शिवसह्याद्री Trekking Group

शिवसह्याद्री Trekking Group Great Trekking Organization

आपल्या व्हाट्सएप समूहात जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा !!!
14/08/2020

आपल्या व्हाट्सएप समूहात जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा !!!

WhatsApp Group Invite

वानरलिंगी सुळका, श्री किल्ले जीवधन 🚩 सह्याद्रीच्या बालाघाट डोंगर रांगेच्या दक्षिणेस नाणेघाट हा सातवाहन कालीन घाटमार्ग आह...
13/12/2019

वानरलिंगी सुळका, श्री किल्ले जीवधन 🚩 सह्याद्रीच्या बालाघाट डोंगर रांगेच्या दक्षिणेस नाणेघाट हा सातवाहन कालीन घाटमार्ग आहे. पुण्या पासून अंदाजे १३० कि.मी. अंतरावर जुन्नर मार्गे येथे जाता येते. या घाटावर लक्ष ठेवण्यासाठी जीवधन किल्ल्याची निर्मिती करण्यात आली होती. या किल्ल्या शेजारीच वानरलिंगी किंवा खडापारशी हा सुळका ताठ मानेने उभा आहे.⛰

प्रबळगड - मुरंजननाव प्रबळगडउंची २३०० फूटप्रकार गिरिदुर्गचढाईची श्रेणी कठिणठिकाण रायगड जिल्हा, महाराष्ट्र, भारतजवळचे गाव ...
29/06/2019

प्रबळगड - मुरंजन
नाव प्रबळगड
उंची २३०० फूट
प्रकार गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी कठिण
ठिकाण रायगड जिल्हा, महाराष्ट्र, भारत
जवळचे गाव
डोंगररांग माथेरान
सध्याची अवस्था व्यवस्थित
प्रबळगड - मुरंजन
किल्ले मुरंजन उर्फ प्रबळगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. हा किल्ला मुंबई-पुणे हमरस्त्यावरुन दिसतो. पूर्वेला उल्हास नदी, पश्चिमेला गडी नदी, दक्षिणेला पाताळगंगा नदी, माणिकगड आणि नैऋत्येला कर्नाळा किल्ला आहे, तसेच जवळच असलेला इरशाळगड.

इतिहास
उत्तर कोकणातील हा किल्ला त्याच्या मुलुखात असलेल्या पनवेल, कल्याण या प्राचीन बंदरांवर नजर ठेवण्यास असावा. किल्ल्यावरील गुहांच्या अभ्यासावरुन त्यांचा कालखंड बौद्ध कालाशी जोडता येतो. त्यांच्यावरील मनुष्यनिर्मित गुहांमुळेच उत्तरकालातील शिलाहार, यादव या राज्यकर्त्यांनी त्याला लष्करी चौकी बनवून मुरंजन असे नाव दिले. बहामनीच्या कालात हा किल्ला आकारास आला असावा. नंतर अहमदनगरच्या निजामशाहीच्या ताब्यात तो आला. निजामशाहीच्या अस्तावेळी शहाजीराजांनी निजामशाहीच्या वारसाला छत्र धरून निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न केला. पण मोगल सम्राट शाहजहान आणि विजापूरचा आदिलशहा यांनी तह करून आपल्या संयुक्त फौजा शहाजीराजांच्या मागावर पाठवल्या. तेव्हा शहाजीराजे पळ काढून कोंढाणा व मुरंबदेवाच्या डोंगरात निघून गेले. नंतर कोकणात जंजिऱ्याच्या सिद्दीकडे गेले असता त्याने आश्रय नाकारल्यावर चौलला पोर्तुगीजांकडे गेले. पण त्यांनीही नकार दिल्यावर शहाजीराजे जिजाऊ, बालशिवाजी आणि लष्करासह मुरंजनावर गेले. सन १६३६ मध्ये बालशिवाजींनी मुरंजनाचा उंबरठा ओलांडला. १६३६ मध्ये माहुलीचा तह झाला. त्यात उत्तर कोकण मोगलांच्या ताब्यात गेले आणि मुरंजनवर मोगली अंमल सुरू झाला. पण प्रत्यक्षात तेथे विजापूरच्या अदिलशहाचीच सत्ता होती. पुढे ही संधी शिवरायांनी साधली. जेव्हा शिवरायांनी जावळीच्या चंद्रराव मोरेला हरवून जावळी ताब्यात घेतली, त्याचवेळी म्हणजे १६५६ मध्ये शिवरायांचा शूर सरदार आबाजी महादेव याने कल्याण भिवंडी पासून चेऊल ते रायरीपर्यंतचा सारा मुलूख स्वराज्यात घेतला. तेव्हा मुरंजन शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला. किल्ल्याचे नाव बदलून किल्ले प्रबळगड असे ठेवण्यात आले. पुढे १६६५ मध्ये पुरंदरच्या तहानुसार मोगलांना दिलेल्या २३ किल्ल्यांमध्ये प्रबळगड शिवाजी महाराजांनी दिला. जयसिंगाने किल्ल्यावर राजपूत केशरसिंह हाडा हा किल्लेदार नेमला. पुढे पुरंदरचा तह मोडला. मराठे किल्ले परत घेत असतांना मराठयांशी झालेल्या लढाईत केशरसिंह धारातीर्थी पडला. तत्पूर्वी राजपूत स्त्रियांनी जोहार केला. केशरसिंहाची आई व दोन मुले किल्ल्याच्या झडतीत सापडले.शिवरायांच्या आदेशानुसार त्याने सन्मानाने देऊळगावी मोगल छावणीत पाठवण्यात आले. नंतर किल्ल्यावर खोदकामात बरीच संपत्ती आढळली.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे
प्रबळगडचा माथा म्हणजे एक मोठे पठार आहे. सर्व पठारी भाग हा जंगलाने व्यापलेला आहे.

* गडावर एक गणेश मंदिर आहे. तसेच तीन पान्याच्या टाक्या सुध्दा आहेत. मात्र ही टाकी शोधण्यासाठी व गडावर फिरण्यासाठी बाटल्या घेणे आवश्यक आहे.

* प्रथम इंग्रजांनी प्रबळगडचा माथेरान सारखे थंड हवेचे ठिकाण म्हणून करण्याचा विचार केला होता मात्र पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे तो विचार मागे पडला.

* गडावर तीन चार इमारतींचे अवशेष आहेत. घनदाट कारवीच्या जंगलामुळे गडावरील वाटा नीट दिसत नाहीत.

* मात्र गडावरुन माथेरानचे विविध पाँईट फार सुंदर दिसतात.

पोहोचण्याच्या वाटा :
१ शेडुंग मार्गे :- मुंबईहून किंवा पुण्याहून येणार्‍यांनी पनवेल गाठावे. जून्या पनवेल - पुणे हमरस्त्यावर शेडुंग गावाकडे जाणारा फाटा आहे. एस्‌टी चालकांना सांगून शेडुंग फाट्यावर उतरावे. हमरस्त्यावरून जाणारी वाट पकडावी अर्ध्या तासाच्या रस्त्यावर शेडुंग गाव लागते. शेडुंग गावापासून (अंतर ५ किमी) ठाकुरवाडीपर्यंत चालत जावे. ठाकुरवाडी हे गडाच्या पायथ्याचे गाव आहे. गावातून बैलगाडीची वाट थेट आपल्याला प्रबळमाचीवर घेऊन जाते. प्रबळमाचीवर जाण्यास १ तास लागतो. प्रबळमाची गावातून समोरच किल्ला व कलावंतीणीचा सुळका यामधील खिंडीतून कलावंतीणीच्या सुळक्यावर जाण्यासाठी कातळात खोदलेल्या पायर्‍यांची वाट आहे. या घळीतून कलावंतीणीच्या सुळक्यावर जाण्यासाठी पाऊण तास लागतो.

प्रबळमाची गावातून किल्ल्याचा माथा डावीकडे ठेवत ३० मिनीटे चालल्यावर एक घळ दिसते . येथून गडावर जाण्यास एक तास पुरतो. ठाकूरवाडी जाण्यास पनवेलहून बसेस आहेत.

२ पोईंज मार्गे : पनवेल चौक मार्गावर शेडुंगच्या पुढे पोईंज फाटा आहे. तिथे उतरून पोईंज गावात पोहचावे. येथे समोरच असणार्‍या डोंगर सोंडेवरून प्रबळमाची या गावात जावे. येथून दीड ते दोन तासात प्रबळगड गाठावा.

३ माथेरान ते प्रबळगड : माथेरान जवळील शार्लोट जलाशया जवळील श्री पिसरनाथ मंदिराजवळून डावीकडे वळल्यावर दहा मिनिटात आपण एका घळीत येऊन पोहोचतो. लोखंडी शिड्यांच्या साहाय्याने दोन तासात आकसर वाडी या गावात पोहोचता येते. आकसर वाडीतून प्रबळगडचा डोंगर चढत काल्या बुरूजाखाली असलेल्या पठारावरून घळीतून वर चढत गडमाथा गाठावा लागतो.

राहाण्याची सोय :
गडावर रहाण्याची सोय नाही. शेडुंग गावातील शाळेच्या कट्ट्यावर २५ ते ३० माणसांची झोपण्याची सोय होऊ शकते

पाण्याची सोय :
बारमाही पिण्याच्या पाण्याच्या टाक्या आहेत

मलंगगड
29/06/2019

मलंगगड

शिवसह्याद्री Trekking Group तर मित्रांनो दिनांक ११ व १२ मे रोजी आपल्या परिवाराने गोरखगड मोहीम आखली होती मोहिमेदरम्यान गड...
20/05/2019

शिवसह्याद्री Trekking Group

तर मित्रांनो दिनांक ११ व १२ मे रोजी आपल्या परिवाराने गोरखगड मोहीम आखली होती
मोहिमेदरम्यान गडभ्रमंती आणि गडाची साफसफाई हे दोन मुद्दे लक्षात घेऊन मोहीम आखली होती
मित्रानो साध्याच्या स्थितीला कार्य तर तुम्ही सर्वच करत आहात पण एक असे कार्य हाती घेतले आहे जे महाराजांच्या
गडकिल्यांचे रक्षण करण्यासाठी महत्वाचे आहे !!

आपला समूह काय करतो ?

1:: गड किल्यावर काही दुर्ग प्रेमी पर्यटक वाटा चुकतात त्यासाठी दिशादर्शक फलक लावणे किंवा रंगाच्या साह्याने बाण दाखवून गडावर जाण्याची दिशा निश्चित करणे ...याने पर्यटकांचे गडावरील चुकण्याचे प्रमाण कमी होईल ....

2:: मार्गदर्शन ही एक किल्ली आहे गडाचे टोक गाठण्यासाठी ......

3:: ज्या गड किल्यावर मूर्ख लोकांनी ज्यांना इतिहासाची जाण नाही अश्या कपल्स लोकांनी गडावर जी स्वताची नावे लिहिली आहेत ती कायमची खोडून त्या दगडांचे किल्यांची स्वतःचे अस्तित्व जपून ठेवण्याचा कार्य हाती घेत आहे ..... तरी सर्व दुर्ग प्रेमी 🙏🏻 पर्यटक , इतिहास अभ्यासक , दुर्ग संघटना यांना विनंती करतो या कार्यात आपले सहकार्य असावे ...

ज्यांना कुणाला या कार्यात सहकार्य करायचे असेल त्यांनी समूहासोबत संपर्क साधावा🙏🏻

🚩..एकटा माणूस जग बदलू शकत नाही म्हणून तुमचे सहकार्य मोलाचे असेल 🙏🏻🚩

https://youtu.be/riHlqlvJqvgनमस्कार मंडळी बऱ्याच दिवसानंतर परत एकदा घेऊन आलोय तुमच्यासाठी एक थरारक भन्नाट गोरखगडाचा विडि...
20/05/2019

https://youtu.be/riHlqlvJqvg

नमस्कार मंडळी
बऱ्याच दिवसानंतर परत एकदा घेऊन आलोय तुमच्यासाठी एक थरारक भन्नाट गोरखगडाचा विडिओ
मित्रांनो जर तुम्हाला video आवडला असेल तर जास्तीत-जास्त share करा
आणि
Subscribe करा यार आपल्या channel ला😊

भैरवगड (मोरोशी)       सह्याद्रीची रचना ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे बाहेर आलेल्या लाव्हा रसामुळे झालेली आहे. या लाव्हरसाचे...
03/05/2019

भैरवगड (मोरोशी)
सह्याद्रीची रचना ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे बाहेर आलेल्या लाव्हा रसामुळे झालेली आहे. या लाव्हरसाचे थर थंड होतांना अनेक वैशिष्ट्यपूर्ण रचना तयार होतात. त्यापैकी एक रचना म्हणजे "डाईक "; ही रचना आपल्याला भैरवगडा वरती पहायला मिळते. डाईक म्हणजे लाव्हारसाच्या विशिष्ट प्रकारे साठण्यामुळे व थंड होण्यामुळे बेसॉल्ट खडकाची तयार झालेली भिंत. भैरवगडाचा बालेकिल्ला अशाच मुख्य डोंगररांगे पासून अलग झालेल्या डाईकवर (बेसॉल्ट खडकाच्या ४०० फूट उंच, सरळसोट भिंतीवर) बनवलेला आहे. त्याची रचना व त्यामागची आपल्या पूर्वजांची कल्पकता पहातांना आपण थक्क होऊन जातो.

माळशेज घाटाच्या अलिकडे मुख्य डोंगररांगे पासून बाहेर आलेल्या डोंगरावर भैरवगड किल्ला आहे. ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यात माळशेज घाटाच्या पायथ्याशी मोरोशी गाव आहे. या गावाच्या मागे भैरवगड किल्ला आहे. किल्ल्याची रचना पहाता या किल्ल्याचा उपयोग टेहळणीसाठी होत असावा.

या गडाच्या बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी गिर्यारोहणाचे सामान व गिर्यारोहण तंत्राची माहिती असणे आवश्यक आहे.

26/11/2018

नमस्कार मंडळी आपल्या channel वर परत एकदा तुमचं मनापासुन स्वागत तर मित्रांनो परत एकदा घेऊन आलोय तुमच्यासाठी एक भन्नाट ....

भुईकोट मोहीम किल्ला क्र.- ४ धारुरचा किल्ला. अर्धा दिवसभर धर्मापूरीच्या  इतिहास आणि शिल्प कोंदणात हरवून परत बाहेर पडण कठी...
07/09/2017

भुईकोट मोहीम किल्ला क्र.- ४

धारुरचा किल्ला.

अर्धा दिवसभर धर्मापूरीच्या इतिहास आणि शिल्प कोंदणात हरवून परत बाहेर पडण कठीण होत पण तरीही 'इथे परत एकदा येऊ' अशी मनाची समजूत घालत आम्ही धर्मापुरी गावाचा निरोप घेतला आणि पुढच्या वाटेला लागलो. धर्मापुरी पासून धारूर साठी थेट बससेवा नाही. धर्मापुरी-अंबेजोगाई-धारूर असा प्रवास करावा लागतो.ठरल्याप्रमाणे आम्ही आधी अंबेजोगाईला आलो आणि तिथून पुढचा प्रवास आम्ही खाजगी(वडाप) वाहनाने केला. अंबेजोगाई-धारूर अंतर ३५ कि.मी आहे. धारूर बसस्थानकातून सरळ रस्ता हा किल्ल्यातच जातो त्यामुळे कुठेही चुकण्याची शक्यता नाही. १० मिनिटे चालल्यावर आपल्याला किल्ला दृष्टीस पडतो.लांबूनच किल्ला बलदंड आहे हे जाणवत आणि असे बरेच विचार मनात आणत आपण किल्ल्याच्या दरवाज्यापाशी येतो.भुईकोट किल्ल्यांना अभेद्य बनवत तो म्हणजे त्याभोवती असलेला खंदक.बहुतेकदा खंदक हा किल्ल्याच्या चारही बाजूला खोदलेला असतो पण धारूर किल्ल्याच्या बाबतीत असे दिसत नाही.किल्ल्यात प्रवेश करतांना उजव्या बाजूला खंदक वजा तलाव आहे ज्याला 'सोलापुरी दिंडी' व 'खारी दिंडी' अशी नावे आहेत. हा तलाव एके ठिकाणी संपतो तिथून पुढे खोल दरी आहे आणि तलावातील पाणी दरीत पडू नये म्हणून बांध घालून पाणी अडवलेले आपल्याला बघायला मिळते. किल्ल्याच्या डाव्या बाजूला ही एक तलाव आहे त्याला 'गोडी दिंडी असे संबोधले जाते पण हा तलाव किल्ल्याच्या आतील बाजूस आहे. आधी 'खंदक'त्यानंतर महाद्वासमोरची 'जिभी' असे अग्निदिव्य पार करून शत्रुसैन्याला किल्ल्यात प्रवेश करावा लागेल आणि त्यातून ही कोणी वाचलच तर पहिली तटबंदी आणि मुख्य तटबंदी च्या मध्ये तो नक्की चिरडला जाईल ह्याची पुरेपूर काळजी घेतली गेली आहे. पहिल्या मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्यावर डाव्या हाताला काटकोनात वळावे लागते तिथून आपल्याला दुसरे प्रवेशद्वार दिसते. दुसऱ्या प्रवेशद्वाराच्या डाव्या हाताला जाणारी वाट दोन तटबंदीमधून जाणारी असून तिचा अंत थेट गोडी दिंडी मध्ये होतो अशी अफलातून आणि चक्रावणारी रचना इथे पाहायला मिळते. पाणीटंचाई आणि दुष्काळ हा मराठवाड्याच्या पाचवीला जरी पुजलेला असला तरीही इथे असलेल्या तलावातील पाणी कधीच पूर्णपणे आटत नाही असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. किल्ल्याची रचना जर बघितली तर असे लक्षात येते की किल्ल्याची बांधणी ही पुरेपूर विचारपूर्वक आणि कल्पकतेने केलेली आहे.बालाघाट पर्वतरांगेच्या सुरवातीला ह्याची रचना केलेली आहे त्यामुळे किल्ल्याला नैसर्गिक संरक्षण सुद्धा आहे त्यामुळे किल्ला भुईकोट आणि डोंगरी असा मिश्र स्वरूपाचा आहे. धारूर गावातून जर किल्ल्यात प्रवेश केला तर भुईकोट आणि केज मार्गे प्रवेश केला तर डोंगरी. किल्ल्यात बांधकामे चालू आहेत एका खाजगी कंपनीकडे ह्याचे कंत्राट आहे आणि खूप सुंदर असे काम ह्या कंपनीने केलेले आहे आणि करत आहेत. किल्ल्यात बघण्यासाठी बऱ्याच वास्तू आहेत हवामहाल, हमामखाना, दर्गा, घोड्यांच्या पागा, तेल-तुपाचे टाके,बराकी-सैनिकांच्या खोल्या, मस्जिद, रंगमहाल तसेच २८-३० लहान मोठे बुरुज आहेत ज्यात शाह बुरुज, खंदक बुरुज, खंडेराय बुरुज,टांकसाळ बुरुज आहेत. किल्ल्यावर सर्वत्र मुस्लिम राजवटीची छाप दिसते . बहमनी आणि आदिलशाही सत्ता येथे नांदल्याने बऱ्याच वास्तूमध्ये कालांतराने बदल झालेले आहेत. महाराजांच्या आग्र्याहून सुटकेनंतर औरंगजेबाच्या आदेशावरून नेतोजी पालकरांना काही काळ इथे बंदिवासात ठेवण्यात आले होते. एकूणच खूप काही घडामोडी इथे घडलेल्या आहेत.किल्ल्यावर ३ ठिकाणी शिलालेख आहेत पहिला शिलालेख हा टांकसाळ बुरुजावर आहे जो जमीनीपासून २० फूट उंचीवर लावलेला आहे जो फारसीमध्ये लिहिलेला आहे. दुसरा शिलालेख किल्ल्याच्या आत असणाऱ्या मशिदीच्या दरवाजावर आहे जो फारसी मध्ये लिहिला आहे आणि तिसरा शिलालेख हा षट्कोनी आकार असलेल्या हत्ती बुरुजावर आहे. हा शिलालेख तीन भाषांमध्ये आहे फारसी, अरबी आणि देवनागरी. हत्ती बुरुजावर शिलालेखाच्या खाली दोन शरभ आणि मध्यभागी हत्ती कोरलेला आहे. किल्ल्यात मशीद ज्या ठिकाणी आहे तिथे एक मनोरा असून तो किल्ल्यात पाण्याची व्यवस्था व्हावी ह्यासाठी बांधण्यात आला होता. किल्ल्याच्या बऱ्याच बुरुजांची रचना ही अर्धगोलाकार आहे आणि त्यात आतपर्यंत जाण्यासाठी पायऱ्या केलेल्या आहेत. किल्ल्याचे एक प्रवेशद्वार पश्चिम भागात आहे ज्याला 'डोंगरमुखी प्रवेशद्वार' असेही संबोधले जाते.संपूर्ण किल्ला फिरण्यास ३ तास पुरतात. किल्ल्याची बांधणी ही अभ्यासण्यासारखी असून इथे भुईकोट किल्ल्याच्या बांधणीचे सर्व प्रकार बघायला मिळतात ज्यात जिभी, खंदक, शेरहाजी ह्यांचा समावेश आहे. किल्ला फिरतांना किल्ल्याचा नकाशा आपल्याकडे असेल अशी सोय करावी. दुर्गबांधणीचा उत्कृष्ट नमुना आणि अपरिचित इतिहास आपल्यात दडवून ठेवलेल्या ह्या महादुर्गाला एकदा भेट देऊन नक्की त्याचे सौंदर्य नक्की अनुभवण्यासारखे आहे.

अमोल जामदरे

स्वप्नातील_घरएक छाेट घर डाेंगराच्या कुशीतहिरवा निसर्ग डाेलताेय खुशीत.. रमणीय नजरा सभाेवतालचामाझा पिंडच घडताेय हिरवाईच्या...
08/07/2017

स्वप्नातील_घर

एक छाेट घर डाेंगराच्या कुशीत
हिरवा निसर्ग डाेलताेय खुशीत..
रमणीय नजरा सभाेवतालचा
माझा पिंडच घडताेय हिरवाईच्या मुशीत.!

साेनकीची फुले, गवताचे गालिचे
दवबिंद तिथे माेत्यासमान भासे..
आईची कूस, मायेची उब
मातीचा गंध वेडावताे इथे.!

झुळझुळ पानी, निर्मळ झरा
पाण्याची खरी चव इथेच मिळते..
गर्द पाेपटी इरकली लुगडे
नेसून धरती इथेच सजते.!

वेडावताे मी अश्या या जागी
विसरताे स्वत:ला, विसरताे जगाचा पसारा..
आणताे मला मग भानावर
माझा सखा साेबती रानवारा.!!

#रानवारा

फाेटाे :- सभार.. स्नेहा काटकर

Address

Darga Road Malang Gad
Kalyan

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when शिवसह्याद्री Trekking Group posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category