जिल्हा माहिती कार्यालय, सातारा ,District Information Office ,Satara

  • Home
  • India
  • Satara
  • जिल्हा माहिती कार्यालय, सातारा ,District Information Office ,Satara

जिल्हा माहिती कार्यालय, सातारा ,District Information Office ,Satara MAHARASHTRA GOVERNMENT PUBLICITY THROUGH SATARA OFFICE
Visit Our Twitter A/c- twitter.com/Info_Satara
(1)

05/06/2026
05/06/2026

*कोयना धरण ते कोयना संगमापर्यंत पिण्याच्या पाण्याव्यतिरीक्त उपसा बंदी*

सातारा दि. 5 -
सातारा जिल्ह्यातील कोयना नदीवरील (कोयना धरण ते कोयना संगमापर्यंत कोयना नदी) लाभधारकांनी कोयना धरणातील उपलब्ध पाणीसाठा पुरवणे अत्यावश्यक असल्याने महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम १९७६ मधील कलम ११,४९ मधील तरतुदीनुसार ७जून पर्यंत कोयना नदीमधून शेतीसाठी खाजगी उपसा करणाऱ्या व बिगर सिंचन (औद्योगिक कारणास्तव) सर्व योजनांवर उपसा बंदी करण्यात आली आहे. याकाळात केवळ पिण्याचे पाणीपुरवठा करणाऱ्या योजना सुरू राहतील. पिण्याचे पाणी पुरवठा व्यतिरिक्त इतर कारणासाठी (खाजगी) कोयना नदीतून पाणी उपसा केल्यास सदर उपसा अनधिकृत समजून, संबंधितांचा पाणी परवाना व विद्युत पुरवठा एक वर्षाच्या कालावधी करता रद्दबातल करण्यात येऊन, उपसा संच सामुग्री जप्त करण्यात येईल, असे जलसंपदा विभागाने कळविले आहे.

उपसा बंदीचा कार्यक्रम खालीलप्रमाणे.
दि.०४ जून ते ७ जून २०२६ पर्यंत उपसाबंदी राहील . दि. ८ जून २०२६ ते ११ जून २०२६ या कालावधीमध्ये उपसा सुरू राहील. पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन
प्राप्त परिस्थितीनुसार पुढील नियोजन करणेत येईल.

उपसा बंदी असलेल्या कालावधीत कालावधीमध्ये पिण्याचे पाणी पुरवठा व्यतिरिक्त इतर कारणासाठी (खाजगी) कोयना नदीतून पाणी उपसा केल्यास सदर उपसा अनधिकृत समजून, संबंधितांचा पाणी परवाना व विद्युत पुरवठा एक वर्षाच्या कालावधी करता रद्दबातल करण्यात येऊन, उपसा संच सामुग्री जप्त करून पुढील कारवाई करणेत येईल, याची गांभीर्याने नोंद घेऊन जलसंपदा विभागास सहकार्य करावे,

तसेच धरणातील मर्यादित पाणी साठ्याचा विचार करून बिगर सिंचन पाणी वापरकर्त्यांनी सांडपाणी औद्योगिक वापरातील पाणी, थेट नदीत सोडून पाणीसाठा प्रदूषित करू नये. प्रदूषित पाणी वाहून जाण्यासाठी अतिरिक्त पाणी साठा उपलब्ध नसल्याने, सर्व संबंधितांनी याची दक्षता घेऊन पाणी नाश टाळण्यास सहकार्य करावे. जलसंपत्ती ही राष्ट्रीय संपत्ती मानून पाणी वाचवूया व देश वाचूया असे आवाहन कोयना सिंचन विभाग कोयना नगरचे कार्यकारी अभियंता वि.बा. सानप यांनी केले आहे.

05/06/2026

*पर्यावरणाचा वारसा जतन करणे ही सर्वांची जबाबदारी*
*-जिल्हाधिकारी संतोष पाटील*

*पाचगणी टेबललँड पर्यावरण संवर्धन पुस्तिकेचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते प्रकाशन*

सातारा दि. 5- पर्यावरण संवर्धन हीच भावी पिढ्यांसाठीची सर्वात मोठी गुंतवणूक आहे. पर्यावरणाचे रक्षण करण्यसाठी आपण प्रत्यक्ष कृतीमधून आपले योगदान दिले पाहिजे. मागील पिढ्यांनी येथील परिसराचे वैशिष्ट्य व वारसा जतन करुन ठेवला आहे. यापुढेही हा वारसा जतन करणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पाचगणी नगर परिषद व ‘रानवा’ संस्थेच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या ‘पाचगणी टेबललँड’ पर्यावरण संवर्धन व जनजागृती विषयक कॉफी टेबल बुकचे प्रकाशन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याहस्ते संपन्न झाले. यावेळी वाईचे प्रांताधिकारी योगेश खरमाटे, तहसीलदार सचिन मस्के, पाचगणी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंडीत पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, महाबळेश्वर-पाचगणी इको सेन्सीटीव्ह झोनच्या संनियत्रण समितीचे अध्यक्ष सुधाकर नांगनुरे, सदस्य अंकूर पटवर्धन, रानवा संस्थेचे उत्कष घाटे आदी उपस्थित होते.

जागतिक पर्यावरण दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, पाचगणीच्या अद्वितीय नैसर्गिक वारसा, जैवविविधता, दुर्मिळ वनस्पती, पक्षी व पर्यावरण संवर्धनाची माहिती पाचगणी टेबललँड या माहिती पुस्तिकेत समाविष्ट असल्याचे सांगून पर्यावरण संरक्षण, निसर्ग संवर्धन आणि भावी पिढ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत व्यक्त केले.

पाचगणीच्या टेबललँड पठारावर वनस्पती आणि प्राण्यांच्या ६-७ प्रजातींचा उगम झालेला आहे. जगामध्ये कुठेही न आढळणाऱ्या या प्रजाती आपल्याकडे आहेत. म्हणूनच पाचगणी टेबललँड हे पठार वैशिष्ट्यपूर्ण आहे. निसर्गातील काही वनस्पतींचे वैशिष्ट्य व सौंदर्य हे ज्या त्या ठिकाणीच वाढते त्यामुळे याची जपणूक जपणूक करणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे. येथील पर्यटनविषयक व्यवसाय हा येथील वैशिष्ट्यावरच अवलंबून आहे. आपण हे वैशिष्ट्य जेवढं चांगलं सांभाळू, तेवढे जास्त पर्यटक येतील. जेवढे जास्त पर्यटक येतील. पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांकडून अनावधानाने नुकसान होऊ नये यासाठी पर्यटकांना योग्य शिस्त लावण्याची जबाबदारी इथल्या स्थानिक प्रशासन, वन विभाग, गाईड व्यावसायिक तसेच नागरिकांची आहे.

यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याहस्ते प्रातिनिधीक स्वरुपात वृक्षारोपन करण्यात आले. यावेळी पुस्तीका तयार करण्यासाठी मेहनत घेतलेल्या छायाचित्रकार, माहिती सकंलकांचे, मुद्रकांचा सत्कार जिल्हाधिकारी यांच्याहस्ते करण्यात आला. तसेच पठारावर प्लास्टीकच्या 100 टक्के रिसायकलद्वारे बनविण्यात आलेल्या बेंचचे उ्दघाटन जिल्हाधिकारी श्री. पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.

000

*पर्यावरणाचा वारसा जतन करणे ही सर्वांची जबाबदारी**-जिल्हाधिकारी संतोष पाटील* *पाचगणी टेबललँड पर्यावरण संवर्धन पुस्तिकेचे...
05/06/2026

*पर्यावरणाचा वारसा जतन करणे ही सर्वांची जबाबदारी*
*-जिल्हाधिकारी संतोष पाटील*

*पाचगणी टेबललँड पर्यावरण संवर्धन पुस्तिकेचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते प्रकाशन*

सातारा दि. 5- पर्यावरण संवर्धन हीच भावी पिढ्यांसाठीची सर्वात मोठी गुंतवणूक आहे. पर्यावरणाचे रक्षण करण्यसाठी आपण प्रत्यक्ष कृतीमधून आपले योगदान दिले पाहिजे. मागील पिढ्यांनी येथील परिसराचे वैशिष्ट्य व वारसा जतन करुन ठेवला आहे. यापुढेही हा वारसा जतन करणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पाचगणी नगर परिषद व ‘रानवा’ संस्थेच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या ‘पाचगणी टेबललँड’ पर्यावरण संवर्धन व जनजागृती विषयक कॉफी टेबल बुकचे प्रकाशन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याहस्ते संपन्न झाले. यावेळी वाईचे प्रांताधिकारी योगेश खरमाटे, तहसीलदार सचिन मस्के, पाचगणी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंडीत पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, महाबळेश्वर-पाचगणी इको सेन्सीटीव्ह झोनच्या संनियत्रण समितीचे अध्यक्ष सुधाकर नांगनुरे, सदस्य अंकूर पटवर्धन, रानवा संस्थेचे उत्कष घाटे आदी उपस्थित होते.

जागतिक पर्यावरण दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, पाचगणीच्या अद्वितीय नैसर्गिक वारसा, जैवविविधता, दुर्मिळ वनस्पती, पक्षी व पर्यावरण संवर्धनाची माहिती पाचगणी टेबललँड या माहिती पुस्तिकेत समाविष्ट असल्याचे सांगून पर्यावरण संरक्षण, निसर्ग संवर्धन आणि भावी पिढ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत व्यक्त केले.

पाचगणीच्या टेबललँड पठारावर वनस्पती आणि प्राण्यांच्या ६-७ प्रजातींचा उगम झालेला आहे. जगामध्ये कुठेही न आढळणाऱ्या या प्रजाती आपल्याकडे आहेत. म्हणूनच पाचगणी टेबललँड हे पठार वैशिष्ट्यपूर्ण आहे. निसर्गातील काही वनस्पतींचे वैशिष्ट्य व सौंदर्य हे ज्या त्या ठिकाणीच वाढते त्यामुळे याची जपणूक जपणूक करणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे. येथील पर्यटनविषयक व्यवसाय हा येथील वैशिष्ट्यावरच अवलंबून आहे. आपण हे वैशिष्ट्य जेवढं चांगलं सांभाळू, तेवढे जास्त पर्यटक येतील. जेवढे जास्त पर्यटक येतील. पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांकडून अनावधानाने नुकसान होऊ नये यासाठी पर्यटकांना योग्य शिस्त लावण्याची जबाबदारी इथल्या स्थानिक प्रशासन, वन विभाग, गाईड व्यावसायिक तसेच नागरिकांची आहे.

यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याहस्ते प्रातिनिधीक स्वरुपात वृक्षारोपन करण्यात आले. यावेळी पुस्तीका तयार करण्यासाठी मेहनत घेतलेल्या छायाचित्रकार, माहिती सकंलकांचे, मुद्रकांचा सत्कार जिल्हाधिकारी यांच्याहस्ते करण्यात आला. तसेच पठारावर प्लास्टीकच्या 100 टक्के रिसायकलद्वारे बनविण्यात आलेल्या बेंचचे उ्दघाटन जिल्हाधिकारी श्री. पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.

000

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२६सांगली तथा सातारा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक
04/06/2026

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२६
सांगली तथा सातारा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक

04/06/2026

पालखी सोहळा सुखकर आणि सुरक्षित पार पडण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे

पालखी मार्गावरील कामे गतीने पूर्ण करावीत
-विभागीय आयुक्त शीतल तेली - उगले

सातारा दि.4- पालखी सोहळा सुखकर आणि सुरक्षित पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी नियोजनबद्ध व समन्वयाने काम करावे. तसेच पालखी मार्गावरील व पालखीचा मुक्काम असणाऱ्या तळांची आवश्यक कामे गतीने पूर्ण करावीत, अशा सूचना विभागीय आयुक्त शीतल तेली - उगले यांनी केल्या.

संत ज्ञानेश्वर महाराज आषाढीवारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी आज लोणंद ते फलटण दरम्यानच्या पालखी मार्गाची व तळांची भेट देऊन पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक एस. एस. कदम, वाई उपविभागाचे प्रांताधिकारी योगेश खरमाटे, फलटण उपविभागाच्या प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर, प्रभारी खंडाळा तहसीलदार रविराज जाधव, फलटण तहसीलदार अभिजीत जाधव, फलटण नगरपालिका मुख्याधिकारी निखिल जाधव, आळंदी देवाची येथील श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त योगी निरंजननाथ, राजेंद्र उमाप, पुरुषोत्तम पाटील, चैतन्य लोंढे उर्फ कबीरबुवा यांच्यासह सर्व कार्यान्वयीन यंत्रणाचे प्रमुख उपस्थित होते.

यावेळी विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांनी श्री संत ज्ञानेश्वर पादुका निरास्नान स्थळाची, चांदोबाचे लिंब, तरडगाव पालखीतळ, राव रामोशी पूल, फलटण पालखी मार्ग, व बरड पालखी तळ येथे भेट देऊन पाहणी केली.
वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून आवश्यक त्या सोयी सुविधा देऊन प्रशासकीय पातळीवर जय्यत तयारी करण्याच्या सूचना दिल्या. लोणंद, तरडगाव ते फलटण, बरड या मुख्य पालखी मार्गावरील रस्त्याची अपुरी कामे तात्काळ मार्गी लावावीत. पालखी मार्गावर आणि विसाव्याच्या ठिकाणी असलेली तात्पुरती बांधकामे व अतिक्रमणे स्थानिक प्रशासनाने हटवावीत. लोणंद व फलटण येथील पालखी तळाची स्वछता, सपाटीकरण, चिखल होऊ नये म्हणून मुरूम टाकणे आणि पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी व्यवस्था करावी. वारी काळात वारकऱ्यांना मूलभूत व आरोग्य सुविधा मिळण्यावर भर देण्यात यावा. पालखीच्या
संपूर्ण मार्गावर आणि मुक्कामाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तात्पुरती व फिरती शौचालये उपलब्ध करून स्वच्छतेसाठी २४ तास पथके तैनात ठेवण्याच्या सूचनाही यावेळी त्यांनी दिल्या.
वारकऱ्यांना टँकर्सद्वारे शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नगरपालिका, जिल्हा परिषदेमार्फत उपलब्ध करून देण्यात यावा. पाण्याच्या उपलब्ध स्रोतांची माहिती घेऊन येथील पाणी पिण्यालायक असल्याची खात्री करावी. आरोग्य विभागाने फिरते दवाखाने, पुरेशा रुग्णवाहिका आणि औषधसाठा सज्ज ठेवावा. विद्युत आणि सुरक्षा व्यवस्था पालखी मुक्कामाच्या ठिकाणी चोवीस तास वीज राहील याची दक्षता महावितरणने घ्यावी. पालखी सोहळ्या दरम्यान पालखीला भेट देणाऱ्या भक्तांच्या गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सातारा पोलीस दलाने काटेकोर नियोजन करावे अशा सूचनाही विभागीय आयुक्तांनी केल्या.

रस्त्याच्या रुंदीकरणावेळी काढण्यात आलेली झाडे पालखी मार्गावर पुनर्रोपण करावीत.
पालखी मार्गावर असणाऱ्या फलटण शहराजवळील राव रामोशी पुलाची पाहणीही यावेळी विभागीय आयुक्त श्रीमती तेली -उगले यांनी केली. सदर काम येत्या 30 जूनपर्यंत पूर्ण करण्यात यावे. या कामात अडथळा आणणाऱ्या व्यक्तींविरोधात पोलिसांच्या मदतीने कारवाई करावी असे स्पष्ट निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी पालखी मार्गावर वारकऱ्यांसाठी करण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची माहिती दिली.
000

अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत शंका आहे?अन्न व औषध प्रशासन विभागाच्या टोल फ्री क्रमांकावर किंवा ई-मेलवर तक्रार नोंदवा…📞 १८००...
04/06/2026

अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत शंका आहे?
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या टोल फ्री क्रमांकावर किंवा ई-मेलवर तक्रार नोंदवा…
📞 १८००२२२३६५
✉️ [email protected]

*पालखी सोहळा  सुखकर आणि सुरक्षित पार पडण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे* *पालखी मार्गावरील कामे गतीने पूर्ण क...
04/06/2026

*पालखी सोहळा सुखकर आणि सुरक्षित पार पडण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे*

*पालखी मार्गावरील कामे गतीने पूर्ण करावीत*
*-विभागीय आयुक्त शितल तेली-उगले*

सातारा दि.4-
पालखी सोहळा सुखकर आणि सुरक्षित पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी नियोजनबद्ध व समन्वयाने काम करावे. तसेच पालखी मार्गावरील व पालखीचा मुक्काम असणाऱ्या तळांची आवश्यक कामे गतीने पूर्ण करावीत, अशा सूचना विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांनी केल्या.

संत ज्ञानेश्वर महाराज आषाढीवारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी आज लोणंद ते फलटण दरम्यानच्या पालखी मार्गाची व तळांची भेट देऊन पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक एस. एस. कदम, वाई उपविभागाचे प्रांताधिकारी योगेश खरमाटे, फलटण उपविभागाच्या प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर, प्रभारी खंडाळा तहसीलदार रविराज जाधव, फलटण तहसीलदार अभिजीत जाधव, फलटण नगरपालिका मुख्याधिकारी निखिल जाधव, आळंदी देवाची येथील श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त योगी निरंजननाथ, राजेंद्र उमाप, पुरुषोत्तम पाटील, चैतन्य लोंढे उर्फ कबीरबुवा यांच्यासह सर्व कार्यान्वयीन यंत्रणाचे प्रमुख उपस्थित होते.

यावेळी विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांनी श्री संत ज्ञानेश्वर पादुका निरास्नान स्थळाची, चांदोबाचे लिंब, तरडगाव पालखीतळ, राव रामोशी पूल, फलटण पालखी मार्ग, व बरड पालखी तळ येथे भेट देऊन पाहणी केली.
वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून आवश्यक त्या सोयी सुविधा देऊन प्रशासकीय पातळीवर जय्यत तयारी करण्याच्या सूचना दिल्या. लोणंद, तरडगाव ते फलटण, बरड या मुख्य पालखी मार्गावरील रस्त्याची अपुरी कामे तात्काळ मार्गी लावावीत. पालखी मार्गावर आणि विसाव्याच्या ठिकाणी असलेली तात्पुरती बांधकामे व अतिक्रमणे स्थानिक प्रशासनाने हटवावीत. लोणंद व फलटण येथील पालखी तळाची स्वछता, सपाटीकरण, चिखल होऊ नये म्हणून मुरूम टाकणे आणि पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी व्यवस्था करावी. वारी काळात वारकऱ्यांना मूलभूत व आरोग्य सुविधा मिळण्यावर भर देण्यात यावा. पालखीच्या
संपूर्ण मार्गावर आणि मुक्कामाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तात्पुरती व फिरती शौचालये उपलब्ध करून स्वच्छतेसाठी २४ तास पथके तैनात ठेवण्याच्या सूचनाही यावेळी त्यांनी दिल्या.
वारकऱ्यांना टँकर्सद्वारे शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नगरपालिका, जिल्हा परिषदेमार्फत उपलब्ध करून देण्यात यावा. पाण्याच्या उपलब्ध स्रोतांची माहिती घेऊन येथील पाणी पिण्यालायक असल्याची खात्री करावी. आरोग्य विभागाने फिरते दवाखाने, पुरेशा रुग्णवाहिका आणि औषधसाठा सज्ज ठेवावा. विद्युत आणि सुरक्षा व्यवस्था पालखी मुक्कामाच्या ठिकाणी चोवीस तास वीज राहील याची दक्षता महावितरणने घ्यावी. पालखी सोहळ्या दरम्यान पालखीला भेट देणाऱ्या भक्तांच्या गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सातारा पोलीस दलाने काटेकोर नियोजन करावे अशा सूचनाही विभागीय आयुक्तांनी केल्या.

रस्त्याच्या रुंदीकरणावेळी काढण्यात आलेली झाडे पालखी मार्गावर पुनर्रोपण करावीत.
पालखी मार्गावर असणाऱ्या फलटण शहराजवळील राव रामोशी पुलाची पाहणीही यावेळी विभागीय आयुक्त श्रीमती तेली -उगले यांनी केली. सदर काम येत्या 30 जूनपर्यंत पूर्ण करण्यात यावे. या कामात अडथळा आणणाऱ्या व्यक्तींविरोधात पोलिसांच्या मदतीने कारवाई करावी असे स्पष्ट निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी पालखी मार्गावर वारकऱ्यांसाठी करण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची माहिती दिली.
000

04/06/2026

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२६

सांगली तथा सातारा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक

अर्ज माघारी घेतलेले उमेदवार
१ तानाजी भगवान पाटील
२ पाटील प्रताप धोंडीराम
३ पाटील मयुर बाबासो
४ मेंढे संजय नायकू

निवडणूक लढवत असलेले उमेदवार

1) धैर्यशील ज्ञानदेव कदम, मु. पो. गोरेगाव (वांगी), ता. खटाव, जि. सातारा — भारतीय जनता पक्ष
2) अभयसिंह खाशेराव जगताप, मु.पो. वरकुटे मलवडी, ता. माण, जि. सातारा — नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)
3) किशोर हनमंत धुमाळ, 123 बागडवाडा, शिवाजीनगर, गोडोली, सातारा — अपक्ष

03/06/2026

जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये 'आपले सरकार सेवा केंद्र' येत्या तीन महिन्यांत सुरू करा; सेवा हक्क आयुक्त सुधाकर तेलंग यांचे निर्देश

सातारा, दि. ३ जून:
सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये 'आपले सरकार सेवा केंद्रांची' संख्या वाढवण्याची मोठी गरज असून, जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये येत्या तीन महिन्यांत ही सेवा केंद्र सुरू करावीत, असे स्पष्ट निर्देश राज्य सेवा हक्क आयुक्त सुधाकर तेलंग यांनी दिले. तसेच जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात 'आदर्श सेतू' व 'आदर्श सेवा केंद्र' उभारावे, अशी सूचनाही त्यांनी केली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज सेवा हक्क आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व विभागांमधील सेवा हक्क कायद्याच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत आयुक्त श्री. तेलंग बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, महसूल उपजिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी महसूल विक्रांत चव्हाण यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते. तसेच जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि मुख्याधिकारी हे व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीत सहभागी झाले होते.

सर्व नागरिकांना विहित वेळेत पारदर्शक सेवा देणे हे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगून आयुक्त श्री. तेलंग म्हणाले की, "कायद्यानुसार नागरिकांना विहित वेळेत सेवा देण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आलेली आहे. सर्व शासकीय यंत्रणांनी गतिमान पद्धतीने काम करून जिल्ह्याचा सेवा वितरणाचा टक्का आणि क्रमांक उंचावण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी."
ते म्हणाले , सेतू आणि सेवा केंद्रांमधील व्यवस्था ही एखाद्या 'कॉर्पोरेट' कार्यालयाच्या धर्तीवर अद्ययावत असावी. नगरपालिका स्तरावर सर्व सेवा एकाच छताखाली देण्यासाठी 'आपले सरकार सेवा केंद्र' उभारण्यात यावे, तसेच नागरी क्षेत्रात लोकसंख्येच्या प्रमाणात केंद्रांची संख्या वाढवावी. प्रत्येक शासकीय कार्यालयात दिल्या जाणाऱ्या सेवा आणि 'सेवा हक्क कायदा' याची सविस्तर माहिती देणारे डिजिटल माहिती फलक लावण्यात यावेत. सेतू केंद्र चालकांसाठी विशेष प्रशिक्षण शिबिरे आयोजित करून, नागरिकांना कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त दर्जेदार सेवा कशी देता येईल, याचे मार्गदर्शन करावे, असेही आयुक्तांनी निर्देशित केले.
अपील प्रकरणांचा जलद निपटारा करा
"महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायद्यानुसार विहित वेळेत सेवा न मिळाल्यास नागरिकांना प्रथम आणि द्वितीय अपील करण्याची तरतूद आहे. सेवा देणाऱ्या संबंधित सक्षम अधिकाऱ्यांनी या अपीलांवर तातडीने सुनावणी घेऊन प्रकरणांचा जलद निपटारा करावा. अपील ही या कायद्यातील अत्यंत महत्त्वाची तरतूद असून सर्व यंत्रणांनी तिचा योग्य व प्रभावी वापर करावा," अशा सूचनाही त्यांनी यंत्रणेला दिल्या.

यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनीही उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले आणि सातारा जिल्ह्यात लवकरच नागरिकांच्या सोयीसाठी 'आदर्श सेतू केंद्र' उभारण्यात येईल, असे ही त्यांनी सांगितले.

Address

HAJERI MAL SADAR BAZAR
Satara
415001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when जिल्हा माहिती कार्यालय, सातारा ,District Information Office ,Satara posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share