22/04/2026
गावची लोकसंख्या सहाशे गावात तीनशे नेपाळी राहतात .....
गावाचे उत्पन्न दहा कोटी पण यातले आठ कोटी कोकणा बाहेर जातात.
एका नेपाळीचा पगार सरासरी 15000 रुपये म्हणजे महिना 45 लाख आणि सहा महिन्यात दोन कोटी सत्तर लाख रुपये पगार नेपाळी देवगड मधल्या एका छोट्या गावातून घेऊन जातात.
असे फक्त देवगड राजापूर आणि रत्नागिरी या तीन तालुक्यांमध्ये एक लाख हून अधिक नेपाळी सहा महिने कोकणात येऊन राहतात ते आले नाहीत तर कोकणातील आंबा शेती बंद पडेल अशी आजची स्थिती आहे कारण कोकणात राहिला माणसे नाहीत.
दरमहा दीडशे कोटी म्हणजे जवळपास 900 कोटी रुपये आर्थिक उत्पन्न कोकणातील या तीन तालुक्यातून नेपाळला जाते.
गैरसमज करून घेऊ नका ही नेपाळी तरुणांवर टीका नाही, प्रचंड परिश्रम ही मुले कोकणात येऊन करतात बागांमध्ये राहतात बागांची काळजी घेतात खते घालतात फवारण्या करतात आंबे काढतात पॅकिंग करतात आणि मग कोकणाबाहेरील दलाल हे आंबे विकतात. अंबा बागायतदार शेतकऱ्यांचा नाईलाज आहे कारण त्यांना कोकणातील श्रीमंत आंबा शेती टिकवायचे असेल तर या नेपाळी कामगारांशिवाय पर्याय नाही.
कारण कोकणातील तरुण आता कोकणात राहत नाही दहा टक्के तरुण सुद्धा कोकणात राहायला तयार नाहीत ते सर्व मुंबई पुण्यात येतात, यातले 80 टक्के बारा पंधरा हजार फार फार तर 20000 रुपयांची महिना नोकरी घेऊन कळवा किंवा दिवा डोंगरावर झोपडपट्टीमध्ये राहतात. मग त्याची पत्नी छोटी मोठी काम करते मुलांची काळजी घ्यायला आई सुद्धा येते, सगळं कुटुंब मिळून ३०/४० हजार रुपये महिना कमावतो, कळवा दिवा नालासोपारा डोंगरावर झोपडपट्टी मध्ये भाड्याने खोली घेणं आणि कसेबसे आयुष्य घालवणे, शिमग्याला आणि गणपतीला चाकरमानी भाऊ म्हणून कोकणात जाणं ही कोकणची जीवनपद्धती झाली आहे . हे तरुण दररोज जीवावर उदार होऊन कळवा ते सीएसटी आणि नालासोपारा ते चर्चगेट प्रवास करतात. आता तर कोकणातील माणसे वेगाने नालासोपारा वसई पालघरच्या दिशेने आणि कळवा दिवा बदलापूर कर्जतच्या दिशेने वेगाने प्रवास करत आहे. आणि दुसऱ्या बाजूला कोकण रिकामे झाले आहे.
दहा टक्के का होईना पण कोकणातील तरुण जिद्दीने कोकणात राहत आहे आणि आता खूप कमी प्रमाणात पण मुंबईत गेलेला कर्तुत्वान कोकणी तरुण पुन्हा कोकणात येऊन गावात उद्योग सुरू करत आहे. पण त्यांची वस्तुस्थिती काय, मुंबईतल्या कोकणातील मुली आणि कोकणातल्या शेतकऱ्यांच्या सुद्धा कोकणातील मुली कोकणातल्या मुलांबरोबर लग्न करायला तयार नाहीत. कोकणात अनेक बागायतदार आहेत ज्यांचे वर्षाचे उत्पन्न 50 लाख, कोटी दोन कोटी आहे पण तरीही त्याच्या मुलाबरोबर लग्न करायला मुली नाहीत अनेक मुलांची केवळ या कारणास्तव लग्न झाली नाहीत होत नाहीत, अगदी कोकणातल्या शेतकऱ्यांच्या मुली सुद्धा कोकणातल्या तरुणांबरोबर लग्न करायला तयार नाहीत, याकरता त्या मुलाला गाव सोडून मुंबईत पंधरा-वीस हजाराची नोकरी पकडायला लागते तेव्हा त्याला मुलगी मिळते. काहीजण अगदी श्रीमंत बागायतदारांची मुले सुद्धा मुंबईत येऊन काही वर्ष नोकरी करतात लग्न करतात आणि मग पुन्हा गावाला जातात इतकी वाईट सामाजिक स्थिती कोकणात आहे. आणि या मानसिकतेमुळे कोकणचा पुढचं भवितव्य अतिशय वाईट आहे. या सर्वाचा परिणाम म्हणून पुढची पिढी कोकणात राहिला तयार नाही , कोकणातला प्रचंड परिश्रमी आंबा बागायतदार शेतकरी यांना वृद्ध झाल्यानंतर आपल्या बागा विकणे याशिवाय पर्याय राहणार नाही अशी खूप दुर्दैवी स्थिती आहे.
आता मी आपल्याला एका गावाची अर्थव्यवस्था सांगतो ही सत्यकथा आहे मी गावाचे नाव मुद्दाम लीहित नाही. पण हे प्रतिनिधीक काय आणि सर्व गावांमध्ये ही स्थिती आहे.
हे छोटे गाव आहे या गावांमध्ये पाच शेतकरी अशी आहेत जे वर्षाला वीस हजार पेटी प्रत्येकी उत्पन्न हापूस आंब्याची मिळवतात. आणि पंधरा-वीस शेतकरी चार ते पाच हजार पेटी उत्पन्न असलेले आहेत. म्हणजे दीड लाख पेटी हापूस आंब्याचे उत्पन्न या गावातील परिश्रमी शेतकरी मिळवतात. सुमारे 30 कोटी चे आर्थिक उत्पन्न या एका छोट्या गावामध्ये फक्त हापूस आंबे मिळते. यातले फक्त पन्नास हजार पेटी उत्पन्न या गावातून निघते असे आपण पकडले आणि अगदी दलाला आंबे विकले तरीही देवगडत लवकर आंबा येतो म्हणून दोन हजार रुपये पेटीचा सरासरी पकडली तर या गावांमध्ये दहा कोटी रुपये आसपास उत्पन्न केवळ हापूस आंब्यातून निर्माण होते. काजूचे उत्पन्न आणि समुद्रकिनारी गाव असेल तर माशाचे उत्पन्न हे मी पकडले नाही. यावरून तुमच्या हे लक्षात येईल की कोकण आत्ताच श्रीमंत आहे कोकण गरीब कधीच नव्हते फक्त इथली मानसिकता गरीब आहे.
हिवरे बाजार आणि अनेक पश्चिम महाराष्ट्रातल्या गावांच्या कौतुक होतं पण कोकणामध्ये पंधरा-वीस पंचवीस कोटी उत्पन्न असलेली अनेक गाव आहेत.
आता या गावांमध्ये हापूस आंब्याचे दहा कोटी रुपयांचे उत्पन्न येते याची काय होते याचे विश्लेषण आपण करूया या गावांमध्ये 300 नेपाळी आंबा बागांची काळजी घेण्यासाठी राहतात आणि यांना
महिन्याला 45 लाख म्हणजे सहा महिन्यांमध्ये. दोन कोटी सत्तर लाख रुपये पगार द्यावा लागतो. जवळपास इतकेच म्हणजे सुमारे तीन कोटी रुपये औषधे फवारण्या खते यासाठी लागते यातलं एकही उत्पादन कोकणात होत नाही म्हणजे हे तीन कोटी रुपये कोकणा बाहेर जातात, याशिवाय लाकडी पेट्या ट्रान्सपोर्ट, दलाली कमिशन या पोटी अजून दीड दोन कोटी रुपये खर्च होतो.
म्हणजे दहा कोटी पैकी सुमारे आठ कोटी रुपये यातील एकही पैसा कोकणात राहत नाही . हे सर्व पैसे कोकण बाहेर जातात. हे सर्व विश्लेषण पाहिल्यानंतर ज्यांना कोकणात उद्योग करायचे आहे त्यांना किती संधी आहेत हे लक्षात येईल. हे सर्व उद्योग कोकणा बाहेरील मंडळी करतात.
इतके प्रचंड परिश्रम करून कोकणातल्या या शेतकऱ्यांना दोन अडीच कोटीची उत्पन्न मिळते. कधीकधी आंबा कमी येतो आणि काहीच उत्पन्न मिळत नाही, कधी कधी आंबा जास्त येतो पण दलाल भाव देत नाही, मात्र दरवर्षी नेपाळी फवारणी खते आणि बाकीचा खर्च करावाच लागतो आणि तो मात्र नक्की कोकणा बाहेर जातो.
श्रीमंत कोकणातील गरीब मानसिकता आणि गरीब शासकीय धोरणे या सगळ्यांमुळे कोकणची हळूहळू वाताहत होत आहे. दहा वर्ष झाली आंबा काजू बोर्ड बनवलाय अजून सुरू झाला नाही, आंबा काजू मार्केटिंग साठी आणि या शेतकऱ्यांना पाठबळ मिळावे म्हणून कोणतीही धोरणे बनवताना दिसत नाहीत, माकडांच्या समस्यामुळे संपूर्ण कोकणातला शेतकरी हैराण आहे आंबा बागायतदाराची सुद्धा किमान दहा वीस टक्के नुकसान माकडांमुळे होत आहे.
एकूणच सामाजिक शासकीय प्रशासकीय सर्वच पातळ्यांवर कोकणात अतिशय निराशा जनक वातावरण आहे,
अर्थात यातून मार्ग काढण्यासाठी मानसिकता बदलण्यासाठी शासनाला कोकणात चांगल्या योजना राबवण्यासाठी भाग पाडण्यासाठी एक मोठी लोक चळवळ हवी, आमच्या परीने शिवस्वराज्याच्या माध्यमातून ग्लोबल कोकणच्या माध्यमातून अशा स्वरूपाशी लोक चळवळ भविष्यात उभी राहील यासाठी प्रयत्न करत राहणे इतकच आमच्या हातात आहे.
जय शिवराय
संजय यादवराव
ग्लोबल कोकण
समृद्ध मराठी चेंबर ऑफ कॉमर्स
शिवस्वराज्य एक लोक चळवळ
copy paste