वयस्कर माणसासारखा सुस्त झाला आहे. आधुनिक कोकण रेल्वे त्याला वाकुल्या दाखवीत असली तरी स्थितप्रज्ञ ज्येष्ठाच्या नात्याने तो निनादत असतो,
‘मीच खरा कोकणी माणसाचा जिवाचा सखा!’

कोकण म्हंटले कि डोळ्यासमोर उभी राहते ती गर्द हिरवाई, नारळी पोफळीच्या बागा, कधी शांत तर कधी खवळलेला समुद्र!! 🌴🌴 🏝️ अशाच ख...
12/10/2019

कोकण म्हंटले कि डोळ्यासमोर उभी राहते ती गर्द हिरवाई, नारळी पोफळीच्या बागा, कधी शांत तर कधी खवळलेला समुद्र!! 🌴🌴 🏝️

अशाच खवळलेल्या समुद्राच्या बाजूने डौलाने जाणारी जंजिऱ्याची राणी 🚌

श्रावणातील पहिला श्रावणी सोमवार तसेचपवित्र श्रावणमासातल्या पहिल्या सणाच्या,म्हणजेच नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !!अलिबा...
06/08/2019

श्रावणातील पहिला श्रावणी सोमवार तसेच
पवित्र श्रावणमासातल्या पहिल्या सणाच्या,म्हणजेच
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !!
अलिबाग पासून १३ किमी अंतरावर असलेल्या किहीम समुद्रकिनाऱ्यावरील हे दृश्य.सदर शिवलिंग हे श्रावण महिन्यात दरवर्षी किहीम समुद्रकिनारी दिसून येते.ओहोटीच्या वेळी समुद्राचे पाणी मागे गेल्यावर या शिवलिंगाचे दर्शन घेता येते.
मागील बाजूस उंदेरी आणि खांदेरी जलदुर्गदेखील दिसून येत आहेत. जास्तीत जास्त शेअर करा आणि दर्शन घेण्यास जरूर या.(ओहोटीच्या वेळेतच पिंडीचे दर्शन घेता येते)
ओम नमः शिवाय......
http://kokanplaces.com
www.sagardarshan.co.in

" #हरवलेला_मे_महिना.."😔तुळशीमागला औदुंबर,🌿ते कौलारु  #मायेचं घर..🏡कवठीचाफा,  #सोनचाफा,🌼कर्दळ नी पांढरा चाफा,☘गावठी गुलाब...
07/05/2019

" #हरवलेला_मे_महिना.."😔

तुळशीमागला औदुंबर,🌿
ते कौलारु #मायेचं घर..🏡

कवठीचाफा, #सोनचाफा,🌼
कर्दळ नी पांढरा चाफा,☘

गावठी गुलाब, लाल जास्वंद🌹
टप्पोरं जांभूळ, #चिकाची करवंदं..😋

कोप-यातलं
#रायआवळ्याचं झाड,🍃
लाड करणारे
ते हिरवे हिरवे #माड..🌴

विहिरीत सोडलेला #पोहरा
किंचित कुरकुरणारा #रहाट,🍁
#प्राजक्ताच्या धुंद सड्याने
उगवलेली ती #पहाट..🌞

पिकलेला #रायवळ
झाडावरुन अवचित पडलेला,😳
रसाळ बरका #फणस
आजोबांनी समोरच फोडलेला..😋

#हापूस आंब्याचे ते
कपड्यावर डाग पिवळे,👘
गोड गोड पाण्याचे
शुभ्र मलईदार #शहाळे..🌴

#चूलीकडली धग🤗
शेणाचं सारवण,
वर्षाच्या बेगमीचं
लाकडाचं सरपण..🎍

#आजीच्या हातच👵🏻
#आंबोळ्या नी घावन..😊

रात्रीच्या अंधारातले
आजोबां पुढले पाढे,😁२-४-६
#आजीच्या गोष्टीसाठी मात्र
सर्व पुढे पुढे..😉

#भावंडांचा धागडधिंगा 👭👫
भर ऊनातला तो दंगा..😎🤓

#पत्त्याचा डाव ♣♦♠🃏
गुलामचोर नी मुंगूस,
चांदण्यारात्री
अंगणातला धुडगूस..🌌

गोटी सोडा तर कधी
#लिमलेटची गोळी, 🍬
आंब्याचे साट आणि
#फणसाची पोळी.. 🍪

हळूच आजीने दिलेली
खाऊसाठीची #नोट,💵💴
#निघताना आजीचे
पाणावलेले डोळे😭
मुके घेणारे तिचे ते
#सुरकुतले_ओठ..😘😒

लाल #एसटीने, निघताना 🚌
मागे लाल धुरळा उडवला, 🙋🏻
आणि माझा तो "मे महिना"
त्यातच #कुठेतरी_हरवला..!!!😔 Copy paste कवी अज्ञात.

 #बांगडा_Fry आणि  #बोंबील_Fry आमच्या निसर्गरम्य अलिबागला मस्त मोठ्या लांबीचा सुंदर समुद्रकिनारा लाभला आहे. त्यामुळे नाना...
01/05/2019

#बांगडा_Fry आणि #बोंबील_Fry

आमच्या निसर्गरम्य अलिबागला मस्त मोठ्या लांबीचा सुंदर समुद्रकिनारा लाभला आहे. त्यामुळे नानाविविध त-हेचे चविष्ट मासे आम्हा अलिबाग वासियांना खायला मिळतात. सकाळी सकाळी नागाव किंवा साताड बंदर दर्याकिनारी रात्रीच्या गेलेल्या बोटी लागतात आणि टोपल्या, पाट्या, चुंबळण आणि जाळ्या घेऊन एकच गडबड उडते. जाळ्यांतून आणलेल्या ताज्या सागरी खजिन्याची सराईतपणे वर्गवारी सुरू होते.‌ मोठे मासे बहुदा मुंबईला किंवा अलिबाग मार्केट ला जातात. मग हारीने सगळ्या टोपल्या भरल्या जातात. मजा असते समुद्रावर जाऊन ही लगबग बघण्यात.
मुळातच आपुलकीने, मायेने बोलणा-या या मनमिळाऊ कोळिणी मावशी मस्त ताजे मावरे टोपल्या/पाट्या भरुन ताजी ताजी मच्छी बाजारात विकायला आणतात. पापलेट, रावस, बोयमासे, कोलंबी, बोंबील, मांदेळी, कालवे, खेकडे आणि करंदी फक्त हे काही मासे प्रकार आमच्याकडे खाल्ले जात. ह्याव्यतिरिक्तही काटी, माकले, ईल, शिंपले, खुबरी, निवट्या, राणीमासे, शिताडू आणि असे बरेच वेगवेगळे मासे अलिबाग मच्छीमार्केटमधे थोड्याबहूत प्रमाणात हजेरी लावतात.
भाव ठरवण्यात लाघवी, लटकी घासाघीस, मस्करी रोजचे गि-हाईक आणि मच्छीवाल्या मावशींमधे सुरू असते.
तर मग त्या मासे स्पेशल जेवणातील बांगडा Fry आणि बोंबील fry ची simple but tastiest recipe सांगते. बाकी recipes पुढच्या टप्प्यात!

१. बांगडा Fry:
सहा ब-यापैकी मोठे बांगडे मस्त साफ करून घेतले. अर्धा चमचा हळद पावडर, मध्यम तिखट अशी संकेश्वरी मिरची पावडर, दोन चमचे, रंगासाठी बेडगी मिरची पावडर,‌ चवीपुरतं मीठ, चार चमचे आले-लसूण पेस्ट, दोन चमचे धणे,‌ एका मोठ्या लिंबाचा रस हे सारे छान एकजीव केले व बांगड्याला आतून बाहेरून व्यवस्थित चोळले. पाडलेल्या खाचांमधे मुरवले.
थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडे मॅरिनेशन एकत्र कालवून बांगड्याच्या पोटाच्या पोकळीत भरले.
बांगडे २० मिनिटे झाकून मॅरिनेट करत ठेवले. तांदळाचे पीठ घेतले. त्यातही थोडेसे मीठ मिसळले.
जाड बुडाचा खोलगट पॅनमधे ब-यापैकी जास्त तेल गरम करत ठेवले. मॅरिनेटेड बांगड्याला तांदळाच्या पिठावर ठेऊन सर्व बाजूने पीठ लागेल अशा पध्दतीने हलकेच दाबून घेऊन मग पॅनमधल्या उकळत्या तेलात सोडून दिले.
बांगडा मांसल असल्याने दोन्ही बाजूंनी तळताना पलटणीने थोडा थोडा दाब दिला. सगळे बांगडे मस्त खरपुस तळुन घेतले.
पापलेट, सुरमई, रावस ह्यांनादेखिल असेच marinate करून fry केले कि झक्कास लागतात.

२. ओले बोंबील Fry:
बाकी मॅरिनेड बांगड्याला घेतले तसेच घ्यायचे. फक्त मी त्यामधे कोथिंबीर आणि मिरची पेस्ट अॅडिशनल घातली.
बोंबील स्वच्छ धुवून त्याला साफ करा. आणि तीन आडवे तुकडे करून मधोमध खोल चिर पाडा. दोन तुकडे होणार नाहीत ह्याकडे लक्ष द्या. मॅरिनेशन बों बलाच्या प्रत्येक सपाट तुकडयाला चोळून पंधरा-वीस मिनिटे मुरू द्या. मग तांदूळ+जरासा रवा अशा मिक्स पिठात दाबून घोळवून मस्तपैकी गरमागरम तेलात दोन्ही बाजूने खरपुस तळून घ्या.

तर असे हे मासे बनवणेचे काम, जितके सोपे तितकेच कौशल्याचे!!!

#बांगडे #बोंबील .

आजच्या या धकाधकीच्या आयुष्यात मामाचा गाव खरंच हरवुन गेलाय. घड्याळाच्या काट्यावर धावता धावता आयुष्य अगदी निरस होऊन गेलंय....
24/04/2019

आजच्या या धकाधकीच्या आयुष्यात मामाचा गाव खरंच हरवुन गेलाय. घड्याळाच्या काट्यावर धावता धावता आयुष्य अगदी निरस होऊन गेलंय. ऑफिस घर आणि मुलं यामध्ये तारेवरची कसरत करता करता थकून गेलेल्या मनाला रिचार्ज करायचा विचार करताय तर नक्की आवर्जुन एकदा नक्कीच बेत करा अलिबाग सागरी सफरीचा. कमी वेळेत आणि कमी खर्चात मनसोक्त हिंडा आणि खा प्या. घरगुती पद्धतीचं पारंपरिक जेवण. तेहि आपल्या आवडीचे आपल्याला हवे तसे. रोजच्या ROUTINE LIFE. मधुन थोडा निवांत वेळ सोबत निसर्ग आणि गरमा गरम वाफाळता चहा आणि दिमतीला तुमचा अवडता नाश्ता....वाह क्या बात है. बेत करा कुटुंबा सोबत अथवा आपल्या प्रिय मित्र मंडळी सोबत आणि जागा आयुष्यातले दोन क्षण राहून गेलेले. Do your plans for Birthday /Anniversary Celebration, small get together, office picnic. We provide all types of decorations chairs, tables etc

Just 1 hour to reach Mandwa jetty by PNP AC launch. Or 20 minutes by RoRo speed boat. To escape from ur daily routine an...
16/04/2019

Just 1 hour to reach Mandwa jetty by PNP AC launch. Or 20 minutes by RoRo speed boat. To escape from ur daily routine and enjoy the comfort Sea ride, green sceneries water sports activities, delicious food and many more. Only at pocket affordable cost.. contact details : 9930052443/9527423785

** नागाव या गावाचे नाव "नागाव" नाव कसे पडले ? **--------------------------------------------------------अलिबागपासून ७ कि...
16/04/2019

** नागाव या गावाचे नाव "नागाव" नाव कसे पडले ? **

--------------------------------------------------------

अलिबागपासून ७ किलोमीटरच्या अंतरावर नागाव हे एक छोटेसे गाव वसलेले आहे. हिरव्या झाडीने नटलेल्या वाड्या, नारळ सुपारीची असंख्य झाडे, स्वच्छ, सुंदर आणि डोळ्यांचे पारणे फेडणारा समुद्र किनारा आणि सुंदरशी जुनी मंदिरे ही नागावची वैशिष्ट्ये ! निसर्गाचे वरदान लाभल्याने गेल्या १० वर्षात नागाव हे एक प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून उदयाला आलेले आहे. शेकडो वर्षे एक लहानसे गाव म्हणून ओळखले जाणारे नागाव चटकन पर्यटकांचे आडवडते ठिकाण बनले आहे. सुपारी-नारळांची जागा कुरडया,पापड लोणची अशा उत्पादनांनी घेतली व प्रामुख्याने शेतीवर उदरनिर्वाह करणारे गाव पर्यटनाकडे मुख्य व्यवसाय म्हणून पाहू लागले. समुद्र, मंदिरे आणि निसर्गाच्या सानिध्यामुळे नागावमध्ये पर्यटकांचा लोंढा अजूनच वाढू लागला आहे.

तरी अशा या गावाचे नाव नागाव हे प्राचीन काळापासून नव्हते. पूर्वी नागाव हे 'नामग्राम' म्हणून ओळखले जात होते. पुढे जाऊन येथे एक नागांचे मंदिर बनले ज्यामुळे या गावाला नवीन नाव मिळाले. या मंदिराची सर्वात महत्वाची बाब म्हणजे या मंदिरामध्ये कोणी देवतेची मूर्ती नाही. हे मंदिर कसे बनले, या गावाचे नाव कसे पडले, या मंदिरामध्ये काय आहे आणि हे मंदिर कुठे पाहता येऊ शकते या सर्व बाबींचा आढावा घेणारा हा लहान २ मिनिटांचा माहितीपट आवर्जून पाहण्यासारखा आहे. नागावला जशी निसर्गाची देणगी मिळाली आहे तसेच प्रगल्भ इतिहासाचीही साथ या गावाला लाभली आहे.

--------------------------------------------------------

नागांवचे नाव कसे पडले ? अलिबागकडून नागावच्या दिशेने जाताना आक्षीच्या थोडं पुढे हे लहानसं मंदिर लागतं. बाहेरून इत.....

Address

Alibag, Nagaon, Kotharbhat
Alibag
02141

Telephone

+919930052443

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yash Lakshmi Holidays - Alibaug posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Yash Lakshmi Holidays - Alibaug:

Share