Konkan Darshan - कोकण दर्शन

Konkan Darshan - कोकण दर्शन Konkan Darshan is a tourist company specialist in Konkan and Coastal tours in Maharashtra.

गावची लोकसंख्या सहाशे गावात तीनशे नेपाळी राहतात .....गावाचे उत्पन्न दहा कोटी पण यातले आठ कोटी कोकणा बाहेर जातात.   एका न...
22/04/2026

गावची लोकसंख्या सहाशे गावात तीनशे नेपाळी राहतात .....

गावाचे उत्पन्न दहा कोटी पण यातले आठ कोटी कोकणा बाहेर जातात.

एका नेपाळीचा पगार सरासरी 15000 रुपये म्हणजे महिना 45 लाख आणि सहा महिन्यात दोन कोटी सत्तर लाख रुपये पगार नेपाळी देवगड मधल्या एका छोट्या गावातून घेऊन जातात.

असे फक्त देवगड राजापूर आणि रत्नागिरी या तीन तालुक्यांमध्ये एक लाख हून अधिक नेपाळी सहा महिने कोकणात येऊन राहतात ते आले नाहीत तर कोकणातील आंबा शेती बंद पडेल अशी आजची स्थिती आहे कारण कोकणात राहिला माणसे नाहीत.
दरमहा दीडशे कोटी म्हणजे जवळपास 900 कोटी रुपये आर्थिक उत्पन्न कोकणातील या तीन तालुक्यातून नेपाळला जाते.

गैरसमज करून घेऊ नका ही नेपाळी तरुणांवर टीका नाही, प्रचंड परिश्रम ही मुले कोकणात येऊन करतात बागांमध्ये राहतात बागांची काळजी घेतात खते घालतात फवारण्या करतात आंबे काढतात पॅकिंग करतात आणि मग कोकणाबाहेरील दलाल हे आंबे विकतात. अंबा बागायतदार शेतकऱ्यांचा नाईलाज आहे कारण त्यांना कोकणातील श्रीमंत आंबा शेती टिकवायचे असेल तर या नेपाळी कामगारांशिवाय पर्याय नाही.

कारण कोकणातील तरुण आता कोकणात राहत नाही दहा टक्के तरुण सुद्धा कोकणात राहायला तयार नाहीत ते सर्व मुंबई पुण्यात येतात, यातले 80 टक्के बारा पंधरा हजार फार फार तर 20000 रुपयांची महिना नोकरी घेऊन कळवा किंवा दिवा डोंगरावर झोपडपट्टीमध्ये राहतात. मग त्याची पत्नी छोटी मोठी काम करते मुलांची काळजी घ्यायला आई सुद्धा येते, सगळं कुटुंब मिळून ३०/४० हजार रुपये महिना कमावतो, कळवा दिवा नालासोपारा डोंगरावर झोपडपट्टी मध्ये भाड्याने खोली घेणं आणि कसेबसे आयुष्य घालवणे, शिमग्याला आणि गणपतीला चाकरमानी भाऊ म्हणून कोकणात जाणं ही कोकणची जीवनपद्धती झाली आहे . हे तरुण दररोज जीवावर उदार होऊन कळवा ते सीएसटी आणि नालासोपारा ते चर्चगेट प्रवास करतात. आता तर कोकणातील माणसे वेगाने नालासोपारा वसई पालघरच्या दिशेने आणि कळवा दिवा बदलापूर कर्जतच्या दिशेने वेगाने प्रवास करत आहे. आणि दुसऱ्या बाजूला कोकण रिकामे झाले आहे.

दहा टक्के का होईना पण कोकणातील तरुण जिद्दीने कोकणात राहत आहे आणि आता खूप कमी प्रमाणात पण मुंबईत गेलेला कर्तुत्वान कोकणी तरुण पुन्हा कोकणात येऊन गावात उद्योग सुरू करत आहे. पण त्यांची वस्तुस्थिती काय, मुंबईतल्या कोकणातील मुली आणि कोकणातल्या शेतकऱ्यांच्या सुद्धा कोकणातील मुली कोकणातल्या मुलांबरोबर लग्न करायला तयार नाहीत. कोकणात अनेक बागायतदार आहेत ज्यांचे वर्षाचे उत्पन्न 50 लाख, कोटी दोन कोटी आहे पण तरीही त्याच्या मुलाबरोबर लग्न करायला मुली नाहीत अनेक मुलांची केवळ या कारणास्तव लग्न झाली नाहीत होत नाहीत, अगदी कोकणातल्या शेतकऱ्यांच्या मुली सुद्धा कोकणातल्या तरुणांबरोबर लग्न करायला तयार नाहीत, याकरता त्या मुलाला गाव सोडून मुंबईत पंधरा-वीस हजाराची नोकरी पकडायला लागते तेव्हा त्याला मुलगी मिळते. काहीजण अगदी श्रीमंत बागायतदारांची मुले सुद्धा मुंबईत येऊन काही वर्ष नोकरी करतात लग्न करतात आणि मग पुन्हा गावाला जातात इतकी वाईट सामाजिक स्थिती कोकणात आहे. आणि या मानसिकतेमुळे कोकणचा पुढचं भवितव्य अतिशय वाईट आहे. या सर्वाचा परिणाम म्हणून पुढची पिढी कोकणात राहिला तयार नाही , कोकणातला प्रचंड परिश्रमी आंबा बागायतदार शेतकरी यांना वृद्ध झाल्यानंतर आपल्या बागा विकणे याशिवाय पर्याय राहणार नाही अशी खूप दुर्दैवी स्थिती आहे.

आता मी आपल्याला एका गावाची अर्थव्यवस्था सांगतो ही सत्यकथा आहे मी गावाचे नाव मुद्दाम लीहित नाही. पण हे प्रतिनिधीक काय आणि सर्व गावांमध्ये ही स्थिती आहे.

हे छोटे गाव आहे या गावांमध्ये पाच शेतकरी अशी आहेत जे वर्षाला वीस हजार पेटी प्रत्येकी उत्पन्न हापूस आंब्याची मिळवतात. आणि पंधरा-वीस शेतकरी चार ते पाच हजार पेटी उत्पन्न असलेले आहेत. म्हणजे दीड लाख पेटी हापूस आंब्याचे उत्पन्न या गावातील परिश्रमी शेतकरी मिळवतात. सुमारे 30 कोटी चे आर्थिक उत्पन्न या एका छोट्या गावामध्ये फक्त हापूस आंबे मिळते. यातले फक्त पन्नास हजार पेटी उत्पन्न या गावातून निघते असे आपण पकडले आणि अगदी दलाला आंबे विकले तरीही देवगडत लवकर आंबा येतो म्हणून दोन हजार रुपये पेटीचा सरासरी पकडली तर या गावांमध्ये दहा कोटी रुपये आसपास उत्पन्न केवळ हापूस आंब्यातून निर्माण होते. काजूचे उत्पन्न आणि समुद्रकिनारी गाव असेल तर माशाचे उत्पन्न हे मी पकडले नाही. यावरून तुमच्या हे लक्षात येईल की कोकण आत्ताच श्रीमंत आहे कोकण गरीब कधीच नव्हते फक्त इथली मानसिकता गरीब आहे.
हिवरे बाजार आणि अनेक पश्चिम महाराष्ट्रातल्या गावांच्या कौतुक होतं पण कोकणामध्ये पंधरा-वीस पंचवीस कोटी उत्पन्न असलेली अनेक गाव आहेत.

आता या गावांमध्ये हापूस आंब्याचे दहा कोटी रुपयांचे उत्पन्न येते याची काय होते याचे विश्लेषण आपण करूया या गावांमध्ये 300 नेपाळी आंबा बागांची काळजी घेण्यासाठी राहतात आणि यांना
महिन्याला 45 लाख म्हणजे सहा महिन्यांमध्ये. दोन कोटी सत्तर लाख रुपये पगार द्यावा लागतो. जवळपास इतकेच म्हणजे सुमारे तीन कोटी रुपये औषधे फवारण्या खते यासाठी लागते यातलं एकही उत्पादन कोकणात होत नाही म्हणजे हे तीन कोटी रुपये कोकणा बाहेर जातात, याशिवाय लाकडी पेट्या ट्रान्सपोर्ट, दलाली कमिशन या पोटी अजून दीड दोन कोटी रुपये खर्च होतो.
म्हणजे दहा कोटी पैकी सुमारे आठ कोटी रुपये यातील एकही पैसा कोकणात राहत नाही . हे सर्व पैसे कोकण बाहेर जातात. हे सर्व विश्लेषण पाहिल्यानंतर ज्यांना कोकणात उद्योग करायचे आहे त्यांना किती संधी आहेत हे लक्षात येईल. हे सर्व उद्योग कोकणा बाहेरील मंडळी करतात.

इतके प्रचंड परिश्रम करून कोकणातल्या या शेतकऱ्यांना दोन अडीच कोटीची उत्पन्न मिळते. कधीकधी आंबा कमी येतो आणि काहीच उत्पन्न मिळत नाही, कधी कधी आंबा जास्त येतो पण दलाल भाव देत नाही, मात्र दरवर्षी नेपाळी फवारणी खते आणि बाकीचा खर्च करावाच लागतो आणि तो मात्र नक्की कोकणा बाहेर जातो.

श्रीमंत कोकणातील गरीब मानसिकता आणि गरीब शासकीय धोरणे या सगळ्यांमुळे कोकणची हळूहळू वाताहत होत आहे. दहा वर्ष झाली आंबा काजू बोर्ड बनवलाय अजून सुरू झाला नाही, आंबा काजू मार्केटिंग साठी आणि या शेतकऱ्यांना पाठबळ मिळावे म्हणून कोणतीही धोरणे बनवताना दिसत नाहीत, माकडांच्या समस्यामुळे संपूर्ण कोकणातला शेतकरी हैराण आहे आंबा बागायतदाराची सुद्धा किमान दहा वीस टक्के नुकसान माकडांमुळे होत आहे.

एकूणच सामाजिक शासकीय प्रशासकीय सर्वच पातळ्यांवर कोकणात अतिशय निराशा जनक वातावरण आहे,

अर्थात यातून मार्ग काढण्यासाठी मानसिकता बदलण्यासाठी शासनाला कोकणात चांगल्या योजना राबवण्यासाठी भाग पाडण्यासाठी एक मोठी लोक चळवळ हवी, आमच्या परीने शिवस्वराज्याच्या माध्यमातून ग्लोबल कोकणच्या माध्यमातून अशा स्वरूपाशी लोक चळवळ भविष्यात उभी राहील यासाठी प्रयत्न करत राहणे इतकच आमच्या हातात आहे.

जय शिवराय
संजय यादवराव
ग्लोबल कोकण
समृद्ध मराठी चेंबर ऑफ कॉमर्स
शिवस्वराज्य एक लोक चळवळ

copy paste

*कुठ आहे  बेरोजगारी*?????  *गेले 15 दिवस रत्नागिरीतील विविध ठिकाणी तुम्ही सकाळी पाहाल तर शेकडो नेपाळी लोक वेगवेगळ्या बस ...
20/04/2026

*कुठ आहे बेरोजगारी*?????
*गेले 15 दिवस रत्नागिरीतील विविध ठिकाणी तुम्ही सकाळी पाहाल तर शेकडो नेपाळी लोक वेगवेगळ्या बस स्टॉप वर उतरलेले दिसतील .... स्त्री पुरुष तरुण म्हातारे सगळे बरोबर आपले सामान घेवून उभे असतात... काही वेळाने एखादा टेंपो .. एखादी जीप येते त्यातून काहीजणांना त्यातून घेवून जातात.... आता प्रश्न पडेल कोण असतात ही लोक? मित्रांनो आता आंबा सीजन चालू झाला आहे... फवारणी... साफसफाई... बागेची राखण अशा अनेक कामासाठी मनुष्य बळ लागते... त्यासाठी हजारो नेपाळी रत्नागिरीत येत असतात .. त्यांना आणले जाते... कारण .. कारण... आपल्या जिल्ह्यात अशा कामासाठी माणसे मिळत नाहीत... किंबहुना अशी कामे करणे त्यांना हलके पणाचे वाटते... 6 ते 7 महिने हमखास रोजगार संधी मिळते पण आपल्या कडील तरुणांना हे काम नको असते... कदाचित कमी पणाचे मानले जात असावे .. आता कष्ट करणे... श्रमाची कामे करणे.. मेहनत करणे .. यात कोकणी तरुणाला लाज वाटत असावी असच बहुदा असावे... पण आंबा.. मच्छी.. हे सिझनल बिझनेस आहेत... वेळेत केले तर फायदा .. म्हणून व्यापारी मिळेल तसे.. मागतील तो रोज देवून परप्रांतातून माणसे मागवून आपला व्यवसाय सुरू ठेवत असतात... कारण स्थानिक पातळीवर अशी कामे करण्यासाठी मनुष्य बळ मिळत नसते ... आपण उगाच बेरोजगारी वाढली... नोकऱ्या नाहीत... हाताला काम नाही म्हणत असतो.... जर ही कामे कोकणातील तरुण वर्गाने केली तर कशाला पैसा नेपाळात किंवा आसामात जाईल ...??? विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना*???

© कोकण राज्य अभियान.

🌴 #राजापूर #कोकण #राजापूरकर #गावं_वाचवा #राजापूरकर #गावं_वाचवा

उंबरघर, दापोली अजून एक कोंकणी मुस्लिम वस्ति असलेल गांव. बाणकोट खाडीपासून जैतापुर खाडी पर्यंत पसरलेल्या मुस्लिम वस्त्यांप...
30/03/2026

उंबरघर, दापोली अजून एक कोंकणी मुस्लिम वस्ति असलेल गांव. बाणकोट खाडीपासून जैतापुर खाडी पर्यंत पसरलेल्या मुस्लिम वस्त्यांपैकीच एक. गाव जरी दापोली तालुक्यातल असल तरी ते गुहागर तालुक्याला जवळ पडणार, वाण सामाना साठी खरेदीसाठी सर्व उंबरघर वरुण येतात डिप्कोने(छोटी नाव) कारुळ-पेवेला मग तिथून शृंगारतळीला आमच्या इथे. आता खाडी किनारीची गांव ब्रिजने का अद्याप जोडली गेली नाहीत, हा संशोधनाचा विषय आहेच. इथली सर्व डबिर मंडळी पूर्वापार व्यापारी, काहींचा मासेमारी हा व्यवसाय. इथली हवेल्यांसारखी मोठी घर पाहून लक्षात येत की, लोक काय सुबत्तेत राहिली असतील. इथल्या सर्वच घरांना बोटीने बर्मा साग आणि राजस्थानी दगड बांधकामासाठी आणली गेलीत.

बंदर गाळाने भरली, समुद्री खाडी मार्गे चालणारा व्यापार थंडावला, मासेमारी लोटे MIDC ने बाधित झाली आणि कोंकणी मुस्लिम माणूस नाइलाजाने आखातात पोटापाण्यासाठी जाऊ लागला. हवेल्या ओस पडल्या, जे काही स्थानिक आहेत ते आडमार्गाला सोयी सुविधांची वाणवा, मुलांचीं शिक्षणाची सोय लागावी या करिता दापोली चिपळूण सारख्या शहरांमध्ये राहतात. खुप दिवसांनी नवखा कोणी बघितला की सर्व बोलून मोकळी होतात. यांच कोकणावर कोंकणा भाषेवर खुप प्रेम म्हनूण आज ही यांनी आपली भाषा,संस्कृती, खाद्यसंस्कृती यांच वेगळेपण जपल आहें.

©® पंकज दळवी, गुहागर.

🌴 #राजापूर #कोकण #राजापूरकर #गावं_वाचवा

एप्रिल - मे महिना जवळ आला की सुट्यांमधले गावचे दिवस आठवतात ... दुपारच्या जेवणात घरच्या देवगड हापूसचा हाताने काढलेला रस म...
23/02/2026

एप्रिल - मे महिना जवळ आला की सुट्यांमधले गावचे दिवस आठवतात ...
दुपारच्या जेवणात घरच्या देवगड हापूसचा हाताने काढलेला रस मोठमोठ्य‍ा पातेल्यांच्या प्रमाणात निघायचा ...
जेवतान‍ा प्रत्येकाच्य‍ा पुढ्यात रसाला वाट्या वगेैरे नसून तर थेट वाडगेच असायचे ...
आजोबा आम्हा नातवंडांना हट्टाने आमरस खायला लावायचे ...
मग तो आमरस अंगावर यायचा पण खेळायचं असल्यामुळे आम्ही झोप उडवून लावायचो ...
दुपारचा दंगा सुरु झाला की आजोबा पट्टी घेऊन आमच्या मागे लागून आम्हाला जबरदस्तीने झोपायला लावायचे ...
संध्याकाळी खेळून झाल्यावर आजीसोबत रामाच्या देवळात जायचं ...
संध्याकाळी कधी गुरं घरी परतली नाहीत तर आमची वानरसेना गुरं शोधायच्या नावाखाली इकडे तिकडे भटकून यायची ...
कधीतरी संध्याकाळी दोन किमी पडेल कॅन्टीनपर्यंत चालत जाऊन बाळा पाटलाकडचा वडापाव आणि दूरकराकडे उसाचा रस पिऊन यायचा ...
रात्री जेवण आटोपल्यावर घरच्या सगळ्या मंडळींसोबत गप्पा मारत रातांबे फोडायचे ...
संध्याकाळी आजोबांनी चुलीवर भाजलेले-फोडलेले काजू आजोबा स्वत: रात्री सगळ्यांना वाटायचे ...
आजोबांनी आम्हाला खेळायला करुन दिलेले धनुष्यबाण, लाकडी तलवारी, करवंट्यांच्या दोरी बांधून केलेल्या टापा - घोडे, झावळ्यांची झोपडी ...
गावाला काय आणि किती धमाल केलीये ती सगळी सांगायची - लिहायची तर एखादा ग्रंथ पण कमी पडेल ...
पण गावाला आमचं बालपण सुखात, आनंदात आणि ऐश्वर्यात गेलं एवढं मात्र खरं ...

वाडा-गावठण ता.देवगड जि.सिंधुदुर्ग

पोस्ट साभार © अजय उमेश काणे





#कोकणातील
#राजापूरकर

राजापूरकर
Konkani Ranmanus Ecotourism
#गावाकडच्या आठवणी

आज शिवजयंती!शिवजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा!शिवरायांना मानाचा मुजरा 🙏🏻
19/02/2026

आज शिवजयंती!
शिवजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा!
शिवरायांना मानाचा मुजरा 🙏🏻

तयार मिक्स फळे कापून , डिशमध्ये विक्रीला ठेवण्याचा व्यवसाय, मुंबई पुणे मध्ये मोठ्या प्रमाणावर आढळून येतो. या व्यवसायात ज...
02/02/2026

तयार मिक्स फळे कापून , डिशमध्ये विक्रीला ठेवण्याचा व्यवसाय, मुंबई पुणे मध्ये मोठ्या प्रमाणावर आढळून येतो. या व्यवसायात जवळजवळ 99% मक्तेदारी ही परप्रांतीयांची आहे.

मराठी माणूस या व्यवसायामध्ये जास्त आढळत नाही.

पण चिपळूणच्या सुजय भातडे ने, या व्यवसायामध्ये उतरायचे ठरवले. आणि चिपळूण जवळील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे आपले टेबल टाकले.

सर्वात पहिल्यांदा इथले काय आवडले? तर व्यवस्थित कप पॅक केलेली स्वच्छ कापून ठेवलेली फळे ती खाण्याकरता एक लांबलचक स्टिक, आणि फळे कापणारा स्वतः सुजय हॅन्ड ग्लोज घालून फळे कापत होता.

त्यामुळे ला, आकर्षक रंगसंगती असलेले आणि स्वच्छता असलेले ही फळांची डिश घेण्याचा मोह झाला.

अशा पद्धतीने मराठी व्यवसायिकांनी काम सुरू केले तर नक्कीच नोकरीच्या पाठी धावण्याची. अजिबात गरज नाही

सुजय फोनवरून ऑर्डर नोंदवल्यास हे फ्रूट कप दवाखाने, कार्यालय, इथे नेऊन देतो.

उपवासाच्या दिवशी आपण कार्यालयात ही फळे मागवू शकतो, किंवा आपला पेशंट आजारी असेल तर दवाखान्यामध्ये शुद्ध कापलेली ही फळे इतर काही खाण्यापेक्षा कधीही चांगली.

सुजयला या व्यवसायासाठी शुभेच्छा.

आता फक्त एक करू नका. एकाचा व्यवसाय चालतोय म्हटल्यावर दुसरा लगेच दहा फुटावर समान व्यवसाय टाकतो आणि आणि पहिल्याचा व्यवसाय कमी करून टाकतो.

त्याऐवजी हा व्यवसाय टाकावयाचा असल्यास, दुसरा शहरांमधील स्पॉट निवडावा जेणेकरून दोन्ही माणसे व्यवस्थित पोट भरू शकतील.

सुजय ला फोनवरून ऑर्डर देण्याकरता सुजय चा मोबाईल क्रमांक खालील प्रमाणे.

सुजय भातडे-९९७५३५९९९६

पोस्ट क्रेडिट Chiplun Cha Balya

23/01/2026
अशी पारंपारीक कौलारु  मंदिरे कोकणच्या सौंदर्यात  भर घालतात. गुहागर तालुक्यातील वेळंब गावातील हे गणेश मंदिर!   #कोकणप्रेम...
22/01/2026

अशी पारंपारीक कौलारु मंदिरे कोकणच्या सौंदर्यात भर घालतात. गुहागर तालुक्यातील वेळंब गावातील हे गणेश मंदिर!
#कोकणप्रेमीआशिष ❤️🚩

कोकण हा फक्त बघण्याचा विषय नाही, तर अनुभवण्याचा विषय आहे! ❤️ एकच ध्यास, कोकणाचा विकास!

येवा कोकण आपलोच असा!
🥭🥥🏠🌅🍍🫐🥭🐊🐅🐘☘️🌴🌴🌸🌺🥀⛈️🌧️🌊☔🐟🐬🦐🦀🍉🥭

#कोकण #मालवण

कोकणातील जल, जंगल, जमीन आणि यांच्या सोबतीने जगणारी कष्टकरी माणसं यांचं रक्षण करणाऱ्या ‘राखणदार’ या श्रद्धा-संकल्पनेचा पर...
17/01/2026

कोकणातील जल, जंगल, जमीन आणि यांच्या सोबतीने जगणारी कष्टकरी माणसं यांचं रक्षण करणाऱ्या ‘राखणदार’ या श्रद्धा-संकल्पनेचा परिचय अनेकांना ‘दशावतार’ या सिनेमामुळे झाला आहे. गावोगाव असे राखणदार आढळतात; कोकणी माणसांच्या या श्रद्धाळू मानसिकतेमुळे इथल्या जैवविविधतेनं संपन्न असलेल्या शेकडो देवराया, जंगलं, डोंगर आणि नद्यांचं आजवर जतन होत आलं आहे. जगाला भूरळ घालणारा इथला निसर्ग आणि पर्यावरण या पुढच्या काळातही टिकवायचं असेल तर आपण श्रद्धाळू वा अश्रद्ध काहीही असलो तरी, या राखणदारांना जपलं पाहिजे!
हीच थिम घेऊन सिंधुदुर्गातील दोघा तरूणांनी इथल्या अशा काही निवडक जागांची तोंडओळख करून देणारं एक रंगीत चित्रमय कॅलेंडर प्रकाशित केलं आहे. रानमाणूस म्हणून प्रसिद्ध असलेला प्रसाद गावडे आणि युवाचित्रकार अक्षय सावंत यांनी या देखण्या कॅलेंडरची निर्मिती केली आहे. आर्टपेपरवर छापलेलं हे बारा + दोन पृष्ठांचं कॅलेंडर पाहाताच क्षणी मनाला भूरळ घालतं.
कॅलेंडरवरची या राखणदारांची चित्रं आणि सोबत दिलेली माहिती वाचताना या जागा धुंडाळायची आस लागावी, हेच या निर्मितीचं यश म्हणता येईल. पण या जागा पर्यटनासाठी नाहीत, हेही ध्यानात ठेवूनच इथे जायचा विचार व्हायला हवाय.
- प्रवीण द बांदेकर

कोकण हा फक्त बघण्याचा विषय नाही, तर अनुभवण्याचा विषय आहे! ❤️ एकच ध्यास, कोकणाचा विकास!

येवा कोकण आपलोच असा!
🥭🥥🏠🌅🍍🫐🥭🐊🐅🐘☘️🌴🌴🌸🌺🥀⛈️🌧️🌊☔🐟🐬🦐🦀🍉🥭

#कोकण #मालवण

कोकणाचा सायलेंट फसवा खेळकोकणात काहीतरी फसवणूक चालू आहे—पण ती कुणी मुद्दाम करत नाही, आणि म्हणूनच ती धोकादायक आहे. इथे ना ...
30/12/2025

कोकणाचा सायलेंट फसवा खेळ

कोकणात काहीतरी फसवणूक चालू आहे—पण ती कुणी मुद्दाम करत नाही, आणि म्हणूनच ती धोकादायक आहे. इथे ना मोठे आंदोलन आहेत, ना मोठे ओरडे, ना ठळक मथळे. सगळं शांत आहे. पण याच शांततेत एक सायलेंट फसवा खेळ सुरू आहे—जो कोकणाला हळूहळू आतून पोकळ करतोय.

बाहेरून पाहिलं तर कोकण समृद्ध वाटतो. हिरवीगार जमीन, पाणी मुबलक, फळबागा, सुंदर घरे, वाढते जमीनभाव. पण आतून पाहिलं तर चित्र वेगळं आहे—अनिश्चित उत्पन्न, हंगामी पैसा, स्थलांतर, आणि सततचा आर्थिक ताण. इथेच पहिला फसवा भाग आहे: दिसणारी समृद्धी आणि प्रत्यक्ष आर्थिक वास्तव यात मोठी दरी आहे.

हा खेळ कसा चालतो? कोकणात आपण मेहनत करतो, पण त्या मेहनतीचं मूल्य इथे तयार होत नाही. आंबा, काजू, नारळ, मासे, औषधी वनस्पती—हे सगळं इथून बाहेर जातं. प्रक्रिया, पॅकेजिंग, ब्रँडिंग, मार्केटिंग मात्र इतर ठिकाणी होतं. त्यामुळे नफा, रोजगार आणि निर्णयक्षमता तिथे साचते. आपण कच्चा माल पुरवतो; इतर अर्थव्यवस्था उभी करतात. हा फसवा खेळ शांत आहे, कारण तो रोजच्या व्यवहारात मिसळलेला आहे.

दुसरा फसवा भाग म्हणजे हंगामी समाधान. काही आठवडे पैसे येतात—आंब्याचा हंगाम, काजूचा हंगाम, पर्यटनाचा सीझन. तेव्हा वाटतं, “सगळं ठीक आहे.” पण उरलेल्या महिन्यांत खर्च चालूच असतो. हंगामी पैशावर वर्ष चालवायचा प्रयत्न म्हणजे कायम अस्थिरतेत राहणं. तरीही आपण या अस्थिरतेला “नॉर्मल” मानतो—आणि हा स्वीकारच फसवणुकीचा भाग बनतो.

तिसरा फसवा खेळ म्हणजे जमिनीचं भासमान मूल्य. जमीनभाव वाढतात, म्हणून वाटतं आपण श्रीमंत होत आहोत. पण जमीन ही कागदावरची श्रीमंती असते; प्रत्यक्ष उत्पन्न नसते. गरज पडली की जमीन विकली जाते, पैसे खर्च होतात, आणि दीर्घकालीन उत्पन्नाचा स्रोत संपतो. जमीन विकत घेणारा मात्र तिच्यावर व्यवसाय उभारतो. म्हणजेच आपण संपत्ती सोडतो; इतर तीच संपत्ती उत्पन्नात रूपांतरित करतात.

चौथा फसवा भाग म्हणजे “इथे काही होत नाही” ही मानसिकता. ही वाक्यं इतकी सामान्य झाली आहेत की ती प्रश्नच वाटत नाहीत. पण याच वाक्यांमुळे निर्णय बाहेरच्या शहरांवर अवलंबून राहतात. मुलांनी बाहेर जावं, पैसा बाहेरून यावा, आणि कोकण फक्त राहण्याचं ठिकाण उरावं—हा विचार नकळत रुजतो. हा खेळ शांत आहे, कारण तो विचारांमध्ये घडतो.

पाचवा आणि सर्वात खोल फसवा खेळ म्हणजे आपण हे सगळं पाहूनही गप्प राहतो. कारण बदल कठीण आहे. प्रक्रिया उभारणं, ब्रँड तयार करणं, एकत्र येणं—हे सगळं अवघड वाटतं. म्हणून आपण सध्याच्या व्यवस्थेशी जुळवून घेतो. हळूहळू हीच व्यवस्था “नॉर्मल” होते. आणि फसवणूक इतकी शांत होते की ती फसवणूक वाटतच नाही.

खरं तर कोकणात समस्या निसर्गाची नाही, मेहनतीची नाही—ती रचनेची आहे. निसर्ग देतो, मेहनत होते, पण मूल्यनिर्मितीची दिशा चुकते. हा सायलेंट फसवा खेळ थांबवायचा असेल, तर मोठ्या घोषणा नाही, तर लहान पण ठोस बदल लागतात—कच्च्या मालापासून उत्पादन, उत्पादनापासून ब्रँड, एकट्यापासून क्लस्टर, हंगामापासून सातत्य.

कोकणाचा हा खेळ मोठ्या आवाजात सुरू नाही.
तो शांत आहे.
म्हणूनच तो धोकादायक आहे.

आणि या खेळात हरायचं नसेल,
तर पहिलं पाऊल एकच आहे—
तो खेळ आहे हे ओळखणं.

✍️ दिलीप परब | The Konkan Farmer

Sugandha Essentials
Bhatwadi atpost Tithavali taluka Vaibhavwadi
Dist Sindhudurgh 416703 - Contact Number: 8369882036
website: https://www.houseofsugandha.com

Address

Guhagar
Ratnagiri
415703

Telephone

+91 88885 35284

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Konkan Darshan - कोकण दर्शन posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share