स्वर्गाहुन सुंदर आमच कोंकण

  • Home
  • India
  • Pernem
  • स्वर्गाहुन सुंदर आमच कोंकण

स्वर्गाहुन सुंदर आमच कोंकण कोंकणातील मंदिर, सागरीकिनारे, पर्यटन स्थळे तसेच सुंदर - सुंदर कोंकणातील दृश्य पाहण्यासाठी आपल हे पेज लाइक करा.
(1755)

कोणा कोणाला दिसला पिकलेला आंबा.एकादा पिकलेला आंबा दिसला झाडावर की त्यालाबोलत काय 'कवंजार" ,दिसतोय . 🌴    #        #राजाप...
30/05/2026

कोणा कोणाला दिसला पिकलेला आंबा.
एकादा पिकलेला आंबा दिसला झाडावर की त्याला
बोलत काय 'कवंजार" ,दिसतोय .

🌴 # #राजापूर #कोकण #राजापूरकर #गावं_वाचवा #कोकण #निसर्ग #शिमगा

कोणाला माहित्याय का हे काय आहे.. आणि कशाला वापरतात..  #कोकण      #कोकणकर
30/05/2026

कोणाला माहित्याय का हे काय आहे.. आणि कशाला वापरतात.. #कोकण #कोकणकर

चिरमुरे नाहीत तर हा देवाच्या प्रसाद आहे.
30/05/2026

चिरमुरे नाहीत तर हा देवाच्या प्रसाद आहे.

आईच्या हातचं जेवण म्हणजे सुख ♥️ #कोकण  #आई
30/05/2026

आईच्या हातचं जेवण म्हणजे सुख ♥️
#कोकण #आई

"पॅरालिसिसचा झटका आलेला असतानाही त्यांनी..." दिग्दर्शक प्रविण तरडेंनी उघड केला मोहन जोशींचा 'तो' थक्क करणारा थरार!दिग्दर...
30/05/2026

"पॅरालिसिसचा झटका आलेला असतानाही त्यांनी..." दिग्दर्शक प्रविण तरडेंनी उघड केला मोहन जोशींचा 'तो' थक्क करणारा थरार!

दिग्दर्शक प्रविण तरडे यांचा 'देऊळ बंद २' हा चित्रपट सध्या चित्रपटगृहात धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटात स्वामी समर्थांच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी पुन्हा एकदा आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना थक्क केले आहे. दरम्यान, 'लोकसत्ता'ला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत प्रविण तरडेंनी मोहन जोशी यांच्याबद्दल एक असा धक्कादायक आणि डोळ्यात पाणी आणणारा खुलासा केला आहे, जो ऐकून संपूर्ण सिनेसृष्टी या ज्येष्ठ नटाच्या जिद्दीला सलाम करत आहे.

प्रविण तरडेंनी सांगितले की, चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मोहन जोशी यांना 'पॅरालिसिसचा' (अर्धांगवायू) सौम्य झटका आला होता. त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक होती आणि डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला होता. चित्रपटाचे शूटिंग थांबण्याची आणि लांबणीवर पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. मात्र, अशा गंभीर परिस्थितीतही मोहन जोशी यांनी कमालीचे धाडस आणि कामाप्रती असलेली निष्ठा दाखवली.

​"त्यांच्या शरीराची एक बाजू व्यवस्थित काम करत नव्हती, बोलताना त्रास होत होता, तरीही त्यांनी 'शूटिंग थांबवायचं नाही' असा निर्णय घेतला आणि कॅमेऱ्याला सामोरे गेले," असे तरडेंनी भावूक होत सांगितले. आजारपणावर मात करत त्यांनी स्वामी समर्थांचे कठीण सीन अत्यंत ताकदीने पूर्ण केले. एका खऱ्या कलाकाराची कलेप्रती असलेली ही भक्ती आणि जिद्द सध्या सोशल मीडियावर कमालीची व्हायरल होत असून नेटकरी मोहन जोशी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

गेली बारा वर्षे सावंतवाडी दिवा पॅसेंजर मध्ये चाकरमान्यांचे उदरभरण करणारी अन्नपूर्णा म्हणजे अनुष्का आमणेअतिशय अदबीने बोलण...
30/05/2026

गेली बारा वर्षे सावंतवाडी दिवा पॅसेंजर मध्ये चाकरमान्यांचे
उदरभरण करणारी अन्नपूर्णा म्हणजे अनुष्का आमणे

अतिशय अदबीने बोलणाऱ्या आणि हसतमुख असलेल्या अनुष्का ताई कणकवलीच्या रहिवासी आहेत. कोकणचं वैभव असलेल्या आंबोळी चटणी ची विक्री करत अनुष्का ताईंनी आपल्या व्यवसायाची सुरुवात केली.
गेली ५/६ वर्षे त्या पुरण पोळीची विक्री कोकण रेल्वे मध्ये करतात. दिवा सावंतवाडी पॅसेंजर हे त्याचं हक्काचं विक्री केंद्र. कधीतरी स्टेशनवर क्रॉसिंग साठी दुसरी एखादी ट्रेन असेल तर तिथेही त्या आपल्या पुरणपोळ्या इतरांना खाऊ घालतात.

अनुष्का ताई कडच्या पुरणपोळ्या अतिशय मऊ लुसलुशीत आणि चविष्ट आहेत. दररोज जवळपास २०० पुरणपोळ्या त्या बनवतात. ५० रुपयाला एक पॅकेट असून त्यात ३ पुरणपोळ्या असतात.

जवळपास १२ वर्षे सातत्याने व्यवसाय करणे आणि हे करत असताना नेहमी हसतमुख राहणे, ग्राहकांशी अदबीने संवाद साधणे आणि तेही मालवणी, कोकणी माणसाने म्हणजे जरा अवघडच. पण अनुष्का ताई हे वेगळं व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या व्यावसायिक कर्तृत्वाला सलाम.

अनुष्का ताईंचा व्यवसाय वृद्धिंगत होवो, त्यांना उत्तम आरोग्य लाभो याच सदिच्छा.

पोस्ट साभार ✍🏻© अमोल थिटे

पाऊस पडून गेल्यावर वाडीत वेगळंच वातावरण तयार होतं
30/05/2026

पाऊस पडून गेल्यावर वाडीत वेगळंच वातावरण तयार होतं

गड रायगड: इतिहास आपला अभिमान, स्वच्छता आपले कर्तव्य!महाराष्ट्र ही संतांची आणि शूरवीरांची भूमी आहे. या भूमीला छत्रपती शिव...
30/05/2026

गड रायगड: इतिहास आपला अभिमान, स्वच्छता आपले कर्तव्य!

महाराष्ट्र ही संतांची आणि शूरवीरांची भूमी आहे. या भूमीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा आणि जाज्वल्य इतिहासाचा वारसा लाभला आहे. महाराष्ट्रातील गडकिल्ले हे केवळ दगड-धोंड्यांचे उभे राहिलेले तट नसून, ते आपल्या स्वाभिमानाचे आणि अस्मितेचे जिवंत साक्षीदार आहेत. यातच सर्वोच्च स्थानी येतो तो म्हणजे 'किल्ले रायगड'—स्वराज्याची राजधानी!

आजही जेव्हा आपण रायगडावर पाऊल ठेवतो, तेव्हा तिथली माती महाराजांच्या आणि मावळ्यांच्या पराक्रमाची साक्ष देते. शिवछत्रपतींच्या सिंहासनाचा तो परिसर, मेघडंबरी, आणि तिथली भव्यता पाहून प्रत्येक शिवभक्ताचे हृदय अभिमानाने भरून येते. पण आज एका महत्त्वाच्या गोष्टीवर विचार करण्याची वेळ आली आहे.

"रायगडावर पाऊल ठेवा, पण कचरा नाही!"
आपण जेव्हा गडावर जातो, तेव्हा आपण तिथे फिरायला जाणारे 'पर्यटक' नसतो, तर नतमस्तक व्हायला जाणारे 'यात्रेकरू' असतो. परंतु, दुर्दैवाने काही ठिकाणी गडावर प्लास्टिकच्या बाटल्या, खाण्याचे वेष्टन (रॅपर्स) आणि कचरा विखुरलेला दिसतो. ज्या मातीसाठी हजारो मावळ्यांनी आपले रक्त सांडले, ती माती प्लास्टिक आणि कचऱ्याने दूषित करणे हा एकप्रकारे आपल्या इतिहासाचा अवमान आहे.

"रायगडावर पाऊल ठेवा, पण कचरा नाही. स्वच्छता ही खरी शिवभक्ती आहे!"

स्वच्छता हीच खरी शिवभक्ती!
महाराजांना केवळ "जय भवानी, जय शिवराय" च्या घोषणा देऊन किंवा सोशल मीडियावर फोटो टाकून मानवंदना देणे पुरसे नाही. जर आपण स्वतःला शिवभक्त म्हणवून घेतो, तर गडांचे पावित्र्य राखणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे.

प्लास्टिकला नकार द्या: गडावर जाताना प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर टाळा किंवा वापरल्यास त्या वस्तू स्वतःसोबत परत खाली घेऊन या.

कचराकुंडीचा वापर करा: गडावर कुठेही कचरा टाकू नका. परिसर स्वच्छ ठेवण्यात प्रशासनाला आणि तिथल्या संस्थांना मदत करा.

इतरांना जागृत करा: आपल्यासोबत येणाऱ्या मित्रांना आणि कुटुंबालाही गडाचे पावित्र्य राखण्याचे महत्त्व पटवून द्या.

छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि त्यांनी उभे केलेले स्वराज्य आजही आपल्याला शिस्त, आदर आणि व्यवस्थापन शिकवते. गडांची स्वच्छता राखणे हीच महाराजांना दिलेली सर्वात मोठी आणि खरी त्रिवार मानाची वंदना ठरेल.

चला, एक सुजाण नागरिक आणि सच्चे शिवभक्त म्हणून आपण सर्वांनी प्रतिज्ञा करूया—"आपले गडकिल्ले, आपणच स्वच्छ ठेवणार!"
जय शिवराय!

रत्नागिरी जिल्हा आणि त्याच्या तालुक्यातील खास वैभव...❤️     #कोंकण    #गावंवाचवा        #रत्नागिरी      #कोकण    #लांजा ...
30/05/2026

रत्नागिरी जिल्हा आणि त्याच्या तालुक्यातील खास वैभव...❤️

#कोंकण #गावंवाचवा #रत्नागिरी #कोकण #लांजा #कोकणकर 🏝️

तुझे सर्व कामे लवकर होतील रे बाबा..
30/05/2026

तुझे सर्व कामे लवकर होतील रे बाबा..

Address

15°21′42″N 75°05′06″E
Pernem
0832

Alerts

Be the first to know and let us send you an email when स्वर्गाहुन सुंदर आमच कोंकण posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share