04/04/2022
गुढीपाडवा मुहुर्तावर #तीर्थक्षेञ_ #पाडळी_जोतिबा_सासनकाठी_क्र_१ उभी करणेत आली. #जोतिबा_चैञी_उत्सवामधे महिनाभर #मासांहार_वर्ज्य करणारे #पाडळी गाव
ता.जि. सातारा #शासनमान्यताप्राप्त _'क' #वर्ग देवस्थान...
१ ले मानकरी असणारे पाडळी गाव
देवस्थान व याञा सोहळा माहिती
कोल्हापूर-पुणे महामार्गावर सातारा तालुक्यातील नागठाणे या गावापासून पश्चिमेला पाच किलोमीटरवर निसर्गरम्य परिसरात वसलेले गाव म्हणजे पाडळी (निनाम). जोतिबा डोंगर (ता. पन्हाळा), जि. कोल्हापूर यथील चैत्र यात्रेत सामील होण्याऱ्या मानाच्या १०८ सासनकाठ्यांच्या मिरवणुकीत पहिला मान पाडळी च्या सासनकाठीस आहे. या निशाण्याची नोंद कोल्हापूर तहसील कार्यालयात व इतिहासकालीन ताम्रपटावर आहे. या गावच्या सासन निशानाची हि परंपरा प्राचीन काळापासून लाभली आहे. सुमारे ४० ते ४५ फूट उंचीचे जाड निशाण, गर्द जांभळ्या रंगाचा फरारा (पताका) व तीन चुनी तोरणे बांधलेले असते.निशानावर फूलांच्या हारांची सुंदर आरास अतिशय कौशल्याने केलेली असते.सासनकाठी खांद्यावर घेऊन चालणे व तोरण्या सांभाळणे हे अतिशय कौशल्याचे काम असते.गावातून दरवर्षी जोतीबाकडे २० ते २५ बैलगाड्या या मानाच्या सासनकाठीसोबत जातात सोबत हजारो ग्रामस्थ,भाविक पायी प्रवास करतात. गावातील घरटी एक माणूस या पदयात्रेत सहभागी असतो. सासनकाठी जोतीबाकडे मार्गस्थ होताना व माघारी येत असताना रस्त्यात ठिकठिकाणी गावोगावी दर्शनासाठी मोठी गर्दी होते. सुहासनी महिला निशानास ओवाळण्यास येतात भाविक मंडळी निशाणास विविध आकर्षक हार ,पाच नारळाचे तोरण, नोटांच्या माळा अर्पण करतात.
पाडव्यानंतर जोतिबा डोंगराकडे हे निशान आपल्या सर्व देवसेवक ( कारखानदार) याच्या लवाजम्या सहीत वाजत गाजत मार्गस्त होते. तीन दिवसांचा पायी प्रवास करून हे निशान जोतिबा डोंगराळ पोचते व चैञी याञेत सहभागी होते. श्री जोतिबा चैञी याञेत या निशानाला पहिला मान असुन हा मान छ.शाहु महाराजांनी दिलेला आहे.त्याही आधी पासुन ही सासनकाठी चैञी याञेत सहभागी होतच होती.जोतिबा याञेच्या मुख्य दिवशी उपस्थित मंञी महोदय व शासकिय अधिकारी लोकांच्या उपस्थिती मध्ये निशानाचे विधिवत पुजन होवुन दुपारी १.३० वा. सासनकाठी मिरवणूकीस प्रारंभ होतो. या निशानाच्या मागे मग विविध गावची मानाची निशाने क्रमाक्रमाने सामिल होतात. दोन दिवस जोतिबा डोंगरावर मुक्काम करून व तिथला सर्व याञा सोहळा पार पाडुन , मानाचे विडे घेवुन तोफेची सलामी झालेवर निशान लगेच परतीचा प्रवास सुरू करते.तीन दिवसांच्या परतीच्या प्रवासात निशान विविध गावातुन प्रवास करत असताना त्या त्या गावचे लोक निशानाचे मोठ्या आनंदात स्वागत करीत असतात .या ठिकाणी छबीना , आरती व अन्नदानाचे नियोजन हे गावकरी मोठ्या आनंदाने व भक्तिने करीत असतात.
तीन दिवसांचा प्रवास करून हे निशाण ज्या दिवशी पाडळी गावात पोचते त्या दिवशीच पाडळी गावची याञा असते. यावेळी पाडळी पंचक्रोशी तसेच इतर जिल्ह्यातील लाखो भाविक श्रीं च्या दर्शनासाठी गोळा होत असतात यावेळी भक्त भाविक हार तुरे,गोंडे, नारळाची तोरणे व नोटांच्या माळा श्री चरणी अर्पण करत असतात.गावच्या पावक्ता(पादुका) या ठिकाण पासुन ही याञा सायंकाळी ४ वाजता चालु होते व वाजत गाजत हे निशान राञी ८.३० वाजता श्री भैरवनाथ मंदीर येथे पोचते. त्यानंतर राञी ९.३० वाजता गावातील मुख्य चौकात "व्हण" या पारंपरिक ठिकाणी निशाण छबिन्या साठी उभे राहते. राञभर चालणार्या या छबिन्यात भक्त भाविक व गावकरी लोक श्रींना नारळ तोरणे , नोटांच्या माळा भक्तिभावाने अर्पण करतात.श्रद्धेने नवस बोलले जातात व फेडले जातात. राञभर हा छबिना पार पाडल्या नंतर पहाटे ५ वाजता हे निशान श्री जोतिबा मंदीराकडे प्रस्थान करते. सकाळी ८ वाजेपर्यंत हे निशान जोतिबा मंदीर येथे पोचते त्यानंतर आरती होवुन या दिवसाचा कार्यक्रम संपतो.या नंतर पाच दिवस सकाळ - संध्याकाळी श्रींची आरती होते. पाचव्या दिवशी पाकाळणी (प्रक्शालनाचा) कार्यक्रम असतो.या दिवशी ही भाविक विधीत स्वरूपात श्रीनाथांच्या चरणी आपली सेवा अर्पण करतात.राञी ८.३० वाजता महाआरती होते.राञी १० वाजता पाखाळणीचा मुख्य कार्यक्रम चालु होतो यात निशानाला घातलेला पोशाख उतरवला जातो .याञेचा सर्व जमाखर्च जाहीर केला जातो .
-