01/04/2026
कलकत्ता भुवनेश्वर कोणार्क आणि जगन्नाथ पुरी हे दूर तावरे टूर्स मार्फत यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली, यामध्ये जाताना पुणे ते कलकत्ता असा दोरांतो रेल्वेचा प्रवास आणि येताना विमान प्रवास हा सर्व लोकांना घडविण्यात आला. कलकत्त्याला उतरल्यानंतर आराम करून ग्रुपने गंगासागर या धार्मिक स्थळे भेट दिल्या यामध्ये अविस्मरणीय असा बोट प्रवास आणि समुद्र पक्षांचा आनंद घेत ग्रुप गंगासागर येथे आला, गंगासागर येथे आल्यानंतर गंगेच्या आणि समुद्राचा यांच्या संगमावर लोकांनी स्नान करून धार्मिक विधी यांचे पूर्ण केले. आणि दुपारचे जेवण करून मिळेल कलकत्ता ला परत आलो दुसऱ्या दिवशी कलकत्त्याच लोकल स्थळ दर्शन कलकत्ता काली माता मंदिर, विक्टोरिया पॅलेस ,इंडियन म्युझियम बेलूर मठ आणि आवडीचा विषय म्हणजे खरेदी याचा मनसोक्त आनंद घेऊन ग्रुपने जगन्नाथ पुरी कडे प्रस्थान केले. पुरी ला आराम करून गोल्डन बीच, बेडी हनुमान मंदिर आणि सायंकाळी पुरी मंदिरावरील ध्वज बदलणे, हे सर्व पाहून श्री जगन्नाथ दर्शन घेतले, दर्शन काही काळ बंद होते, पण लोकांचे म्हणणे होते आपल्याला जगन्नाथ ने बोलावलेलं आहे त्यामुळे त्याच्या दर्शनासाठी थोडा वेळ वाट पाहावी लागली तरी चालेल,आणि लोकांनी त्यांच्या मनासारखे जगन्नाथाचे दर्शन घेऊन तृप्त झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी नाष्टा करून ग्रुप चिल्का सरोवर जे आशिया खंडातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे त्याला भेट दिली बोटीतून सफर करत, डॉल्फिन चा आनंद घेतला तेथून युनेस्को हेरिटेज साईट अशा कोणार्कचे सूर्य मंदिर ला भेट देऊन त्याचा इतिहास जाणून घेतला आणि आपले पूर्वज किती महान होते याचे प्रत्यक्ष दर्शन घडले. आणि तेथून ग्रुप हॉटेल ला परत येऊन विश्रांती घेतली दुसऱ्या दिवशी सकाळी नाष्टा करून साक्षी गोपाल गणेश मंदिराला भेट दिली,
याची अशी खास बाब आहे की आपण जगन्नाथाचे दर्शन घेतले आहे याची इथं साक्ष द्यावी लागते तेथून पिपली या ठिकाणी भेट देऊन तिथले हस्तकला जे जागतिक प्रसिद्ध आहे त्याला भेट दिली व नंतर प्रसिद्ध असे जंगल सफारी नंदन कानन प्राणी संग्रहालय यामध्ये, जिराफ, ॲनाकोंडा हत्ती, जगातील सर्वात लहान माकड ,या आणि अशा विविध प्राणी पाहून मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी सकाळी आरामशीर उठत ग्रुपने प्रसिद्ध लिंगराज मंदिर धौलागिरि स्तूप ,अशोक स्तंभ, मारुती मंदिर तसेच नंतर प्रसिद्ध लेणी खंडगिरी आणि उदयगिरी या आणि अशा विविध ठिकाणी भेट देऊन रात्रीचा परतीचा प्रवास भुवनेश्वर ते पुणे असा विमान प्रवास करून, सहभागी झालेल्या सदस्यांचे आभार मानून टूर समाप्त झाली, अर्थात तावरे टूर्स ची खासबाग ही टूर मध्ये येणारे प्रत्येक व्यक्ती ही समाधानीच राहते, कारण जे काही नियोजन कंपनी मार्फत केले जाते ते पूर्णपणे काटेकोरपणे पाळले जाते यामध्ये लक्झरी अशी हॉटेलची व्यवस्था जेवण सर्व काही वेळेवर हे लोकांना पुरवण्यात येते त्यामुळेच तावरे टुर्स कडे लोकांचा कल हा आपली टूर म्हणून पाहिला जातो.