05/03/2025
🔱 कल्याण यात्रा आयोजित विशेष पर्वयात्रा 🔱
प्रभास पुष्कर पर्वयात्रा
🙏आपल्या प्रत्येकाला प्रश्न पडला असेल की पुष्कर म्हंटलं की राजस्थान मधील पुष्कर तीर्थ. परंतु नाही पुष्कर म्हणजे हा एक पर्व म्हणजेच पुण्यकाल आहे हा आपल्या भारतातील पवित्र नद्यांमध्ये दर सव्वा वर्षांनी ज्यावेळी गुरु एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो याला गुरु पुष्कर म्हणतात. तर हा गुरु पुष्कर दर एक ते सव्वा वर्षांनी विविध मोठ्या नद्यांमध्ये होतो मागच्या वर्षी नर्मदेमध्ये पर्व झाला म्हणून नर्मदा पुष्कर झाला. या वेळी तो 14 मे 2025 वृषभ राशीतून मिथुन राशीत गुरु प्रवेश करणार आहे तर (सरस्वती पुष्कर) प्रभास पुष्कर होणार आहे.
ज्यावेळी गुरु राशी प्रवेश करतो त्यावेळी हा बारा दिवसांचा पर्वकाळ होतो या 12 दिवसांमध्ये जो कोणी स्नान, दान, तर्पण, अर्चन, पूजन करतो आणि विशेष करून नवग्रहातील गुरु बृहस्पतीची उपासना करतो त्याला कैक पटीने (हजार पटीने) किंवा त्याहीपेक्षा जास्त पटीने पुण्याची वृद्धी होते जशी तुमची श्रद्धा त्याचप्रमाणे तुमचं फळ आपल्या भविष्यात एक उच्चतम स्थान मिळू शकते. तसेच सुख, सौभाग्य, आयुष्य, संपत्ती तसेच आपल्या स्थानामध्ये मोठं स्थान तसेच भौतिक सौख्य आध्यात्मिक सुख वेगवेगळ्या प्रकारच्या क्षेत्रामधील गुरूचं मार्गदर्शन म्हणजेच गुरुचा सपोर्ट याला आत्ताच्या सद्यस्थितीतील मेंटोर असं म्हणू शकता मिळून देण्याची शक्ती या परवात आहे. तसेच ज्या व्यक्तींना ज्या स्त्रियांना पुरुषांना संतती होत नसेल किंवा संतती संबंधात कुठल्याही प्रकारचे दोष कुंडलित असतील ते सुद्धा या पर्व काळातील स्नानामुळे निराकरण होतात.
सर्वसाधारणपणे दाक्षिणात्य विभागात म्हणजे आंध्र, तमिळ, कर्नाटक या क्षेत्रामध्ये हा पर्व विशेष करून केला जातो म्हणजे या वेगवेगळ्या नद्यांमध्ये स्नान केले जाते आणि म्हणून विशेष करून ही लोकं वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये अग्रेसर असतात. आपल्या क्षेत्रामध्ये उच्चतम स्थान प्राप्त करून घेतात. आपल्या महाराष्ट्रामध्ये विशेष करून ह्याचं ज्ञान नसल्यामुळे किंवा फार कमी जे अभ्यासू आहेत त्यांनाच याविषयीची माहिती असते म्हणून ते या क्षेत्रामध्ये जाऊन स्नान, दान, पूजा, तर्पण इत्यादी करून आपल्याला पाहिजे ते प्राप्त करून घेतात. याला आपल्याला समजण्याच्या भाषेत गुरुचे पाठबळ मिळणे असं म्हटलं तरी चालेल हे पाठबळ देण्याचं काम कईक पटीने हा पर्वकाळ करतो. म्हणून आवर्जून जास्तीत जास्त लोकांनी या यात्रेमध्ये सामील होण्याचा प्रयत्न करावा.
या यात्रेच्या संबंधातील विशिष्ट माहिती वेळोवेळी आपल्याला पुरवली जाईल. हा गुरू 14 मे 2025 रात्री वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करत आहे म्हणून ही यात्रा मुंबई सेंट्रल वरून गुजरात वेरावल सोमनाथला जाणार आहे हे प्रभास पुष्कर स्नान झाल्याबरोबर आपण त्या क्षेत्रात जाणार आहोत म्हणून गुजरात मधील सोमनाथ प्रभास तीर्थ तसेच याबरोबर द्वारका, बेट द्वारका, गिरनार दत्तप्रभू चे स्थान व अशा अजून काही विशिष्ट ठिकाणी आपण जाणार आहोत.
आमच्याशी जोडण्यासाठी पुढील लिंक वर आपण क्लिक करावं जेणेकरून आपला सहभाग हा ग्राह्य धरला जाईल आणि या यात्रेच्या संबंधातील शुल्क जे काही असेल ते सद्यस्थितीला आपण फोन करून संपर्क करून आमच्याशी जाणून घेऊ शकता. या यात्रेमध्ये भोजन निवास हे सर्व यामध्ये समाविष्ट असणार आहे ही सर्व साधारण व्यवस्था असणार आहे तसेच आपल्याला विशेष एसी गाडी, एसी राहण्याची व्यवस्था हवी असेल तर त्या संबंधात विशेष अतिरिक्त शुल्क आपल्याला द्यावे लागेल ते आपल्याला फोन केल्यावर समजेल.
वेळोवेळी या यात्रा संबंधांमधील माहिती आपल्याला कळविण्यात येईल तरी लवकरात लवकर लिमिटेड जागा असल्यामुळे साधारण आपण 12 मार्च पर्यंत आपली नोंदणी करावी धन्यवाद.
या यात्रेमुळे होणारे लाभ खालील प्रमाणे.....
गुरु हा संतती कारक असल्यामुळे ज्या कोणाला संतती होत नसेल व संतती व्हावी असे वाटत असेल त्यांनी ही यात्रा आवर्जून करावी.
द्रव्यप्राप्ती अर्थप्राप्ती
पुण्यप्राप्ती (पुण्य लाभ)
भौतिक सुखे व पारमार्थिक सुख
शास्त्रज्ञाना विषयी प्रगती होणे
बुद्धिमत्ता प्राप्त होणे
सांपत्तीक स्थिती सुधारणे
उत्तम आचरण
क्षमाशीलता
शहाणपणा म्हणजे योग्य वागण्याची बुद्धिमत्ता अंगात येणे
तारतम्य ज्ञान
जर शरीरात मेद वाढत असेल मेदासंबंधी जे काही रोग किंवा आजार असतील ते कमी होण्यास सहाय्यभूत ठरेल.
तसेच ज्या कोणाला पत्रिकेमध्ये शापा संबंधी काही अडचणी म्हणजेच देव, गुरु, ब्राह्मण आचार्य अन्य कोणाचे शाप असतील तर ते या तीर्थात स्नान केल्यामुळे नाहीसे होऊ शकतील किंवा त्यांचे दोष कमी होण्यास मदत होईल.
व आपल्या गुरूंची कृपा होईल व कुंडलीतल्या गुरुची कृपा लाभेल.
या यात्रेत आपल्याला मिळणाऱ्या गोष्टी......
अध्यात्मिक ज्ञान
स्नान करण्याच्या वेळी स्नान संकल्प व त्याचे महत्त्व
सांघिक गुरु विषयी यज्ञ
जर कोणाला पर्सनली गुरुची पूजा करण्याचे असल्यास तशी व्यवस्था केली जाईल तसे आगाऊ सांगणे
भोजन निवास व्यवस्था
या कार्यक्रमात प्रसंगानुरूप बदल करण्याचे अधिकार सर्वतोपरी आयोजकावर आहेत ते वेळोवेळी प्रसंगानुरूप बदल करू शकतील.
ते सर्वांना बंधनकारक असेल तरी याची सर्वांनी नोंद घ्यावी. आपल्या सूचना व मार्गदर्शन हे आपण आम्हास नक्कीच सांगू शकता त्याचे स्वागतच आहे.
धन्यवाद!
⚡ त्वरित बुक करा! ⚡
📞 आशिष जोशी गुरुजी: +91 98207 75445 | +91 90040 26882
🔗 अधिक माहितीसाठी WhatsApp ग्रुप जॉईन करा:
👉 https://chat.whatsapp.com/Ex6jE6AUCkZEMF4XrDl3RD