25/06/2022
आपण अगणित वेळेला #कोकणातला पावसाळा अनुभवला तरी हा निसर्ग पुन्हा पुन्हा प्रेमात पाडतो. पावसाळ्यात दिसणार निसर्गाचं अद्भुत विविधांगी रूप जेवढं आपण डोळ्यात साठवून घेऊ तेवढं कमीच आहे . उंच सखल डोंगर दऱ्या, लहान मोठे धबधबे , नजर जाईल तिथपर्यंत नववधूचा हिरवा शालू पांघरून सृष्टी सजून जाते. निसर्ग मुक्त हस्ताने सकारात्मक ऊर्जा देत असतो ज्यामुळे मनाचा प्रत्येक कोपरा उत्तेजीत होतो आणि संपूर्ण वर्षभर पुरेल एवढा उत्साह मिळतो.
पांढरे शुभ्र धबधबे, रंगी बेरंगी सड्या वरील फुले, पाने, पक्षी ,हिरवेगार डोंगर, खोल दऱ्या आणि त्यामधून वाहणारे ओढे, जांभ्या दगडाची पठारे (कातळ)आणि त्यावरील कातळशिल्पे सगळंच अप्रतिम त्याचसोबत इथली वैविध्यपूर्ण खाद्य संस्कृती हे आपल्याला आडवळनावरच्या कोकणात अनुभवायला मिळतं.
पावसाच्या सरित चिंब भिजत ,सड्यावरील रंगी बेरंगी फुलांना अनुभवत आयुष्यात प्रत्येकाने एकदातरी हे पावसाळ्यातले निसर्ग पर्यटन अनुभवले पाहिजे
म्हणजे आयुष्य किती सुंदर आहे याची जाणीव होते.
तर सर्वांनी नक्की या आणि आमच्यासोबत सुरक्षित निसर्ग पर्यटन अनुभवा. अधिक माहितीसाठी . संपर्क #हर्षा #हॉलिडे . रत्नागिरी 7499882800,9822290859
(टिपः प्रत्येकाने मर्यादा न ओलांडता निसर्गाचं अप्रतिम सौंदर्य अनुभवावं . आपल्याच चुकीच्या वागण्यामुळे अघटीत घटना घडली तर दोष त्या स्थळाला देऊन उपयोग नाही )