Durg Sahyadri Trekkers

Durg Sahyadri Trekkers Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Durg Sahyadri Trekkers, Tour Agency, At Post/Samrad. Tal/Akole Dist/Ahmednagar, Shendi.

19/12/2017
06/11/2017
पट्टा किल्ल्याचेच दुसरे नाव "विश्रामगड" असे देखील आहे. "विश्रामगड" सह्याद्रीच्या उत्तर दक्षिण रांगेच...
05/11/2017

पट्टा किल्ल्याचेच दुसरे नाव "विश्रामगड" असे देखील आहे. "विश्रामगड" सह्याद्रीच्या उत्तर दक्षिण रांगेची सुरुवात इगतपुरी परिसरातून थळघाटाच्या पूर्वेकडे जाते. याच रांगेला कळसूबाई रांग म्हणतात. याच रांगेच्या पश्चिमेकडे अलंग, मदन, कळसूबाई तर पूर्वेकडे औंढा, पट्टा, बितनगड, आड हे किल्ले आहेत. अलंग, मदन, कुलंग येथे असणारे घनदाट जंगल, दुर्गमवाटा यामुळे येथील किल्ल्र्यांयची भटकंती फारच अवघड आहे. तर औंढा, पट्टा, या परिसरातील भ्रमंती फारच सोपी आहे. पट्टा किल्ल्याचेच दुसरे नाव "विश्रामगड" असे देखील आहे. इतिहास : पट्टागड शिवाजी महाराजांनी इ. स. १६७१ मध्ये जिकूंन घेतला. पट्टा किल्ल्याचा माथा म्हणजे एक मोठे पठारच आहे. येथून अलंग, मदन, कुलंग, कळसूबाई, त्रिंबकगड हा सर्व परिसर नजरेत भरतो. या सर्व परिसरावर नजर ठेवण्यासाठी या किल्ल्र्यांाचा उपयोग होत असे. शिवरार्यांवनी हा किल्ला जिंकला आणि याचे नामकरण 'विश्रामगड' असे केले. जालान्याची लूट केल्यानंतर शिवाजी महाराजांनी काही काळ या किल्ल्यावर घालवला. पुढे इ.स.१६८६ पर्यंत हा सर्व परिसर मराठ्यांच्या ताब्यात होता. १६८२ साली औरंगजेबाने महाराष्ट्रात पदार्पण केले आणि मराठी मुलूख ताब्यात घेण्यास सुरवात केली. १६८८ साली मातबरखानाने बागलाणातील अनेक गड घेण्यास सुरवात केली होती. पट्टागडा संबंधी मातबरखान औरंगजेबाकडे अर्ज पाठवतो त्यात तो म्हणतो सेवकाने काही दिवसांपासून १००० कोळी, भिल्ल, व मावळे र्यां चे पथक सैन्यात घेतले आहे. मराठ्यांच्या ताब्यात असलेले पट्टा व इतर किल्ल्यालगतच्या जमीनदारांना रकमा पुरवण्यात आल्या आहेत. ११ जानेवारी १६८८ ला खानाने काही पथके किल्ला घेण्याच्या मार्गावर धाडली. मध्यरात्रीच्या सुमारास किल्ल्याच्या तटाला दोर लावून किल्ला जिंकून घेतला. भगूरचा ठाणेदार गोविंदसिंग याची किल्ल्यावर नेमणूक करण्यात आली. मोगलांनी १६८८ ते ८९ या कालावधीत मराठ्यांचे औंढा, त्रिंबकगड, कवनी, त्रिंगलवाडी, मदनगड, मोरदंत किल्ले फितुरीने घेतले मात्र पट्टागड त्र्यांनना जिंकून घ्यावा लागला. पहाण्याची ठिकाणे : पट्टावाडीतून पायर्यांच्या वाटेने वर आल्यावर दोन गुहा लागतात.यातील एका गुहेमध्ये साधूचे वास्तव्य होते ती गुहा सध्या कुलुप लावून बंद केलेली आहे. दुसर्याध गुहेत राहाता येते. या गुहेच्या पुढेही काही गुहा आहेत, पण वापरात नसल्याने त्र्यांधची अवस्था वाईट आहे. या गुहां जवळून जाणार्याक पायर्यां च्या वाटेने वर चढतांना दोनही बाजूचा कातळ छिन्नी - हातोड्याने तासून गुळगुळीत केलेला दिसतो. मधे तटबंदीचे अवशेष दिसतात. पायर्यां चढून वर गेल्यावर उजवीकडे उत्तरमुखी प्रवेशव्दार दिसते. त्याची कमान आजही शाबूत आहे. प्रवेशव्दाराच्या उजव्या बाजूला बुरूज आहे. येथून एक वाट पट्टावाडीत उतरते. प्रवेशव्दार पाहून परत वरच्या दिशेने जातांना कातळात खोदलेल्या पायर्याज लागतात. येथे एक सातवाहन कालीन पाण्याचे टाके आहे. त्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. या टाक्यापासून वर चढत गेल्यावर अष्टभुजा देवीचे मंदिर लागते या मंदिराचा अलीकडेच जीर्णोद्वार केला आहे. मंदिरा समोरून उजव्या बाजूने वर चढत गेल्यावर आपण एका प्रशस्त इमारतीपाशी येतो. या इमारतीला "अंबरखाना" म्हणतात. या इमारतीची बांधणी काळ्या घडीव दगडात केलेली असून आत प्रशस्त दालन आहेत. इमारतीचे छ्त घुमटाकार आहे. येथून वरच्या दिशेने चढत गेल्यावर आपण किल्ल्याच्या माथ्यावर येतो. पट्टा किल्ल्याचा माथा म्हणजे एक प्रशस्त पठारच आहे. माथ्यावरून दूरवर औंढा किल्ल्याचा सूळका दिसतो. या पठारावर उजव्या बाजूला ( औंढा किल्ल्याच्या दिशेला) गेल्यावर प्रथम पाण्याची दोन मोठी टाकी लागतात. त्याच्या पुढे काही गुहा लागतात. गुहांच्या पुढे गेल्यावर ओळीत खोदलेली पाण्याची टाकी लागतात, त्र्यांाना "बारा टाकी" म्हणून ओळखतात. येथून सरळ जाणार्याक वाटेने औंढा किल्ल्यावर जाता येते. बारा टाकी पासून परत फिरुन परत येतांना थोडे खालच्या बाजूस उतरून आल्यास अजून काही पाण्याची टाकी पाहायला मिळतात. इतिहास : पट्टागड शिवाजी महाराजांनी इ. स. १६७१ मध्ये जिकूंन घेतला. पट्टा किल्ल्याचा माथा म्हणजे एक मोठे पठारच आहे. येथून अलंग, मदन, कुल पुन्हा किल्ल्याच्या माथ्यावर येऊन डावीकडे गेल्यावर काही वास्तूंचे अवशेष दिसतात. गडाच्या डाव्या टोकावर भव्य बुरुज आहे. हा बुरुज आपल्याला किल्ल्याच्या पायर्या. चढतांना डाव्या बाजूस दिसलेला असतो. हा बुरूज पाहून खाली उतरणार्याा वाटेने आपल्याला परत सुरुवातीला पाहिलेल्या गुहेपाशी जाता येते. तेथे आपली गड फेरी पूर्ण होते. संपूर्ण गडमाथा फिरण्यास २ ते ३ तास लागतात.

रतनगडसमुद्रसपाटीपासुन उंची-३५२३फुट                        इतिहास१७६३ साली हा किल्ला महादेव कोळी सरदार जावजी याने ताब्यात...
02/11/2017

रतनगड
समुद्रसपाटीपासुन उंची-३५२३फुट
इतिहास
१७६३ साली हा किल्ला महादेव कोळी सरदार जावजी याने ताब्यात घेतल्याची गॅझेटमध्ये नोंद आढळते. १८१८ साली रतनगड पाच विभागांचे मुख्यालय होते. राजुरची ३६ खेडी, अलंगची २२ खेडी ही सह्याद्रीच्या वरची व सह्याद्रीच्या खालची सोकुर्ली परगण्याची ६० खेडी, वाडी परगण्याची २२ खेडी, जुरुश्रोशि परगण्याची ६० खेडी होती. १८२० मध्ये कॅप्टन गॉर्डनने गड ताब्यात घेतला. १८२४ साली तो आदीवासी सेनानी रामोजी भागंरेनी गड ताब्यात घेतला.

पुराणात असा ऊललेख आहे समुद्र मंथन झाल्या वर देव आणि दानव यांच्या मध्ये समुद्रातून निघालेल्या अमृताची वाटणी करण्याचे ठरले व नेवासे या ठिकाणी देवांनी अमृत प्राशन कले त्याच पंक्ती मधे राहू नावाचा एक दानव असून त्याने अमृत प्राशन केलेले आहेस असे समजताच विषणुने मोहीनी रुप धारण करून त्या दानवाचा शिरछेद केला त्याचे धड राहूरी या ठीकाणी पडले तर शीर रतनगडावर पडले व त्याच्या कंठातील अमृताची धार गडावरुन वाहू लागली त्या काळा पासून त्या धारेचे नदी मध्ये रुपांतर झाले व नदीस अमृत वाहीनी असे नाव पडले.

गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे
गडावरील प्रेक्षणीय ठिकाणे -
१ - गणेश दरवाजा.
२ - रत्ना देवीची गुहा. (मंदिर)
३ - मुक्कामाची गुहा.
४ - प्रमुख दरवाजा. (यावर देवादिकांची शिल्पे पहावयास मिळतात)
५ - इमारतींचे जोते. (गडावर वास्तव्याला असलेल्या जुन्या भग्न इमारतींचे अवशेष)
६ - कडेलोट पॉइंट.
७ - राणीचा हुडा (भग्न बुरूज)
८ - प्रवरेचे उगमस्थान.
९ - मोर्च्याची ठिकाणे आणि बुरूज.
१० - अंधार कोठी व त्यातील पाण्याचे तले. (यातील पाणी हे अतिशय मधुर असून पिण्यास योग्य आहे )
११ - नेढ़ (गडावरील अत्युच्च ठिकाण, खडकाला असलेले आरपार भगदाड.)
११ - कल्याण दरवाजा. (यालाच साम्रद,कोकण किंवा त्रिम्बक दरवाजा असेही म्हणतात.)
संपर्क नामदेव बांडे 9765707452 /9689579281

15/10/2017
सांदण दरी Sandhan Valleyसह्याद्रीनवल म्हणजे सांदण दरी एका अतिप्राचीन जिओग्राफिक फॉल्टलाईन (भौगोलिक प्रस्तरभंग रेषा) म्हण...
04/10/2017

सांदण दरी Sandhan Valley
सह्याद्रीनवल म्हणजे सांदण दरी एका अतिप्राचीन जिओग्राफिक फॉल्टलाईन (भौगोलिक प्रस्तरभंग रेषा) म्हणजे जमिनीला पडलेली एक मोठी भेग यामुळे निर्माण झालेली ही दरी किंवा घळ हा निसर्गाचा अद्भुत असा चमत्कारच आहे. सांदण दरी दोनशे ते चारशे फुट खोल आणि जवळ-जवळ 4 कि.मी लांबवर पसरलेली आहे.पावसळ्यात सांदण दरीला जाणे अशक्य असते.कारण पावसाच पाणी याच दरीतुन खाली कोसळत.त्यामुळे येथे जाण्याचा उत्तम कालावधी म्हणजे उन्हाळा.दरीतील ऊन-सावल्यांचा खेळ बघण्यासारखा असतो.दरीत गेल्यावर दोन पाण्याचे पुल लागतात.पहिला पुल २-४ फुट अन दुसरा पुल ४-६ फुट पाण्यात असतो.हिवाळ्यात पण जाऊ शकतो पण पाण्याची पातळी तेव्हा थोडी जास्त असु शकते.तिथेपोचण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणाच्या जलाशयाच्या काठानेसाम्रद या गावी जावे लागते. पुण्यावरुन पोचण्यासाठी आळेफाटा-संगमनेर-अकोले-राजूर-शेंडी (भंडारदरा)-उडदावणे-साम्रद असा रस्ता आहे. मुंबईकरांसाठीकल्याण-कसारा घाट-इगतपुरी-घोटी मार्गे शेंडीला पोचता येते. नाशिकहूनहीघोटीमार्गे पोचता येईल. मुखाजवळच उजव्या हाताला पाणवठा आहे. नैसर्गिकपणे डोंगरातून झिरपणारे थंडगार नितळ पाणी. माणसे आणि जनावरांसाठी दगड रचून वेगळी सोय केलेली दिसते.अतिशय अरुंद घळ, कधी आठ-दहा फूट तर कधी अगदीच जेमतेम एक माणूस जाईल एवढी तीन फूट रुंदी आणि दोन्ही बाजूंना अंगावर येणारा दगडी कमीतकमी दोनशे आणि जास्तीत जास्त चारशे फूट उंचीचा पाषाणकडा आहे. त्याच घळीतून खाली उतरत अगदी शेवटच्या मुखाशी जाता येते। अंदाजे घळीची लांबी एक किलोमीटर आहे। त्यानंतर समोर जो काही विराट कोकणकड्याचा भाग दिसतो त्यासमोर आपले आयुष्यच एकदम क:पदार्थ आहे असे वाटू लागते। एकदम हजार-दीडहजार फुटांचा ड्रॉप आणि समोर करुळ घाटाचा कडा आहे सांधण घळीत पावसाळ्यात काही ठिकाणी बरेच पाणी भरते त्यामुळे त्या जागा थोड्या जपूनच दोराच्या आधाराने पार कराव्यात.मुक्कामाची आणि जेवणाची सोय साम्रद गावात होऊ शकते.संपर्क नामदेव बांडे ;- 9765707452 /9689579281

04/10/2017
03/10/2017
02/10/2017

Address

At Post/Samrad. Tal/Akole Dist/Ahmednagar
Shendi
422604

Telephone

+91 96895 79281

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Durg Sahyadri Trekkers posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category