Khed Taluka Tourism Development Group

Khed Taluka Tourism Development Group Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Khed Taluka Tourism Development Group, Tour Agency, Chakan.

*साहसी पर्यटन धोरणाबाबत सूचना, हरकती पाठविण्याचे आवाहन*    मुंबई, दि. १९ : साहसी उपक्रम धोरणाचा (adventure tourism polic...
19/09/2020

*साहसी पर्यटन धोरणाबाबत सूचना, हरकती पाठविण्याचे आवाहन*

मुंबई, दि. १९ : साहसी उपक्रम धोरणाचा (adventure tourism policy) मसुदा पर्यटन संचालनालयामार्फत जाहीर करण्यात आला आहे. या धोरणाबाबत जनतेकडून सूचना व हरकती मागिवण्यात येत आहेत. धोरणाचा मसुदा संचालनालयाच्या www.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. या साहसी पर्यटन धोरणाबाबत सूचना व हरकती [email protected][email protected] या ईमेल आयडीवर दि. 07 ऑक्टोबर 2020 पर्यंत पाठविण्यात याव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

साहसी उपक्रम धोरण महाराष्ट्रात कोकण किनारा, पश्चिम घाटातील पर्वतराजी, विदर्भ या वैविध्यपूर्ण प्रदेशात पाणी, जमीन व हवेतील साहसी पर्यटनास मोठ्या प्रमाणावर वाव आहे. साहसी पर्यटन हे क्षेत्र पर्यटनाचे लोकप्रिय अंग असून पर्यटकांचा साहसी पर्यटनाकडे कल वाढत आहे. पर्यटन धोरण 2016 अंतर्गत साहसी पर्यटनाला चालना देणे तसेच साहसी पर्यटन आयोजित करणाऱ्या संस्था, अॅडव्हेंचर टूर ऑपरेटर्स, साहसी क्रीडा संदर्भात प्रशिक्षण देणाऱ्या संस्था, संघटना, क्लब यांची नोंदणी, विनियमन, सनियंत्रण, नियोजन, प्रोत्साहन देणे, प्रशिक्षण देणे इत्यादी बाबींचा समावेश करुन साहसी उपक्रम धोरण तयार करण्यात आले आहे.

MTDC | Official Website of Maharashtra Tourism

05/07/2019
https://infomarathi.in/the-great-maratha-warrior-firangoji-narsala/
21/05/2019

https://infomarathi.in/the-great-maratha-warrior-firangoji-narsala/

फिरंगोजी नरसाळा: माहिती आवडल्यास शेयर करा आम्ही आपल्यासाठी अशीच नवनवीन माहिती घेउन येणार आहोत. आपल्याकडे काही ले...

https://infomarathi.in/information-of-great-shivram-hari-rajguru/
24/03/2019

https://infomarathi.in/information-of-great-shivram-hari-rajguru/

राजगुरु: माहिती आवडल्यास शेयर करा आम्ही आपल्यासाठी अशीच नवनवीन माहिती घेउन येणार आहोत. आपल्याकडे काही लेख असतील .....

 ्योतिर्लिंग_मंदिर_जोड_प्रकल्प_खेड_तालुकाशेलगाव (शैलेश्वर), संगमवाडी (संगमेश्वर), चास (सोमेश्वर) या 3 मंदिरांना पर्यटन व...
07/03/2019

्योतिर्लिंग_मंदिर_जोड_प्रकल्प_खेड_तालुका
शेलगाव (शैलेश्वर), संगमवाडी (संगमेश्वर), चास (सोमेश्वर)
या 3 मंदिरांना पर्यटन विभागाकडून मान्यता प्राप्त होऊन पहिल्या टप्प्यात 35 लाख रुपये मंजूर...
पाईट (कुंडेश्वर) ला वन विभागाकडून पाहिल्या टप्प्यात 23.14 लाख मंजूर..
बीबी(शंभू महादेव) ला वन विभागाकडून पहिल्या टप्प्यात 1 कोटी 80 मंजूर ...
भोरगिरी (कोटेश्वर) आणि भोरगड ला वन विभागाकडून पहिल्या टप्प्यात 1 कोटी 76 लाख मंजूर...

"बारा मावळ"सह्याद्रीच्या मुख्य रांगेला अनेक लहान लहान उपशाखा फुटल्या आहेत. अशा दर दोन उपशाखांच्या मधून सामान्यतः एक छोटी...
23/12/2018

"बारा मावळ"
सह्याद्रीच्या मुख्य रांगेला अनेक लहान लहान उपशाखा फुटल्या आहेत. अशा दर दोन उपशाखांच्या मधून सामान्यतः एक छोटीशी नदी उगम पावते अशा नद्यांच्या खोऱ्यांना मावळे किंवा खोरे म्हणतात.
उदाहरणार्थ: नाणे मावळ, पवन मावळ, मोसे खोरे, वेळवंड खोरे इत्यादी
जुन्या कागदपत्रांमध्ये बारा मावळे असा वाक्यप्रयोग कधी कधी येतो. परंतु ज्यांना मावळे किंवा खोरी म्हणतात असे प्रदेश बाराहून अधिक आहेत. तेव्हा बारा मावळ एक वाक्यप्रयोग असून विशिष्ट बारा मावळे असे अर्थ त्यात अभिप्रेत नाही अशी एक शक्यता आहे आणि विशिष्ट बारा मावळांना,अनुलक्षून बारा मावळे वाक्यप्रयोग वापरला जाई अशी दुसरी शक्यता आहे.
यापैकी दुसरी शक्यता गृहीत धरली तर ही बारा मावळे कोणती असा प्रश्न उदभवतो. अशा बारा मावळांची एखादी जुनी यादी अद्याप तरी उजेडात आलेली नाही. पण इतिहास संशोधकांनी ही बारा मावळे कोणती ते सांगण्याचा प्रयत्न केला आहे. इतिहासाचार्य राजवाडेंनी मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ४ च्या प्रस्तावनेत (पृ. ७८-७९) या बारा मावळांची जी यादी दिली आहे ती अशी आहे- (१)आंदर मावळ (२)नाणे मावळ (३)पवन मावळ (४)घोटण मावळ (५)पौड खोरे (६)मोसे मावळ (७)मुठे मावळ (८)गुंजण मावळ (९)वेळवंड मावळ (१०)भोर खोरे (११)शिवतर खोरे (१२)हिरडस मावळ
बारा मावळ या वाक्यप्रयोगात हीच बारा मावळे अपेक्षित होती असा पुरावा काही राजवाडेंनी दिला नाही आणि आपण ही बारा मावळ का निवडली याचे काही कारण सांगितलेले नाही त्यांनी दिलेल्या यादीत कानद खोरे नाही. कानद खोरे गुंजण मावळ आणि मोसे खोरे या दोन मावळांच्या मध्ये आहे आणि हे मधलेच मावळ यादीतून का वगळले हे सांगितले नाही. भोर खोरे हे त्यांनी स्वतंत्र मावळ गणले आहे. वास्तविक भोर आणि उतरोली या रोहिडखोऱ्याच्या दोन तरफा आहेत, तु स्वतंत्र मावळे किंवा खोरी नाहीत. शिवथर नावाचे खोरे होते पण ते कोकणात होते. बाकीची खोरी किंवा मावळे देशावरची घेतली असताना एकच खोरे कोकणातले का घेतले ते राजवाड्यांनी सांगितलेले नाही.
रियासतकार सरदेसायांनी रोहिडखोरे, वेलवंड, मुसे, मुठे, जोर, कानद, शिवथर, मुरुम, पौड, गुंजण, भोर व पवन ही पुण्याखालची मावळे समजतात असे म्हटले आहे. त्यांच्या विधानाला काही आधार दिलेला नाही. जोर खोरे वाई परगण्याच्या मुऱ्हे समतेत मोडत असे. जर जोर खोरे या यादीत घेतले तर जांभुळ खोरे का घेतले नाही याचे कारण सरदेसायांनी दिलेले नाही. भोर वेगळे मावळ नव्हते ती रोहिडखोऱ्याचीच एक तरफ होती. पवन मावळाला लागून असलेले नाणे मावळ आणि रोहिडखोऱ्याला लागून असलेले हिरडस मावळ ही मावळे ह्या यादीतून वगळली ते सरदेसायांनी सांगितलेले नाही. गुंजण मावळालाच मुरूम खोरे असेही म्हणत. सरदेसायांनी ती दोन वेगळी गणली आहेत.
श्री विजय देशमुख यांनी त्यांच्या शककर्ते शिवराय (पूर्वार्ध) या ग्रंथात (पृ. २००-२०१) दिलेली बारा मावळांची यादी अशी आहे- (१)आंदर मावळ (२)नाणे मावळ (३)पवन मावळ (४)घोटण मावळ (५)मोसे मावळ (६)मुठे मावळ (७)गुंजण मावळ (८)वेळवंड मावळ (९)कर्यात मावळ (१०)जुने मावळ (११)हिरडस मावळ (१२)शिरवळ मावळ.
या यादीला त्यांनी काही आधार दिलेला नाही. जुने मावळ व शिरवळ मावळ या नावांची मावळे कधीही नव्हती. मुठे खोरे व पवन मावळ यांच्यामध्ये असलेले पौड खोरे, मोसे खोरे व गुंजण मावळ यांच्यामध्ये असलेले कानद खोरं, आणि हिरडस मावळाला लागून असलेले रोहिड खोरे ही मावळे किंवा खोरी यादीत का घेतली नाहीत ते श्री. देशमुख सांगिलेले नाही.
मावळे जरी अनेक असली तरी शिवकालाच्या पूर्वी थोडासा काळ वगळता त्यासर्वांचा किंवा त्यांपैकी काहींचा परगण्यासारख्या एखाद्या मोठ्या प्रशासकीय विभागात समावेश केलेला नसे, कारभाराच्या दृष्टीने बहुतेक मावळांचि वेगवेगळे विभाग म्हणून विचार केला जाई, असे दिसते. निजाम शाही अमलात इ.स. १६०८ पासून किंवा त्याच्याही आधीपासून राईर नावाचा मामला होता. त्यात कोकणातील मुलखाचा काही समावेश असेल. इ.स. १६१७ मध्ये किंवा तत्पूर्वी सहा मावळांचाही समावेश राईर मामल्यात करण्यात आला. हिरडस मावळ, कानद खोरे व गुंजण मावळ ही तीन मावळे त्यात होती.व असे उपलब्ध कागदपत्रांवरून दिसून येते. इ.स. १६३६ मध्ये निजामशाही कायमची बुडाली आणि तिचा मुलूख मुघल साम्राज्य आणि आदिलशाही सल्तनत यांनी आपआपसांत वाटून घेतला. त्यानंतर राईर मामला अस्तित्वात होता, पण त्यात मावळांचा समावेश नव्हता.
यानंतर कारभाराच्या दृष्टीने अनेक मावळे प्रशासकीय विभागात समाविष्ट करण्याचा उपक्रम शिवाजीच्या कारकीर्दीत झाला. शिवाजीच्या राज्यात 'प्रांत मावळे' नावाचा वेगळा प्रशासकीय विभाग असल्याचे काही कागदपत्रांवरून दिसून येते. त्या विभागाचा उल्लेख असलेले जुन्यातले जुने पत्र २७ अॉक्टोबर १६६७ या तारखेचे आहे. अर्थात तत्पूर्वी केव्हातरी हा विभाग निर्माण केला गेला असला पाहिजे. त्यात किती व कोणती मावळे समाविष्ट केली होती हे ज्यांतून समजेल अशी शिवकालीन कागदपत्रे मिळालेली नाहीत. पण शिरवळ परगणा आणि रोहिडखोरे, गुंजण मावळ, मोसे खोरे, मुठे खोरे, व पुणे परगण्यातील कर्यात मावळ ही पाच मावळे असे निदान सहा उपविभाग तरी शिवकालीन मावळे प्रांतात होते असे उपलब्ध कागदपत्रांवरून दिसून येते. पवन मावळ व नाणे मावळ ही दोन मावळे त्या सुभ्यात नसून जुन्नर सुभ्यात होती असेही एका शिवकालीन पत्रावरून उपलब्ध आहे. तिच्यात पुढील तेरा नावे मावळे सुभ्याचे उपविभाग म्हणून आली आहेत- (१)कर्यात मावळ (२)खेडेबारे (३)हिरडस मावळ (४)रोहिडखोरे (५)वेळवंड खोरे (६)कानद खोरे (७)गुंजण मावळ (८)मोसे खोरे (९)मुठे खोरे (१०)पौड खोरे (११)पवन मावळ (१२)नाणे मावळ (१३)शिरवळ
यांपैकी शिरवळ परगणा हे मावळ नव्हे. तरीही त्याचा समावेश मावळ सुभ्यात का केला गेला ते समजण्यास काही साधन नाही. कदाचित, शिरवळ हा फार लहान परगणा असल्यामुळे तो वेगळा ठेवणे अव्यवहार्य वाटून शिवाजीने तो शेजारच्याच मावळे सुभ्याला जोडून टाकला असेल. खेडेबाऱ्याला मावळ किंवा खोरे अशी उपाधी लावल्याचे आढळत नसले तरी खेडेबाऱ्याचा मुलूख मावळसदृश आहे. म्हणून त्याचाही समावेश मावळांमध्ये करता येईल, म्हणजे मावळे सुभ्याच्या तेरा उपविभागांपैकी शिरवळ वगळून बाकीचे बारा उपविभाग मावळांमध्ये मोडतात.

(टीप- खालील बारा मावळांचा नकाशा 'श्री राजा शिवछत्रपती' खंड-२ मधील नाही बारा मावळांचा नकाशा पहिल्या खंडात आहे, हा खंड सध्या माझ्याकडे नाही. बारा मावळांचा भौगोलिक प्रदेश कळावा म्हणून हा दुसरा नकाशा दिला आहे.)

02/12/2018

*Nisargramya khed taluka*
*Presents - 1 fort _ 2 Temples*

*⛳Trek to Harihar fort ⛳*

*🕉️Trimbakeshvar jyotirling temple 🕉️*

*🕉️ Gondeshwar ancient temple🕉️*

*22- 23 Dec 2018 SUNDAY*
(1night & 1 day)

*Details*

*22 Dec. SATURDAY*
08:00 pm : Nashik phata
08:20 pm : Bhosari
08:45 pm : Chakan
09:00 pm : Leave from last pickup point ( Rajguru nagar)

*23 Dec. SUNDAY*
06:00 am : reach base village
06:30 am : Breakfast
07:30 pm : start Journey towards..Harihar Fort
09:30 am : reach on top
11:30 am : start descending
01:00 pm : Local veg.lunch
03:00 pm : Trimbakeshwar Darshan
05:00 pm : Gondeshwar Temple
06:00 pm : Start return journey
08:00 pm : veg dinner

*Cost - 1800*

*Cost include:*
*Transportation
*Breakfast
*Lunch
*Dinner
*Guide
*First Aid kit

*Contact no:*
7057974673

*Rules :*
Booking will confirm after partly payment (500 Rs.)

*🚩🚩🚩*

 #खेड_तालुका_पर्यटन_विकास आमदार सुरेश गोरे यांचे सर्व तालुक्याच्या वतीने आभार
30/11/2018

#खेड_तालुका_पर्यटन_विकास
आमदार सुरेश गोरे यांचे सर्व तालुक्याच्या वतीने आभार

चास येथे आज दीपोत्सव
22/11/2018

चास येथे आज दीपोत्सव

क्रांतीकारक राजगुरू यांचा राजगुरूनगर(खेड) येथील वाडा.     शाहुराजे मोगलांच्या  कैदेतून मुक्त होताच अहमदनगरला पोहोचले होत...
03/11/2018

क्रांतीकारक राजगुरू यांचा राजगुरूनगर(खेड) येथील वाडा.

शाहुराजे मोगलांच्या कैदेतून मुक्त होताच अहमदनगरला पोहोचले होते, येथून पुढे त्यांनी सातारा गाठवण्याच्या हेतूने आगेकूच केली होती. रस्त्यावर असलेल्या भीमा नदीच्या काठावर वसलेल्या खेड गावी मुक्काम करायचे त्यांनी ठरविले होते, कारण भीमा नदीच्या पलिकडील तीरावर 'कडूस' या गावी ताराराणीच्या फौजा येऊन थांबल्या होत्या. ताराराणीच्या फौज ताफ्यात धनाजी जाधव व परशूराम हे शूरवीर प्रतिनिधी म्हणून होते. धनाजी जाधवांचे विश्वासू सहकारी खंडो बल्लाळ, बाळाजी विश्वनाथ आणि नारो राम यांनी यापूर्वीच ताराराणींची साथ सोडून शाहू राजांच्या गटात सामील झाले होते. या तिघांनी धनाजी जाधव व शाहू राजे यांची दि. ११ ऑक्टोबर १७०७ रोजी भेट घडवून आणली. आणि ठरल्या प्रमाणे धनाजी जाधव यांनी लढाई केली नाही. त्यामुळे ताराराणीचा पराभव झाला. शाहूराजांनी 'क्षत्रिय कुलावंतस श्री राजा शाहू छत्रपती ' या नावाने आज्ञापत्रे सूरू केली. चाकण येथील वेदशास्रसंपन्न कचेश्वर ब्रम्हे हे सपत्नीक एका आश्रमात राहात होते. त्यांना भेटून त्यांच्या आशिर्वादानेच हे राज्य आपणास मिळाले आहे ' हे व्यक्त करण्यासाठी त्यांना साताऱ्यास आणून उपदेश घेतला. तेव्हापासून लोक त्यांना 'राजगुरू,' असे म्हणू लागले. कचेश्वर पुढे उंब्रज येथे राहीले. शाहूराजांनी त्यांना सहा गावे इनाम करून दिली. व त्यांनी खेड येथे भीमा नदी उत्तर किनारी एक वाडा बांधला. पुढे याच घराण्यातील हरिपंतांचा मुलगा शिवराम हा एक क्रांतीकारक म्हणुन भारताच्या इतिहासात अमर झाला.
त्या काळात ब्रिटिश सत्तेविरूध्द भारतात असंतोषाचे उद्रेक होत होते. आॅगस्ट १९०८ मध्ये शिवरामचा खेड येथे जन्म झाला. त्याचे इयत्ता 5 वी पर्यंतचे शिक्षण जुन्नर नगरपरिषदेच्या शाळेत झाले. व ६ व ७ येथे झाले. पुढील शिक्षण पुणे येथील न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड येथे चालू असतानाच ते सोडून देऊन १९३३ साली ते हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात अमरावती येथे दाखल झाले. क्रांतीची आग त्यावेळी सर्वत्र लागली असल्याने त्यामध्ये सहभागी होण्यासाठी त्यांनी उत्तर प्रदेश व पंजाब मधिल लाला लचपतराय व पं.मदनमोहन मालविय यांच्या आंदोलनात सहभागी झाले. दि. ३० ऑक्टोबर १९२८ या दिवशी ' सायमन हटाव ' हे आंदोलन पंजाब केसरी लाला लचपतराय व पं.मदनमोहन मालविय यांच्या नेतृत्वाखाली उभे राहिले होते. पंजाबचा पोलीस अधीक्षक स्काॅट व त्याचा सहाय्यक सँडर्स यांनी हे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी लाठीहल्याचा आदेश दिला. पंजाब केसरी जबर जखमी झाले आणि १७ नोव्हेंबर रोजी त्यांचा दुर्दैवी अंत झाला. या खुनाचा बदला खुनानेच घ्यायचा हा विचार पक्का करण्यात आला. चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, जयगोपाल व आदि या कटात सहभागी होते.
दि. २७ डिसेंबर १९२८ रोजी पोलीस अधीक्षक स्काॅटच्या कार्यालयात क्रांतीकारक शिरले.तेवढ्यात राजगुरू यांच्या समोर प्रथम सँडर्स आला. राजगुरू यांनी त्यास स्काॅट समजून त्याच्यावर गोळ्या झाडल्या. क्षणात सँडर्स खाली कोसळला व त्याचा जागीच अंत झाला. क्षणाचा विलंब न करता सर्व क्रांतीकारक तेथून पशार झाले. जवळपास ९ महिन्यांनी दि.३० सप्टेंबर १९२९ रोजी शिवराम हरि राजगुरू पुण्यात पकडले गेले. दि. २५ ऑक्टोबर रोजी खटला उभा राहिला. १५ जणांवर आरोपपत्र ठेवण्यात आले. राजगोपाल हा माफिचा साक्षिदार झाला. न्या. श्रीकृष्ण यांच्यापुढे खटल्याचे काम चालु होते. न्यायमुर्तींनी राजगुरूंना त्यांच्या नावाबद्दल विचारले असता ते म्हणाले 'My name is Rajguru, who teach the rallers' फाशीच्या शिक्षेची सुनावणी झाली. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव तिघेही खुप आनंदात होते. दि. २४ मार्च १९३१ रोजी फाशी द्यायची होती. परंतु ब्रिटिश जेल मॅन्युअलचा नियम डावलून दि २४ ऐवजी २३ मार्च १९३१ रोजी या तिघांना फाशी देण्यात आली. 'भारत माता की जय' 'भारत माता की जय' अशा जयघोषात तिघांचा अंत झाला.
मित्रांनो सर्वप्रथम गोळी झाडणारे आपले हुतात्मा राजगुरू होते व सर्वप्रथम गळ्यात फास अडकवणारेही आपले हुतात्मा राजगुरूच होते. एवढा जुनून आणि जज्बा या क्रांतीकारकांत भारत मातेच्या रक्षणार्थ भिनला होता. आज या घटनेला जवळपास ८८ वर्षे पूर्ण झाली. आज 88 वर्षे झाली हुतात्मा राजगुरूंच्या बलिदानाची स्मृती भीमेच्या काठी असलेला पडीक अवस्थेतील त्यांचा वाडा आजही तरूणांना एक आदर्श वाटावा म्हणून जागवत उभा आहे.
कुंडली प्रमाणे राजगुरूंची जन्मतारीख २४ ऑगस्ट अशी आहे. तर त्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर २६ ऑगस्ट आहे.
भीमा नदीच्या तीरी वसलेल्या 'खेटस' (सन ९९३ मधील अपराजित राजाच्या जंजिर ताम्रपटातील उल्लेख ) या गावचे 'खेड' असे नाव झाले. औरंगजेबाने खेड मुक्कामी असताना त्याचे नाव 'मसुदाबाद' असे केले होते, राजगुरूंच्या बलिदानामुळे खेडचे नाव "राजगुरूनगर" असे झाले.
"राजगुरूनगर" आहे कोठे? कसा असेल बर राजगुरूंचा वाडा? हे जाणून घेण्याची इच्छा आपणास झाली असेलच नाही का? आपण हजारो वेळा पुणे ते नाशिक या मार्गाने प्रवास केला असेलच. कितीतरी वेळा आपण राजगुरूनगरच्या भीमा नदीच्या पुलावर वाहतुक कोंडीत तास न तास अडकला पण असाल. परंतु डावीकडे व उजवीकडे वळून कधी पाहिले का? नसेल तर राजगुरूनगरचे पोलीस स्टेशन जे भीमा नदीच्या पुलाच्या अगदी शेजारीच उत्तर किनाऱ्यावर आहे. तेथून एक रस्ता पश्चिमेला जातो. पुढे गावातून कुमार आळीतून भीमा नदिकडे जाताना आपणास राजगुरूंच्या वाड्याचे प्रवेशद्वार दिसते. प्रवेशद्वाराच्या पश्चिमेस एका कोणाड्यात एक पौराणिक दगडीशिल्प निदर्शनास पडते. प्रवेशद्वार समोर उभे राहील्यास अनेक घरांच्या विळख्यात दक्षिणेला मधोमध जुन्या पद्धतीची रूंद चौकट, त्याच्यावरील साधे परंतु सुबक असे रेखीव नक्षीकाम नजरेत भरते. चौकटीवरील गणेशपट्टी आणि आखीवरेखीव कोरीव काम अजूनही स्पष्टपणे दिसते. दोन्ही दरवाजे त्यावरील कोरीवकामामुळे आजही आपले तत्कालीन रांगडे सौंदर्य टिकवून आहेत. दरवाजाच्या वर नगारखान्यासारखा एखादा सोपा असावा. आता तो जवळपास ढासळलेला आहे.
प्रवेशद्वारातून आत गेल्यावर तीन फूट उंचीचे व १५ फूट लांबीचे घडीव दगडांचे जोते दिसते. चार पाय-या चढून जोत्यावर गेल्यावर समोरच राजगुरूंचे देवघर,बाजुंच्या भिंती पडल्या असल्या तरी सहज ओळखता येते. आज हे संवर्धीत करण्याचा चांगला प्रयत्न केला गेला आहे. यात शिवराम हरिंच्या जन्माची खोली पाहून त्यांचे क्रांतिकारी बालरूप आपल्या नजरेसमोर उभे राहते. संवर्धीत करताना सर्व लग, खांब,तुळ्या पूर्वीच्याच वापरलेल्या असून त्याला रंधा मारून पाॅलिश करण्यात आला आहे. सध्या भिंतीवर हुतात्म्यांची अनेक छायाचित्रे भिंतीवर लावण्यात आली आहे. शिवराम हरींची प्रतीमाही एका टेबलावर ठेवली असून त्याची पुजा केली जात असावी. जन्मस्थळाच्या बाहेरून पश्चिम भिंती पाशी एक जमीनीत गाडलेला पुरातन रांजण आढळुन येतो. हा रांजण जुन्नर तालुक्यातील वडज येथील खंडोबा मंदिरातील दगडी रांजणासारखा दिसून येतो त्यामुळे हे एकाच तोडीतले असल्याने याचे जतन केले गेले पाहिजे.
जन्मस्थान खोलीच्या पुर्वेकडे ९ पाय-या खाली उतरून गेल्यावर साधारण पणे ३० फूटावर एक जुना आड असून त्यावर झाकण ठेवून पाणी सेंदण्याचे लोखंडी चक्र उभे केले आहे. डाव्या बाजूला पागेची जागा व त्यावरील पडीक इमारत पहावयास मिळते. बाजूला तालमिची जागा आहे. जवळच पूर्वाभिमुख दिंडी दरवाजा बंद अवस्थेत दिसून येतो. याच दरवाजाने बाहेर पडण्यासाठी दगडी पाय-या व त्यावर दगडी छत अजुनही चांगल्या स्थितीत दिसते. दिंडी दरवाजाच्या दोन्ही बाजूला उतरण्यासाठी पाय-या आहेत. एका पाय-यांनी नदिकडे जाता येते तर दुसऱ्या बाजूने गावाकडे जाता येते. वाड्याच्या जुन्या भिंती अजूनही बर्‍या स्थितीत दिसून येत आहेत.
या वाड्याची भूमी ही एक महान क्रांतिकारकाचे जन्मस्थळ म्हणुन पर्यटकांस आपल्याकडे खुणावत आहे. महाराष्ट्रातील प्रत्येकाने त्या ठिकाणी जाऊन त्या भूमीचे दर्शन घेण्याचे भाग्य प्राप्त केले पाहीजे. कारण या भुमीत जन्मलेल्या क्रांतिकारक " शिवराम हरी राजगुरू" यांचे भारताच्या इतिहासात सुवार्णाक्षरांनी नाव कोरले गेले आहे.
ही पोस्ट प्रत्येक महाराष्ट्रातील फेसबुक वर असलेल्या मित्रांनी अगदीच गर्वाने क्रांतिकारक " शिवराम हरी राजगुरू" यांच्या पराक्रमाची गाथा व प्रेरणा म्हणुन शेअर करायला पाहिजे.
लेखक/ छायाचित्र : श्री.खरमाळे रमेश, शिवनेरी भुषण
(माजी सैनिक खोडद)
मो.नं. 8390008370
शिवाजी ट्रेल
वनविभाग जुन्नर
फेसबुक पेज- निसर्ग रम्य जुन्नर तालुका .

 #राजगुरुनगरचा_दुर्लक्षित_दिलावरखानचा_गुंबज.      पुण्या पासुन ४० कि.मी अंतरावर उत्तरेस पुणे नाशिक महामार्गावर वसलेले व ...
31/10/2018

#राजगुरुनगरचा_दुर्लक्षित_दिलावरखानचा_गुंबज.
पुण्या पासुन ४० कि.मी अंतरावर उत्तरेस पुणे नाशिक महामार्गावर वसलेले व हुतात्मा राजगुरू यांच्या पदस्पर्शाणे पावण झालेले शहर अर्थात हुतात्मा राजगुरू यांची जन्मभूमी म्हणजे राजगुरुनगर होय. पुर्वी या शहराची व तालुक्याची ओळख "खेड" अशी होती. कुणी या खेडची ओळख खेड -मंचर म्हणुन करत. याच शहरातून एक रस्ता वाडा या गावाकडे जातो. आपणास कदाचित माहीत नसेल की याच रस्त्याच्या कडेला उत्तरेस अगदी जवळच भाजी बाजार भरतो. याच भाजी बाजाराची उत्तर भिंत म्हणजे राजगुरुनगरला पुर्वी पाणिपुरवठा करण्यात येत असे त्याच छोट्या धरणाची भिंत होय. या धरणातून नदिला पाणी सोडण्यासाठी दोन दरवाजे आजही पहावयास मिळतात. परंतु हे दोन दरवाजे नामशेष होण्याच्या मार्गावर असून पाण्याचा प्रवाह गाडला गेला असून सध्या त्याच सपाट भागावर भाजी बाजार भरतो. याच भिंतीच्या पश्चिमेला ओढ्याच्या पलिकडे एक सात एकरात तटबंदी निदर्शनास पडते. या तटबंदीला पुर्वेस एक छोटा दरवाजा निदर्शनास पडतो तर मुख्य दरवाजा संगम क्लाॅथ सेंटच्या समोरच तटबंदीच्या दक्षिणेस प्रवेश करण्यासाठी मुख्य प्रवेशद्वार आपली प्रतिक्षा करताना आढळून येते. आत मध्ये प्रवेश केला की समोरच १०० फुटावर सतराव्या शतकातील दुरावस्थेतील बांधकामाचा एक उत्तम नमुना निदर्शनास पडतो तो म्हणजेच दिलावरखानचा गुंबज.
मोगल सेनापती दिलावरखान आणि त्याचा छोटा भाऊ यांच्या दोन कबरी या गुंबज मध्ये असून येथील प्रवेशद्वाराच्या चौकटीवर त्रिकोणी भागात एक लेख आहे. सुरुवातीला अरबी भाषेत असलेला लेख नंतर फारशी भाषेत कोरला गेला आहे.
जवळपास तीनशे अठ्याऐंशी वर्षांपूर्वीची ही दिलावरखानची ही वास्तू आहे. मुंबई गॅझेटीयर खंड १८, भाग ३,सन १८८५ मध्ये या गुंबजची माहीती दिलेली आढळते.
या देखण्या वास्तूभोवतीच्या कौट्युक्त बंदिस्त आवारात उद्ध्वस्त झालेली बाग असून, गुंबजच्या पश्चिमेला एक दूसरा मोडकळीस आलेला गोल गुंबज आखरी घटका मोजत असल्याचे दृश्य दिसते. धरणाच्या पाण्याचे उत्कृष्ट नियोजन या सात एकर परिसरात करण्यात आले असावे असे वाटते. नंतरच्या काळात या ठिकाणी विविध थडगी उभारण्यात आली असावीत असे वाटते.
या संपूर्ण परीसराकडे अमुल्य ऐतिहासिक ठेवा म्हणून पाहणे गरजेचे आहे म्हणून हा ठेवा जतन केला गेला पाहिजे. इतिहास तेव्हाच घडतो जेव्हा समोर कुणी लढवय्या असेल तरच मग तो कुणीही असो. ही बाब लक्षात घेता राजगुरुनगर ग्रामस्थांनी या वास्तूचे संवर्धन करण्यासाठी ठोस पावले उचलून हा ठेवा जतन करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
मी श्री. लवंगे व प्रदीप शिंदे यांचा आभारी आहे की आपण ही वास्तू दाखविण्यास मदत केलीत.
लेख/ छायाचित्रे - श्री रमेश खरमाळे, माजी सैनिक
शिवनेरी भुषण
८३९०००८३७०
वनविभाग जुन्नर
"शिवाजी ट्रेल"
रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी

Address

Chakan
410501

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Khed Taluka Tourism Development Group posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category