19/09/2023
*🙏मातृ श्री नर्मदे हर🙏*
*नर्मदा परिक्रमा २०२३*
*सर्व श्रेष्ठ नर्मदा परिक्रमा - दिव्य, गूढ आणि सिद्ध अनुभूती -*
नर्मदेच्या काठाकाठाने केलेली प्रदक्षिणा म्हणजेच नर्मदा परिक्रमा. ही एक धार्मिक यात्रा आहे, जी पायी पूर्ण करावयाची असते. ही यात्रा धार्मिक अंगाने केली जात असली तरी वाटेत पावलोपावली भेटणारा निसर्ग परिक्रमावासीयांना अंतर्मुख होण्यापलीकडेही बरंच काही शिकवून जातो. ही परिक्रमा म्हणजे मानसिक, शारीरिक व आध्यात्मिक तप आहे.
हि परिक्रमा पायी पूर्ण करण्याला खूप महत्व आहे. परिक्रमेतील आत्मिक व दैवीय अनुभूती फक्त पायी परीक्रमेतच मिळू शकतात. परंतु *आताच्या काळात ज्यांना शरीर अस्वास्थ्यामुळे अथवा वेळे अभावी पायी परिक्रमा करणे शक्य नसते असे लोक हि यात्रा बसने अथवा स्वतःच्या दुचाकी, चारचाकी वाहनाने देखील १५,२० किंवा २५ दिवसांत पूर्ण करतात.*
या भूतलावर नर्मदा परिक्रमा ही सर्वात मोठी परिक्रमा आहे. श्री काशी क्षेत्राची पंचकोस परिक्रमा, तर अयोध्या - मथुरा यांची चौऱ्याऐंशी कोस परिक्रमा, नैमिषारण्य - जनकपुरी परिक्रमा या सर्वाहून मोठी परिक्रमा म्हणजे नर्मदा नदीची परिक्रमा, जी जवळजवळ ३,५०० ते ४,००० कि.मी. आहे. सर्व नद्यांमध्ये श्रेष्ठ नदी म्हणून गंगेचे महत्त्व असले तरी फक्त नर्मदा नदीचीच परिक्रमा होते. नदी जशी वाहते तशी तिच्या काठाने केलेली गोल प्रदक्षिणा म्हणजे नर्मदा परिक्रमा. असे सांगितले जाते कि प्रथम ही परिक्रमा श्री मार्कंडेय ऋषीनीं अतिशय खडतर तप म्हणून पूर्ण केली. त्यामुळे तिला अनन्यसाधारण महत्त्व आहे. असे म्हणतात कि श्री मार्कंडेय ऋषींनी परिक्रमा केली ती इतकी खडतर होती कि त्यांनी श्री नर्मदेला येऊन मिळणाऱ्या सर्व उपनद्या, ओढे, नाले देखील त्यांच्या प्रवाहातून पार न करता त्यांच्या उगम अथवा विलया पर्यंत जाऊन तेथून ते पार केले होते.
नर्मदा परिक्रमा करताना जसे रहस्य, रोमांच आणि धोके आहेत तसेच अनुभवांचे भंडार देखील आहे. या परीक्रमे नंतर प्रत्येक परिक्रमावासी चे आयुष्य बदलल्या शिवाय रहात नाही. नर्मदा नदीवर आता अनेक ठिकाणी धरणे झाली असल्याने साधारण पायी नर्मदा परीक्रमेचे एकूण अंतर ३,५०० ते ४,००० किलोमीटर आहे. शास्त्रात सांगितल्या नुसार नर्मदा परिक्रमेचा अवधी ३ वर्ष ३ महिने आणि १३ दिवसाचा आहे, तसेच हि परिक्रमा १०८ दिवसांत देखील पूर्ण करतात. श्री टेंबे स्वामींनी २१ दिवसात श्रीदत्त गुरूंच्या आज्ञेने नर्मदा परिक्रमा पूर्ण केली. बरेचसे परिक्रमावासी आपआपल्या शक्ती नुसार शक्य तेवढ्या दिवसांत परिक्रमा पूर्ण करतात. परिक्रमा किती दिवसांत पूर्ण केली या पेक्षा परिक्रमा पायी पूर्ण केली याला अनन्यसाधारण महत्व आहे. परिक्रमावासी शास्त्रानुसार चातुर्मास संपल्यानंतर साधारण त्रिपुरी पौर्णिमेच्या आसपास परीक्रमेस निघतात आणि निरंतर पायी चालत परिक्रमा पूर्ण करतात.
*नर्मदेचे श्रेष्ठत्व आणि अनन्य साधारण महत्व –*
- *१८ पुराणांमध्ये नर्मदा पुरणाचा समावेश आहे. इतर नद्यांचे पुराण नाही.*
- *नर्मदेत असणारा प्रत्येक कंकर हा शंकर, त्यामुळे नर्मदेमधील बाण लिंगाला प्राणप्रतिष्ठेची गरज नाही.*
- *पुराणांनुसार नर्मदेची उत्पत्ति शिवाच्या घामातून झाली, त्यामुळे नर्मदा शिवाची चैतन्य शक्ती आहे.*
- *शास्त्रानुसार वर्षातून एक वेळेस सर्व नद्या गंगेसहित नर्मदेस भेटण्यासाठी येतात. उत्तर तटावर गंगा प्रगट स्थान आहे.*
- *गंगेत एक वेळेस, यमुनेत तीन वेळेस स्नान केल्याने पुण्य मिळते, नर्मदेच्या नुसत्या दर्शनाने पुण्य मिळते.*
- *नर्मदेच्या स्नानाने सर्व ग्रहांची शांति होते*
- *पुराणांनुसार प्रलयाच्या वेळेस सुद्धा नर्मदा नदी लुप्त होणार नाही, सतत वाहत राहील.*
- *नर्मदेच्या तटावर राहणारे प्रजाजन, साधूसंत आणि ऋषीमुनी यांना शिवलोक प्राप्त होतो.*
- *सर्व नद्यांमध्ये फक्त नर्मदेची परिक्रमा केल्या जाते आणि या परिक्रमेस अनन्य साधारण महत्व आहे.*
- *नर्मदेच्या दोन्ही किनारी सर्व देवी देवता, यक्ष, गंधर्व, किंन्नर, ऋषीमुनी आणि राक्षसांनी साधना केली.*
- *बहुतेक मंदिरात नर्मदेश्वरची स्थापना केलेली आढळते.*
- *शास्त्रानुसार पारा, सोने, चांदी, स्फटिकच्या शिवलिंगापेक्षाही नर्मदेश्वर शिवलिंगचे महत्व उच्च कोटीचे आहे, त्यामुळे नर्मदेश्वर शिवलिंगाचे पुजन सर्वश्रेष्ठ मानल्या गेले.*
- *नर्मदेचे पाणी कधीही खराब होत नाही. वैज्ञानिक दृष्टीकोणातून नर्मदेच्या पाण्यात सर्वात जास्त खनिजे आढळून आले आहेत, त्यामुळे अनेक असाध्य आजार बरे होतात.*
*तर चला आजच नर्मदा माईची परिक्रमा करून अनंत जन्माचे पुण्य कमवून घेवूया.*
*🙏नर्मदे हर🙏*
*🙏मात श्री नर्मदे हर🙏*
*शास्त्रोक्त पुराणोक्त नर्मदा परिक्रमा –*
आपण नर्मदा माईची परिक्रमा या वर्षी १९ डिसेंबर ते ११ जानेवारी २०२४ च्या दरम्यान बस / टेम्पो ट्रॅव्हलर किंवा तत्सम गाडीने आयोजित केली आहे. तसेच जिथे आपली गाडी जावू शकणार नाही तिथे पर्यायी व्यवस्था करण्यात येईल. परिक्रमेचा कालावधी हा २२ दिवसांचा असेल. आपली ही परिक्रमा अतिशय आनंददायी आणि उत्साह वर्धक असणार आहे. २२ दिवसांचा कालावधी हा २/३ दिवस मागे पुढे होवू शकतो. ११ जानेवारी २०२४ रोजी परिक्रमेची सांगता होईल.
अमावास्येला संकल्पपूर्तीची पुजा, ओंकारेश्वर आणि ममलेश्वर ज्योतिर्लिंगाची पुजा, संकल्प जल चढवणे, कन्या पुजन व कन्या भोजन यास अनन्य साधारण महत्व नर्मदा किनारी आहे. नर्मदा किनारी बहुतेक सर्व आश्रमात अमावास्याच्या दिवशी कन्या पुजन व कन्या भोजन करतात.
तसेच आपणासही याच दिवशी या सर्व पुजनाचे भाग्य लाभणार आहे.
आपली ही परिक्रमा जास्तीत जास्त नर्मदेच्या किनार्याने करण्याचा प्रयत्न करत आहोत, बर्याच वेळेस डॅमचे पाणी आणि खराब रास्ते यामुळे मार्ग बदलावा लागू शकतो. जवळपास बहुतेक सिद्ध साधू संतांचे आणि पुरातन देवस्थानचे दर्शन आपणास घडणार आहे. आमचा हाच प्रयत्न असणार आहे की आपणास पायी परिक्रमा केल्याचा अनुभव आणि आनंद मिळवा.
*परिक्रमेची रूपरेषा –*
*परिक्रमा दिनांक – मार्गशिर्ष शु. सप्तमी ते अमावास्या शके १९४५ (१९ डिसेंबर २०२३ ते ११ जानेवारी २०२४)*
*एकूण कालावधी २२ दिवस*
*नर्मदा परिक्रमा व दर्शन –*
- *ओंकारेश्वर ते विमलेश्वर*
- *विमलेश्वर ते मांडवगड - समुद्र पंचक्रोशी सहित*
- *मांडवगड ते नेमावर (नभिस्थान) - महेश्वर, इंदोर आणि उज्जैन सहित*
- *नेमावर (नभिस्थान) ते अमरकंटक – लक्कडकोट जंगल - जयंती माता, जबलपूर, मंडला सहित*
- *अमरकंटक ते ओंकारेश्वर – अमरकंटक, नर्मदापूरम आणि खंडवा सहित*
*परिक्रमा संपूर्ण.*
*वैशिष्ठ्ये –*
- रोज सकाळ संध्याकाळ नर्मदा पुजन, आरती आणि अष्टक.
- विविध रम्य, सिद्ध आणि पुरातन स्थळ दर्शन.
- उल्हसित आणि मंगलमय वातावरणात परिक्रमा.
- रोज नर्मदा माईचा सहवास.
- गुढ, सिद्ध साधक आणि संतांचे दर्शन, सत्संग आणि सहवास.
- रिद्धि सिद्धि तटावर असणार्या अनेक पवित्र आणि पुरातन सिद्ध देवस्थानचे दर्शन.
- साकारात्मक बदल घडवणारी यात्रा.
- कन्यापूजन व कन्याभोजन.
*मार्गदर्शनपर सूचना –*
- संकल्प घेतल्यानंतर नर्मदा नदी ओलांडू नये किंवा जास्त दूर पर्यंत नदी पात्रात जावू नये.
- परिकरमेदरम्यान दाढी कटींग करू नये तसेच तेल लावू नये.
- परिक्रमा ही आध्यात्मिक उन्नतीसाठी असल्याने इतर गप्पा गोष्टी न करता नाम स्मरणावर भर द्यावा, ऐरव्ही तर आपल्या गप्पा गोष्टी चालूच असतात.
- एकाच ठिकाणी जास्त वेळ न थांबता पुढे जात राहावे. पुन्हा पुन्हा दर्शन घेण्याचा अट्टाहास करू नये.
- योग्य त्या ठिकाणी कन्यापूजन, अन्नदान व धन दान करून पुण्य पदरात पाडून घ्यावे.
- साधू सान्यास्यांची जास्त चौकशी करू नये आणि आपल्या समस्या त्यांना सांगत बसू नये.
*नियम व अटी –*
- चादर, सतरंजी, पूजेचे साहित्य, टॉर्च, कुलूप किल्ली, गरम कपडे आणि पांघरून, रोजचे औषध गोळ्या सोबत घ्याव्या.
- स्वत: ला पेलवेल इतकेच समान सोबत घ्यावे, कमीतकमी सामान घ्यावे.
- सामूहिक निवास व्यवस्था असेल.
- स्पेशल दर्शन, होडी, डोली, रिक्षा, विशेष पुजा, दक्षिणाचा खर्च वैयक्तिक करावा.
- जीवित व वित्त हानीची जबाबदारी वैयक्तिक असेल, आयोजक अश्या कोणत्याही गोष्टीस जबाबदार असणार नाही.
- उपवासाचे पदार्थ फक्त चतुर्थी व एकादशीला मिळतील.
- दोन वेळेस चहा व जेवण मिळेल.
- कालानुरूप यात्रेत कोणताही बदल करण्याचा अधिकार आयोजकांस असेल.
- इतर भाविक, ड्रायवर, आयोजक आणि कर्मचारी यांच्याशी सलोख्याने व सौजण्याने वागावे, विनाकारण वादविवाद करू नये.
- बूकिंग प्रमाणे आसन क्रमांक दिले जातील.
- ५०% रक्कम किंवा पूर्ण रक्कम बूकिंगच्या वेळी भरावी लागेल त्याशिवाय सीट कन्फर्म होणार नाही.
- बुकिंग रद्द होणार नाही परंतु बदली दूसरा व्यक्ति चालेल.
- बुकिंगच्या वेळी, पूर्ण पत्ता, वय, आधार क्रमांक, संपर्क क्रमांक आणि एमर्जन्सि कॉनटॅक्ट नंबर द्यावा.
- *परिक्रमा सहभाग शुल्क – २५,०००/- फक्त. शुल्क 9421245289 या क्रमांकावर PhonePay, GPay, किंवा PayTM द्वारे जमा करावे आणि शुल्क जमा केल्याचा स्क्रीन शॉट आपल्या पूर्ण नावासहित पाठवावा.*